शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

ब्रिटीशकालीन कळवा पुलाचे सर्वेक्षण सुरु

By admin | Updated: June 12, 2014 04:22 IST

ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या कळवा खाडीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाचा सर्व्हे करण्याचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले आहे.

ठाणे : ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या कळवा खाडीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाचा सर्व्हे करण्याचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले आहे. दोन आठवडे हा सर्व्हे सुरू राहणार असून, त्यानंतर हा पूल वाहतुकीस योग्य आहे अथवा नाही याचा अहवाल सादर होणार आहे. त्यानंतरच या पुलावरून चारचाकी वाहनांना प्रवेश द्यायचा अथवा नाही, हेसुद्धा स्पष्ट होणार असल्याचे पालिकेने म्हटले.कळव्याला ठाण्याशी जोडण्यासाठी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी या पुलाची निर्मिती केली होती. दगडांचा वापर करून हा पूल उभारण्यात आला आहे. परंतु दीड वर्षापूर्वी या पुलाच्या बुरुजाचे काही दगड निखळू लागल्याने तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यानंतर, या पुलाला काहीशी डागडुजी करून हा पूल वाहतुकीस योग्य आहे अथवा नाही, याची शहानिशा केल्यानंतर त्या ठिकाणावरून दुचाकी आणि तीनचाकी अशा हलक्या वाहनांना प्रवेश खुला करण्यात आला आहे. आता महापालिकेने या पुलाचा सर्व्हे करण्याचे काम हाती घेतले आहे. बुधवारपासून या कामाला सुरुवात झाली असून यासाठी दिल्ली मेड कंपनी आणि आयआयटी रोडकी यांच्या माध्यमातून या पुलाच्या खालच्या बाजूस सेन्सर बसवण्यात आले आहेत. यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या सेन्सरमध्ये या पुलावरून चारचाकी वाहने जाऊ शकतात का, याचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी दुपारच्या वेळेस चारचाकी वाहनांना या पुलावरून प्रवेश दिला जाणार आहे. तसेच दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचाही अभ्यास केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. दोन आठवड्यांनंतर या पुलाची वाहन क्षमता लक्षात घेतली जाणार आहे. त्यानंतर, चारचाकी वाहनांसाठी हा पूल सक्षम आहे का, याचा अहवाल दिला जाणार आहे. या अहवालातून हा पूल वापरास योग्य आहे अथवा नाही, याची माहिती समोर येईल. (वार्ताहर)