शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

राष्ट्रवादीच्या नेत्यांवर संशयाची सुई

By admin | Updated: September 1, 2015 02:21 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर संशयाची सुई असल्याचे सामाजिक

यदु जोशी, मुंबई लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर संशयाची सुई असल्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी म्हटल्यानंतर यासंदर्भात पूरक ठरतील अशा काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एवढेच नव्हेतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांच्या मतदारसंघांमध्ये महामंडळामार्फत वाटण्यात आलेल्या १९० कोटी रुपयांत मोठे गैरव्यवहार झाले आणि पक्षाचे अन्य काही नेते या घोटाळ्यात लाभार्थी होते असा दाट संशय व्यक्त होत आहे. सीआयडीच्या चौकशीमध्ये रमेश कदम आपले नाव तर घेणार नाही ना अशी शंका पक्षाच्या काही नेत्यांना वाटत आहे. या महामंडळाला २५० कोटी रुपयांचे अनुदान राज्य शासनातर्फे देण्यात आले तेव्हा अजित पवार हेच अर्थमंत्री होते. रमेश कदम हा अजित पवार यांचा अत्यंत निकटवर्ती होता. तसेच तत्कालीन प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याही विश्वासातील होता. राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी असलेल्या एका माजी राज्यमंत्र्याला कदमकडून अलिशान गाडी मिळाली होती. अन्य काही नेत्यांनाही गाडीचा प्रसाद मिळाला होता. राष्ट्रवादीच्या ३८ आमदारांच्या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ५ कोटी रुपये हे मातंग समाज महिला समृद्धी योजनेंतर्गत वाटण्यात आले. या १९० कोटी रुपयांच्या वाटपात प्रचंड घोटाळे झाल्याचे म्हटले जाते. अजित पवार यांच्याशी याबाबत संपर्क होऊ शकला नाही. साठे महामंडळातील घोटाळ्यांबाबत संशयाची सुई ही तत्कालीन अर्थमंत्र्यांवर जाते. त्यांच्या काळात महामंडळाला ५०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. एकाच महामंडळाला इतका निधी का दिला गेला. पवारांविरुद्ध सीआयडीने पुरावे गोळा केले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्येच कोट्यवधी रुपये वाटण्यात आले. या वाटपातही घोटाळे असल्याचे दिसते, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.अजित पवार यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात महामंडळाला २५० कोटी रुपये मिळाले. याशिवाय, महामंडळाकडे असलेल्या २०० कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्या. या ठेवींवर महामंडळाला वार्षिक १५ कोटी रुपयांचे व्याज मिळायचे ते मिळणेदेखील बंद झाले.आपल्याला अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला रमेश कदमने यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कदमची मुदत १३ आॅगस्ट २०१५ला संपणार होती. मात्र, नव्या सरकारने त्याला १२ डिसेंबर २०१४ रोजी अध्यक्षपदावरून हटविले होते.