शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील पाडकामाला स्थगिती

By admin | Updated: July 18, 2016 05:30 IST

लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर पावसाळ्याचे पुढील तीन महिने कारवाई केली जाणार नाही

नवी मुंबई : नवी मुंबईतील गावठाणांमधील अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयावरून लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर पावसाळ्याचे पुढील तीन महिने कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन देत मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई थांबवली. या कालावधीमध्ये घरे कायम करण्यासाठीचा अध्यादेश आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या २० हजार बांधकामांना तीन महिन्यांसाठी दिलासा मिळाला आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचे शासनस्तरावर प्रस्तावित आहे. ३१ डिसेंबर २०१२ पर्यंतची घरे नियमित करण्यासाठीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले आहे. याविषयी अध्यादेश काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. याविषयी सिडकोने इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट व इतर प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. परंतु अद्याप अध्यादेश नसल्याने सिडकोने व काही दिवसांपासून महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. नूतन आयुक्त मुंढे त्याबाबत आग्रही आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त संतापले असून त्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली १८ जुलैला नवी मुंबई बंदचा निर्णय घेतला होता. किमान २५ हजार हजार नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. याविषयी अहवाल शासनास पाठविला होता. (प्रतिनिधी)>तात्पुरता दिलासाप्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याने आमदार मंदा म्हात्रे व भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी लोकभावना लक्षात घेऊन पावसाळ्यात तीन महिने कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.