शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदरवरील नव्या बांधकामांना स्थगिती

By admin | Updated: May 6, 2017 04:24 IST

लोक उष्म्यामुळे त्रासले आहेत, अशा स्थितीत पाणी हे जीवन वाचविणारे आहे. ठाणे महापालिका त्यांच्या वैधानिक कर्तव्यापासून

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोक उष्म्यामुळे त्रासले आहेत, अशा स्थितीत पाणी हे जीवन वाचविणारे आहे. ठाणे महापालिका त्यांच्या वैधानिक कर्तव्यापासून पळू शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने ९ जूनपर्यंत घोडबंदर परिसरात नव्या बांधकामांना परवानगी न देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला शुक्रवारी दिले. नागरिकांना टँकरने पाणी घेण्यास भाग पाडले जात आहे. त्यांना विकासकाच्या दयेवर जगावे लागत आहे. नागरिकांना दैनंदिन कामासाठी पुरेसा पाणीपुरवठा न करता बांधकामासाठी पुरेसे पाणी पुरवले जात आहे. बांधकामांना पाणी पुरवले नाही, तर आभाळ कोसळणार नाही किंवा नागरिकांचा मृत्यूही होणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला फटकारले. महापालिका नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करत आहे, असे म्हणत ठाणे महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील राम आपटे यांनी महापालिकेवर करण्यात आलेला आरोप फेटाळला. मात्र याचिकाकर्त्यांचे वकील व्ही. पी. पाटील यांनी महापालिकेचा दावा फेटाळला. ‘मी स्वत: घोडबंदर परिसरात राहतो. महापालिका नियमित पाणीपुरवठा करत नाही,’ असे पाटील यांनी खंडपीठाला सांगितले.घोडबंदरमधील अनेक कॉम्प्लेक्समध्ये पाणीपुरवठा केला जात नाही. त्यांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे महापालिका येथील नागरिकांना जोपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करत नाही तोपर्यंत ठाण्यात नवी बांधकामे उभारण्यास स्थगिती द्यावी, अशी विनंती ठाण्याचे रहिवासी मंगेश शेलार यांनी याचिकेद्वारे केली आहे. ‘रहिवाशांना पुरेसे पाणी मिळेल की नाही, याचा विचार न करताच नव्या बांधकामांना परवानगी दिली जाते. त्यामुळे आता नव्या बांधकामांना परवानगी नकोच,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने ९ जूनपर्यंत घोडबंदरमधील बांधकामांना कमेंन्समेंट सर्टिफिकेट व भोगवटा प्रमाणपत्र न देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला दिले.