शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

संचालक मंडळ बरखास्तीला स्थगिती

By admin | Updated: November 18, 2015 02:19 IST

महानंद संचालक मंडळ दुसऱ्यांदा बरखास्त करणाऱ्या राज्य सरकारला मंगळवारी उच्च न्यायालयाने दणका दिला. उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या निर्णयाला दुसऱ्यांदा

मुंबई : महानंद संचालक मंडळ दुसऱ्यांदा बरखास्त करणाऱ्या राज्य सरकारला मंगळवारी उच्च न्यायालयाने दणका दिला. उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या निर्णयाला दुसऱ्यांदा स्थगिती दिली.महानंदच्या संचालक मंडळाची गणपूर्ती होत नसल्याचे कारण पुढे करत, ११ संचालकांनी राजीनामा दिला नसतानाही राजीनामा दिल्याचे दाखवत यापूर्वी एकदा महानंदचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. राज्य सरकारच्या या निर्णयाला ११ संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. एक सदस्यीय खंडपीठाने संबंधित संचालकांना १५ दिवसांचे संरक्षण देत राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली.त्यानंतर राज्य सरकारने अनियमिततेच्या नावाखाली २ नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा महानंदचे संचालक मंडळ बरखास्त केले. त्यापूर्वी संचालकांना महाराष्ट्र सहकार अधिनियम कलम ७८ अंतर्गत संचालक मंडळ बरखास्त का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करत ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली. या नोटीसला सर्व संचालकांनी उत्तर दिले. तरीही त्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे म्हणत संचालक मंडळ बरखास्तीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. संचालक मंडळाने या ही निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी न्या. एम. एस. सोनक यांच्यापुढे होती.याआधीच उच्च न्यायालयाने सर्व संचालकांना १५ दिवसांचे संरक्षण दिले आहे. संचालक मंडळाने कोणत्याही प्रकारची अनियमितता केली नाही. केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे, असा युक्तिवाद संचालकांतर्फे ज्येष्ठ वकील प्रसाद ढाके-फाळके, आशुतोष कुंभकोणी आणि अ‍ॅड. सारंग आराध्ये यांनी केला. राज्य सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी राज्य सरकारचा निर्णय योग्य असून, संचालकांना काही समस्या असेल तर त्यांनी अपिलेट अ‍ॅॅथॉरिटीकडे जावे, असा मुद्दा मांडला. (प्रतिनिधी)अपिलेट अ‍ॅथॉरिटीकडे जावे!न्या. सोनक यांनी राज्य सरकारच्या बरखास्तीच्या आदेशाला स्थगिती देत संचालकांना अपिलेट अ‍ॅथॉरिटीकडे एका आठवड्यात अपील करण्याचे निर्देश दिले. तसेच अपील केल्यानंतर त्यावर तीन आठवड्यांत निर्णय घ्यावा आणि हा निर्णय संचालक मंडळाविरुद्ध गेला तर त्यावर दोन आठवड्यांची स्थगिती देण्यात यावी, असेही आदेश न्या. सोनक यांनी अपिलेट अ‍ॅथॉरिटीला दिले.