शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

आत्मसमर्पित नक्षलवादी पास झाले

By admin | Updated: August 13, 2016 02:59 IST

येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात शुक्रवारी आत्मसमर्पण केलेल्या ५६ नक्षलवाद्यांनी ‘गांधी शांती विचार’ परीक्षा दिली आणि सर्व जण त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाले. आत्मसमर्पण

गडचिरोली : येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात शुक्रवारी आत्मसमर्पण केलेल्या ५६ नक्षलवाद्यांनी ‘गांधी शांती विचार’ परीक्षा दिली आणि सर्व जण त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांचे वैचारिकदृष्ट्या परिवर्तन होऊन त्यांनी कायमस्वरूपी शांतीचा मार्ग अवलंबावा, या उद्देशाने पुणे येथील आदर्श मित्र मंडळ, लक्ष्मीनृसिंह पतसंस्था व जिल्हा पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही परीक्षा घेण्यात आली.मानवी जीवन उन्नत करणाऱ्या अहिंसेच्या मार्गावरून वाटचाल करावी, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. संस्कारक्षम वयातच नक्षलवादी युवकांना नक्षल चळवळीमध्ये घेऊन जातात. त्यानंतर त्यांच्यावर सातत्याने माओवादी व हिंसावादी विचारसरणीचा मारा केला जातो. आत्मसमर्पणानंतरही जुने विचार पुन्हा कधी उफाळून येतील, हे सांगता येत नाही. हिंसेंचा विचार त्यांच्या मनातून कायमचा पुसला जावा आणि त्यांनी मानवी जीवन उन्नत करणाऱ्या अहिंसेच्या मार्गावरुन वाटचाल करावी, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. जिल्हाभरातील सुमारे ५६ आत्मसमर्पितांनी ही परीक्षा दिली. परीक्षेपूर्वी त्यांना महात्मा गांधींच्या शांतीची पुस्तके अभ्यासासाठी देण्यात आली. त्याचबरोबर महात्मा गांधीजींच्या विचारासंदर्भात त्यांना आठवडाभर मार्गदर्शनही करण्यात आले. ८० गुणांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका त्यांना देण्यात आली. या परीक्षेमध्ये जानो सैनू हेडो ही प्रथम आली असून तिला ८० पैकी ७९ गुण मिळाले. साईनाथ पेंदाम याला ८० पैकी ७८ गुण मिळाले असून तो दुसरा आला आहे. तर आशा हिचामी हिला ८० पैकी ७५ गुण मिळाले असून ती तृतीय आली आहे. उत्तीर्ण झालेल्यांना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप व लक्ष्मीनृसिंह पतसंस्थेचे श्रीनिवास सुंचूवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)