शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

नवी मुंबईतील पाडकामाला स्थगिती

By admin | Updated: July 18, 2016 05:30 IST

लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर पावसाळ्याचे पुढील तीन महिने कारवाई केली जाणार नाही

नवी मुंबई : नवी मुंबईतील गावठाणांमधील अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयावरून लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर पावसाळ्याचे पुढील तीन महिने कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन देत मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई थांबवली. या कालावधीमध्ये घरे कायम करण्यासाठीचा अध्यादेश आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या २० हजार बांधकामांना तीन महिन्यांसाठी दिलासा मिळाला आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचे शासनस्तरावर प्रस्तावित आहे. ३१ डिसेंबर २०१२ पर्यंतची घरे नियमित करण्यासाठीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले आहे. याविषयी अध्यादेश काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. याविषयी सिडकोने इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट व इतर प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. परंतु अद्याप अध्यादेश नसल्याने सिडकोने व काही दिवसांपासून महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. नूतन आयुक्त मुंढे त्याबाबत आग्रही आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त संतापले असून त्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली १८ जुलैला नवी मुंबई बंदचा निर्णय घेतला होता. किमान २५ हजार हजार नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. याविषयी अहवाल शासनास पाठविला होता. (प्रतिनिधी)>तात्पुरता दिलासाप्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याने आमदार मंदा म्हात्रे व भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी लोकभावना लक्षात घेऊन पावसाळ्यात तीन महिने कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.