शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वसईमधून एसटीच्या हद्दपारीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 05:20 IST

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील काही गावांमधून १ एप्रिलपासून एसटीची सेवा रद्द करण्यास शुक्रवारी उच्च न्यायालयाने

वसई : पुढील सुनावणी होईपर्यंत वसईतील शहर बस वाहतूक सुरु ठेवण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने एसटी महामंडळाला दिले. तर नागरीकांच्या मुलभूत गरजा भागवणे शक्य होत नसेल तर महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमावा लागेल असा इशाराही हायकोर्टाने वसई विरार महापालिकेला दिला. त्यामुळे ऐन परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना आलेले टेन्शन दूर झाले आहे. एसटी महामंडळाने येत्या १ एप्रिलपासून वसई आणि नालासोपारा आगारातून सुटणाºया शहरी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर एसटीने डेपोसाठी भाड्याने जागा दिली तरच शहर बससेवा सुरु करू अशी भूमिका वसई विरार महापालिकेने घेतली आहे. एसटी आणि महापालिकेमधील जागेचा गुंता सुटत नसल्याने ऐन परिक्षेत काळात विद्यार्थ्यांना मोठे टेन्शन आले होते. त्यासाठी सातवीत शिकणारा शरीन डाबरे आणि शिक्षिका डॉमणिका डाबरे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करून ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार, शेतकºयांची लाईफलाईन असलेली एसटी बंद करू नये अशी मागणी केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान वसई विरार महापालिकेचे वकिल गैरहजर राहिल्याने सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती. एसटी महामंडळाच्या वकिलांनी बाजू मांडताना एसटीला प्रचंड तोटा होत असल्याने सेवा बंद करण्यात येणार आहे. तसेच महापालिका हद्दीत संबंधित महापालिकेने परिवहन सेवा दिली पाहिज, असे सांगितले. तर याचिकर्त्यांची बाजू मांडताना अ‍ॅड. रविंद्र लोखंडे आणि अ‍ॅड. विजय कुर्ले यांनी महापालिकेच्या परिवहन सेवेतील त्रुटी उघड केल्या. केवळ नफा डोळ््यासमोर ठेऊन महापालिकाल परिहवन सेवा देत असून नागरीकाप्रती आपल्या घटनात्मक जबाबदाºया पार पाडण्यात महापालिका पूर्णपणे असफल, असक्षम आणि अकार्यक्षम असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना सांगितले. नागरीकांच्या मूलभूत गरजा पुरवण्यात वसई विरार महापालिकेची हेकेखोर आणि व्यापारी वृत्ती गंभीर बाब असून परिवहन सारखी मूलभूत गरज भागवणे महापालिकेला शक्य होत नसेल तर ही सुविधा सुनिश्चित करण्यासाठी महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्याचे आदेश द्यावे लागतील, असे मत हायकोर्टाने आपल्या आदेशात मांडले. (प्रतिनिधी)सरकारने काळजी घ्यावी याप्रकरणी राज्य सरकारने तात्काळ लक्ष घालावे व नागरीकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही हायकोर्टाने यावेळी दिले. पुढील सुनावणी होईपर्यंत एसटीने बस वाहतूक सुरु ठेवावी, असा महत्वाचा आदेशही मुख्य न्यायमूर्ती मंजुळा वेल्लूर आणि कुलकर्णी यांनी दिला. त्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील जनतेने सुटकेचा निश्वास तूर्तास तरी सोडला आहे.