शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

विषाणू संसर्ग उठतोय हिंस्त्र श्वापदांच्या जीवावर

By admin | Updated: September 1, 2016 15:43 IST

जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून होणारा विषाणू संसर्ग जंगलातील अतिसंरक्षीत भागातील बिबट सारख्या हिंस्त्र श्वापदांच्या जीवावर उठत आहे.

अतुल जयस्वाल
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 1 -  जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून होणारा विषाणू संसर्ग जंगलातील अतिसंरक्षीत भागातील बिबट सारख्या हिंस्त्र श्वापदांच्या जीवावर उठत आहे. अकोला-वाशिम वनविभागातील मालेगाव परिक्षेत्रात गत महिनाभराच्या कालावधीत दोन बिबटांचा मृत्यू विषाणू संसर्गामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्याचे लसीकरण करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त होत आहेत.
अन्न साखळीमधील सर्वोच्च पातळीवर वाघ, बिबट हे मार्जरवर्गीय प्राणी आहेत. या प्राण्यांचे अस्तित्व जंगलातील अन्नसाखळी संतुलीत राहण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जंगलातील वातावरण अत्यंत शुद्ध व प्रदूषण विरहित असल्यामुळे हे प्राणी सहजासहजी आजाराला बळी पडत नाहीत. परंतु, जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून आता जंगलातील हिंस्त्र श्वापदांमध्ये विषाणू संसर्ग होत असल्याचे गत महिनाभरात झालेल्या घटनांमध्ये पुढे आले आहे. मालेगाव परीक्षेत्रामध्ये वाशिम जिल्ह्यातील कवरदरी शिवारात २५ जुलै रोजी अडीच वर्षाच्या बिबटाचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला. उपासमार व ट्रिपॅनोसोमा या घातक आजारांच्या विषाणूंची लागण झाल्यामुळे या बिबटाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. त्यानंतर २५ आॅगस्ट रोजी याच परिक्षेत्रात कोळेगाव शिवारात तीन वर्षाची मादी बिबट मृतावस्थेत आढळून आली. गर्भार असलेल्या या मादीचा मृत्यूही विषाणूसंसर्गामुळे झाल्याचे समोर आले. जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांना पावसाळ्यात विविध प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग होऊन ती आजारी पडतात. अशी आजारी जनावरे जंगलात गेल्यास त्यांच्या माध्यमातून विषाणूंचा प्रसार होतो. यामुळे हिंस्त्र श्वापदांना विषाणूंची लागण होण्याची दाट शक्यता असते. 
 
अकोला-वाशिम वनविभागात उरले पाच बिबट
अकोला-वाशिम वनविभागात एकून सात बिबट असल्याची माहिती आहे. यापैकी दोन बिबटांचा मृत्यू झाल्यामुळे आता केवळ पाच बिबटच शिल्लक आहेत. विषाणूंचा संसर्ग असाच होत राहिला, तर या पाच बिबटांचे अस्तित्वही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  वन्यजीव विभागाच्यावतीने जंगलालगतच्या गावांमध्ये पाळीव प्राण्यांचे लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
हिंस्त्र श्वापदांना विषाणू संसर्ग होणे ही गंभीर बाब आहे. याबाबत तज्ज्ञांचे मत घेऊन जंगलालगतच्या गावांमध्ये पाळीव प्राण्यांचे लसीकरण तसेच इतर उपाययोजना करू. 
 - प्र. ज. लोणकर उवनसंरक्षक, प्रादेशिक वनविभाग, अकोला.