शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
8
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
9
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
10
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
11
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
12
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
13
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
14
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
15
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
16
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
17
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
18
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
19
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
20
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"

केवळ निवृत्तीबाबतच शाश्वती

By admin | Updated: February 1, 2017 02:37 IST

पोलीस अधिकाऱ्यांना केवळ आपल्या सेवानिवृत्तीच्या तारखेबाबतच शाश्वती असते. त्यांच्या बढती, नियुक्तीचा निर्णय शासनाकडून घेतला जातो, अशा शब्दात मुंबईचे माजी पोलीस

मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांना केवळ आपल्या सेवानिवृत्तीच्या तारखेबाबतच शाश्वती असते. त्यांच्या बढती, नियुक्तीचा निर्णय शासनाकडून घेतला जातो, अशा शब्दात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व गृहरक्षक दलाचे महासमादेशक राकेश मारिया यांनी आपली खंत अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. गेल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मारिया मंगळवारी सेवानिवृत्त झाले, त्यानिमित्त पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास आपण केवळ १२ दिवस हाताळला आणि सीबीआय अद्यापही त्या प्रकरणाचा तपास करीत आहे. त्यामुळे त्या वेळी आपण घेतलेली भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट केले. सेवेबाबत पूर्ण समाधानी असून, काम करण्यास पूर्ण मोकळीक दिल्याने, शासन, वरिष्ठ अधिकारी, आजी-माजी सहकारी व अंमलदारांचे आभार मानले. मुदतपूर्व पदोन्नतीपासून निवृत्तीपर्यंत म्हणजे १६ महिने त्यांना ‘होमगार्ड’मध्ये काढण्याबाबत मारिया म्हणाले, ‘माझी आयुक्तपदावरून बदली होण्याच्या एक महिन्यापूर्वी आपण पदोन्नतीवर होमगार्ड किंवा राज्यसुरक्षा महामंडळामध्ये नियुक्ती देण्याबाबतचे पत्र अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे आपल्या नाराजीचा प्रश्नच उदभवत नाही. पोलिसांची बढती, पोस्टिंग करणे हा वरिष्ठ अधिकारी, शासनाचा अधिकार आहे. पोलिसांना केवळ आपल्या निवृत्तीच्या तारखेची शाश्वती असते.’ मुंबई दंगल, बॉम्बस्फोट, २६/११, जामसंडेकर हत्याकांड अशा अनेक घटनांचा त्यामध्ये समावेश आहे. सर्व घटना त्या-त्या परिस्थितीत महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे त्यात डावे-उजवे करता येणार नाही,’ असे सांगून मारिया म्हणाले, ‘काही वर्षांपूर्वी शिवाजी पार्क येथे झालेल्या एका खुनाचा तपास पूर्ण करता आला नाही, ही एकच खंत असून, २६/११च्या वेळी मुंबई पोलिसांनी जी कामगिरी केली, ती अद्वितीय होती. त्यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकारी-अंमलदारांनी मोठे शौर्य दाखविले. या हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या पोलिसांना वाचवू शकलो नाही, यांची खंत वाटते,’ असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पोलिसांना मार्गदर्शन करणार- निवृत्तीनंतर कुटुंबीयांसमवेत अधिक वेळ व्यतित करावयाचा आहे. त्याचप्रमाणे, पोलिसांनी गुन्ह्यांचा तपास कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्याचे, तसेच खेळाच्या प्रसारासाठी कार्यरत राहाणार आहे. शीना हत्या तपासाची कल्पना दिली होतीशीना बोरा प्रकरणातील अटक आरोपी व संशयित अतिश्रीमंत असल्याने, त्यांच्याकडून मोठे वकील लढविले जातील, त्यामुळे तपास उत्कृष्ट अधिकाऱ्यांकडून केला जावा, तसेच त्यासाठी वरिष्ठ विधिज्ज्ञांची निवड करण्याची आवश्यकता असल्याचे शासनाला पत्र लिहून कळविले होते. कालांतराने सीबीआयकडे हे प्रकरण सोपविण्यात आल्याने, आपली भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट होते.