शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

महामार्गाच्या कडेकडेने ‘पाहणी’

By admin | Updated: January 6, 2015 02:14 IST

दुष्काळी पाहणीसाठी आलेल्या राज्यपाल विद्यासागर राव यांनी राष्ट्रीय महामार्गालगत शेतातील पलंगावर ठेवलेल्या धान्याची पाहणी केली़

उस्मानाबाद : दुष्काळी पाहणीसाठी आलेल्या राज्यपाल विद्यासागर राव यांनी राष्ट्रीय महामार्गालगत शेतातील पलंगावर ठेवलेल्या धान्याची पाहणी केली़ त्यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उभी ज्वारी पायदळी तुडविल्याने शेतकऱ्याचेच नुकसान झाले़ वडगाव (सि) येथे लावण्यात आलेल्या स्टॉलवर राज्यपाल गेल्यानंतर केवळ विद्यार्थी, मास्तर अन् कर्मचारीच उपस्थित असल्याचे दिसून आले़ राज्यपालांचा दौरा निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ वडगाव, यमगरवाडी व तुळजापूर या तीन ठिकाणी राज्यपालांच्या भेटी निश्चित करण्यात आल्या़ सकाळी पावणे अकराच्या सुमारास नियोजित वेळेनुसार राज्यपालांचे वडगावमध्ये आगमन झाले़ त्यांनी आजींबर मोरे यांच्या शेतातील पलंगावर ठेवलेल्या सोयाबीन काडासह इतर पिकांची पाहणी केली़ सोबतच अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफाही शेतात घुसल्याने मोरे यांच्या ज्वारीचे नुकसान झाले़ या पाहणीनंतर राव यांचे वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील कार्यक्रमस्थळी आगमन झाले़ त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसह येथे आल्याचे सांगत तुमच्या व्यथा सांगा, असे आवाहन केले़ काही शेतकरी वजा पुढाऱ्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या़ यावेळी समाधान योजनेंतर्गत काही ग्रामस्थांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले़ राज्यपालांचा कार्यक्रम झाल्यानंतर अनेक अधिकारी तुळजापूर, यमगरवाडीकडे रवाना झाले़ शेतकरी, वडगाव ग्रामस्थांनीही आपापले काम करण्यास पसंती दिली़ समाधान योजनेंतर्गत लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये नंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी फेरफटका मारून पाहणी केली़ अनेक स्टॉलमध्ये कर्मचारी निवांत बसून होते़ (प्रतिनिधी)शेतकरीही हवालदिलशेतकरी आरजींबा मोरे यांच्या शेतात राज्यपालांनी पाहणी केली़ या मोरे कुटुंबास सात एकर शेती आहे़ या शेतीत ३२०० रुपये किलोचे कांद्याचे बियाणे आणून पेरणी केली होती़ मात्र उत्पन्नातील ४० कट्ट्यांची ६००० रुपये पट्टी आली आहे़ यावेळी शेतकरी बालाजी मोरे हे राज्यपाल राव यांना शेतातील परिस्थितीची माहिती देण्यासाठी गेले होते़ मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना राव यांच्याशी चर्चा करण्याची संधीच दिली नाही़