शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:14 IST

नेवाळी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांना

- लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : नेवाळी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तर एकाची बदली ठाणे मुख्यालयात केली आहे. निलंबित केलेल्यांमध्ये हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे व सहायक पोलीस निरीक्षक कौराती यांचा समावेश आहे. तर पोलीस निरीक्षक विजय पवार यांची ठाणे मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. १० जूनला नेवाळी येथील शेतकऱ्यांनी नौदलाकडून उभारण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन केले होते. २२ जूनला सकाळी भाल गावापासून शांततेच्या मार्गाने नेवाळी नाक्यापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा जमीन बचाव आंदोलन समितीने दिला होता. पोलिसांनी त्याला परवानगी दिली होती. मात्र, नेवाळी नाक्यावर खोणीच्या दिशेने, अंबरनाथच्या दिशेने, मलंगगड्या दिशेने आणि भाल गावाच्या दिशेने बराच जमाव एकाच वेळी चालून येत होता. त्यामुळे मोर्चाचे स्वरूप मोठे होते. तो आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. आंदोलक उग्र झाले. त्यांनी जाळपोळ सुरू केली. या घटनेत आंदोलकांकडून १२ पोलीस जखमी झाले. पोलिसांना पॅलेट गनचा वापर करावा लागला. त्यात १४ शेतकरी जखमी झाले.२२ जुलैला पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केल्याची चर्चा आहे. पोलीस अधिकारी वाघमारे व कौराती यांना नेवाळी आंदोलनाचा फटका बसला आहे. मात्र पोलीस निरीक्षक विजय पवार हे तर आंदोलनात जखमी झाले होते. त्यांना कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते जखमी झाले असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई न होता त्यांची केवळ मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. केवळ आश्वासनेच- नेवाळीप्रकरणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जमखींची भेट घेत या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत करण्याची मागणी केली.- भाजपाच्या खासदार व आमदारांनी दोन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नेवाळी जमीन बचाव संघर्ष समितीनेही भेट घेतली. - या सगळ्यावर मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. आगरी, कोळी, कुणबी समाजाची बैठक झाली. केंद्रीय संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेतली जाणार होती.- पावसाळी विधिमंडळ अधिवेशनाचे काम बंद पाडण्याचा इशारा शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसण्याचा इशारा देणारी सुकाणू समिती काय करते, याकडेही शेतकरी आशेने पाहत आहेत. ‘मॅट’मध्ये मागणार दादनिलंबित पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे व सहायक पोलीस निरीक्षक कौराती यांनी याविरोधात ‘मॅट’मध्ये दाद मागणार असल्याचे सांगितले.