शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

आत्मसमर्पित नक्षलवादी पास झाले

By admin | Updated: August 13, 2016 02:59 IST

येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात शुक्रवारी आत्मसमर्पण केलेल्या ५६ नक्षलवाद्यांनी ‘गांधी शांती विचार’ परीक्षा दिली आणि सर्व जण त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाले. आत्मसमर्पण

गडचिरोली : येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात शुक्रवारी आत्मसमर्पण केलेल्या ५६ नक्षलवाद्यांनी ‘गांधी शांती विचार’ परीक्षा दिली आणि सर्व जण त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांचे वैचारिकदृष्ट्या परिवर्तन होऊन त्यांनी कायमस्वरूपी शांतीचा मार्ग अवलंबावा, या उद्देशाने पुणे येथील आदर्श मित्र मंडळ, लक्ष्मीनृसिंह पतसंस्था व जिल्हा पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही परीक्षा घेण्यात आली.मानवी जीवन उन्नत करणाऱ्या अहिंसेच्या मार्गावरून वाटचाल करावी, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. संस्कारक्षम वयातच नक्षलवादी युवकांना नक्षल चळवळीमध्ये घेऊन जातात. त्यानंतर त्यांच्यावर सातत्याने माओवादी व हिंसावादी विचारसरणीचा मारा केला जातो. आत्मसमर्पणानंतरही जुने विचार पुन्हा कधी उफाळून येतील, हे सांगता येत नाही. हिंसेंचा विचार त्यांच्या मनातून कायमचा पुसला जावा आणि त्यांनी मानवी जीवन उन्नत करणाऱ्या अहिंसेच्या मार्गावरुन वाटचाल करावी, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. जिल्हाभरातील सुमारे ५६ आत्मसमर्पितांनी ही परीक्षा दिली. परीक्षेपूर्वी त्यांना महात्मा गांधींच्या शांतीची पुस्तके अभ्यासासाठी देण्यात आली. त्याचबरोबर महात्मा गांधीजींच्या विचारासंदर्भात त्यांना आठवडाभर मार्गदर्शनही करण्यात आले. ८० गुणांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका त्यांना देण्यात आली. या परीक्षेमध्ये जानो सैनू हेडो ही प्रथम आली असून तिला ८० पैकी ७९ गुण मिळाले. साईनाथ पेंदाम याला ८० पैकी ७८ गुण मिळाले असून तो दुसरा आला आहे. तर आशा हिचामी हिला ८० पैकी ७५ गुण मिळाले असून ती तृतीय आली आहे. उत्तीर्ण झालेल्यांना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप व लक्ष्मीनृसिंह पतसंस्थेचे श्रीनिवास सुंचूवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)