शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विषाणू संसर्ग उठतोय हिंस्त्र श्वापदांच्या जीवावर

By admin | Updated: September 1, 2016 15:43 IST

जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून होणारा विषाणू संसर्ग जंगलातील अतिसंरक्षीत भागातील बिबट सारख्या हिंस्त्र श्वापदांच्या जीवावर उठत आहे.

अतुल जयस्वाल
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 1 -  जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून होणारा विषाणू संसर्ग जंगलातील अतिसंरक्षीत भागातील बिबट सारख्या हिंस्त्र श्वापदांच्या जीवावर उठत आहे. अकोला-वाशिम वनविभागातील मालेगाव परिक्षेत्रात गत महिनाभराच्या कालावधीत दोन बिबटांचा मृत्यू विषाणू संसर्गामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्याचे लसीकरण करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त होत आहेत.
अन्न साखळीमधील सर्वोच्च पातळीवर वाघ, बिबट हे मार्जरवर्गीय प्राणी आहेत. या प्राण्यांचे अस्तित्व जंगलातील अन्नसाखळी संतुलीत राहण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जंगलातील वातावरण अत्यंत शुद्ध व प्रदूषण विरहित असल्यामुळे हे प्राणी सहजासहजी आजाराला बळी पडत नाहीत. परंतु, जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून आता जंगलातील हिंस्त्र श्वापदांमध्ये विषाणू संसर्ग होत असल्याचे गत महिनाभरात झालेल्या घटनांमध्ये पुढे आले आहे. मालेगाव परीक्षेत्रामध्ये वाशिम जिल्ह्यातील कवरदरी शिवारात २५ जुलै रोजी अडीच वर्षाच्या बिबटाचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला. उपासमार व ट्रिपॅनोसोमा या घातक आजारांच्या विषाणूंची लागण झाल्यामुळे या बिबटाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. त्यानंतर २५ आॅगस्ट रोजी याच परिक्षेत्रात कोळेगाव शिवारात तीन वर्षाची मादी बिबट मृतावस्थेत आढळून आली. गर्भार असलेल्या या मादीचा मृत्यूही विषाणूसंसर्गामुळे झाल्याचे समोर आले. जंगलालगतच्या गावांमधील पाळीव प्राण्यांना पावसाळ्यात विविध प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग होऊन ती आजारी पडतात. अशी आजारी जनावरे जंगलात गेल्यास त्यांच्या माध्यमातून विषाणूंचा प्रसार होतो. यामुळे हिंस्त्र श्वापदांना विषाणूंची लागण होण्याची दाट शक्यता असते. 
 
अकोला-वाशिम वनविभागात उरले पाच बिबट
अकोला-वाशिम वनविभागात एकून सात बिबट असल्याची माहिती आहे. यापैकी दोन बिबटांचा मृत्यू झाल्यामुळे आता केवळ पाच बिबटच शिल्लक आहेत. विषाणूंचा संसर्ग असाच होत राहिला, तर या पाच बिबटांचे अस्तित्वही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  वन्यजीव विभागाच्यावतीने जंगलालगतच्या गावांमध्ये पाळीव प्राण्यांचे लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
हिंस्त्र श्वापदांना विषाणू संसर्ग होणे ही गंभीर बाब आहे. याबाबत तज्ज्ञांचे मत घेऊन जंगलालगतच्या गावांमध्ये पाळीव प्राण्यांचे लसीकरण तसेच इतर उपाययोजना करू. 
 - प्र. ज. लोणकर उवनसंरक्षक, प्रादेशिक वनविभाग, अकोला.