शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

घोडबंदरवरील नव्या बांधकामांना स्थगिती

By admin | Updated: May 6, 2017 04:24 IST

लोक उष्म्यामुळे त्रासले आहेत, अशा स्थितीत पाणी हे जीवन वाचविणारे आहे. ठाणे महापालिका त्यांच्या वैधानिक कर्तव्यापासून

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोक उष्म्यामुळे त्रासले आहेत, अशा स्थितीत पाणी हे जीवन वाचविणारे आहे. ठाणे महापालिका त्यांच्या वैधानिक कर्तव्यापासून पळू शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने ९ जूनपर्यंत घोडबंदर परिसरात नव्या बांधकामांना परवानगी न देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला शुक्रवारी दिले. नागरिकांना टँकरने पाणी घेण्यास भाग पाडले जात आहे. त्यांना विकासकाच्या दयेवर जगावे लागत आहे. नागरिकांना दैनंदिन कामासाठी पुरेसा पाणीपुरवठा न करता बांधकामासाठी पुरेसे पाणी पुरवले जात आहे. बांधकामांना पाणी पुरवले नाही, तर आभाळ कोसळणार नाही किंवा नागरिकांचा मृत्यूही होणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला फटकारले. महापालिका नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करत आहे, असे म्हणत ठाणे महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील राम आपटे यांनी महापालिकेवर करण्यात आलेला आरोप फेटाळला. मात्र याचिकाकर्त्यांचे वकील व्ही. पी. पाटील यांनी महापालिकेचा दावा फेटाळला. ‘मी स्वत: घोडबंदर परिसरात राहतो. महापालिका नियमित पाणीपुरवठा करत नाही,’ असे पाटील यांनी खंडपीठाला सांगितले.घोडबंदरमधील अनेक कॉम्प्लेक्समध्ये पाणीपुरवठा केला जात नाही. त्यांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे महापालिका येथील नागरिकांना जोपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करत नाही तोपर्यंत ठाण्यात नवी बांधकामे उभारण्यास स्थगिती द्यावी, अशी विनंती ठाण्याचे रहिवासी मंगेश शेलार यांनी याचिकेद्वारे केली आहे. ‘रहिवाशांना पुरेसे पाणी मिळेल की नाही, याचा विचार न करताच नव्या बांधकामांना परवानगी दिली जाते. त्यामुळे आता नव्या बांधकामांना परवानगी नकोच,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने ९ जूनपर्यंत घोडबंदरमधील बांधकामांना कमेंन्समेंट सर्टिफिकेट व भोगवटा प्रमाणपत्र न देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला दिले.