शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

वसईमधून एसटीच्या हद्दपारीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 05:20 IST

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील काही गावांमधून १ एप्रिलपासून एसटीची सेवा रद्द करण्यास शुक्रवारी उच्च न्यायालयाने

वसई : पुढील सुनावणी होईपर्यंत वसईतील शहर बस वाहतूक सुरु ठेवण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने एसटी महामंडळाला दिले. तर नागरीकांच्या मुलभूत गरजा भागवणे शक्य होत नसेल तर महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमावा लागेल असा इशाराही हायकोर्टाने वसई विरार महापालिकेला दिला. त्यामुळे ऐन परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना आलेले टेन्शन दूर झाले आहे. एसटी महामंडळाने येत्या १ एप्रिलपासून वसई आणि नालासोपारा आगारातून सुटणाºया शहरी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर एसटीने डेपोसाठी भाड्याने जागा दिली तरच शहर बससेवा सुरु करू अशी भूमिका वसई विरार महापालिकेने घेतली आहे. एसटी आणि महापालिकेमधील जागेचा गुंता सुटत नसल्याने ऐन परिक्षेत काळात विद्यार्थ्यांना मोठे टेन्शन आले होते. त्यासाठी सातवीत शिकणारा शरीन डाबरे आणि शिक्षिका डॉमणिका डाबरे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करून ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार, शेतकºयांची लाईफलाईन असलेली एसटी बंद करू नये अशी मागणी केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान वसई विरार महापालिकेचे वकिल गैरहजर राहिल्याने सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती. एसटी महामंडळाच्या वकिलांनी बाजू मांडताना एसटीला प्रचंड तोटा होत असल्याने सेवा बंद करण्यात येणार आहे. तसेच महापालिका हद्दीत संबंधित महापालिकेने परिवहन सेवा दिली पाहिज, असे सांगितले. तर याचिकर्त्यांची बाजू मांडताना अ‍ॅड. रविंद्र लोखंडे आणि अ‍ॅड. विजय कुर्ले यांनी महापालिकेच्या परिवहन सेवेतील त्रुटी उघड केल्या. केवळ नफा डोळ््यासमोर ठेऊन महापालिकाल परिहवन सेवा देत असून नागरीकाप्रती आपल्या घटनात्मक जबाबदाºया पार पाडण्यात महापालिका पूर्णपणे असफल, असक्षम आणि अकार्यक्षम असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना सांगितले. नागरीकांच्या मूलभूत गरजा पुरवण्यात वसई विरार महापालिकेची हेकेखोर आणि व्यापारी वृत्ती गंभीर बाब असून परिवहन सारखी मूलभूत गरज भागवणे महापालिकेला शक्य होत नसेल तर ही सुविधा सुनिश्चित करण्यासाठी महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्याचे आदेश द्यावे लागतील, असे मत हायकोर्टाने आपल्या आदेशात मांडले. (प्रतिनिधी)सरकारने काळजी घ्यावी याप्रकरणी राज्य सरकारने तात्काळ लक्ष घालावे व नागरीकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही हायकोर्टाने यावेळी दिले. पुढील सुनावणी होईपर्यंत एसटीने बस वाहतूक सुरु ठेवावी, असा महत्वाचा आदेशही मुख्य न्यायमूर्ती मंजुळा वेल्लूर आणि कुलकर्णी यांनी दिला. त्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील जनतेने सुटकेचा निश्वास तूर्तास तरी सोडला आहे.