शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाअभावी रखडली आरोपींची शरणागती

By admin | Updated: May 13, 2014 23:41 IST

कार्तिक जोशी हत्याकांडातील १३ आरोपींची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; परंतु यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचले नसल्याने हत्याकांडातील आरोपींची शरणागती रखडली आहे.

अकोला: कार्तिक जोशी हत्याकांडातील १३ आरोपींची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; परंतु यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचले नसल्याने हत्याकांडातील आरोपींची शरणागती रखडली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये न्यायालयाचे आदेश जिल्हा न्यायालयात पोहोचले, तर आरोपी न्यायालयाला शरण येण्याची शक्यता आहे. कार्तिक जोशी हत्याकांडातील आरोपी मनसेचे नगरसेवक राजेश काळे, बजरंग नागे, राहुल ठाकूर, संजय चव्हाण, विकी पटोने, मंगेश गमे, शेखर शर्मा, नितीन चाळसे, जय पटोने, नितीन संकट, संदीप चरण खोडे, राहुल ठाकूर, सागर घनबहादूर, राकेश खोडे या १३ आरोपींना जुने शहर पोलिसांनी अटक केली होती. पोलिस कोठडीत राहिल्यानंतर आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला होता. आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी संदीप मदनलाल जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ८ एप्रिल रोजी नागपूर खंडपीठाने जामीन देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करून आरोपींनी सात दिवसांमध्ये शरण येण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशाला आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले; मात्र सर्वोच्च न्यायालयानेही नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवत आरोपींची याचिका फेटाळली. यावेळी सरकारकडून ॲड. मायी यांनी युक्तिवाद केला, तर तक्रारकर्त्यातर्फे संदीप जोशींची बाजू ॲड. दिव्यांक मोहता, ॲड. शशांक देशपांडे आणि ॲड. सत्यनारायण जोशी यांनी मांडली. याचिका फेटाळल्यानंतरचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अद्यापपर्यंत जिल्हा न्यायालयात प्राप्त झाला नसल्याने आरोपी न्यायालयाला शरण गेले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आदेश प्राप्त होताच सर्व आरोपी न्यायालयाला शरण येण्याची शक्यता आहे. २२ मेपर्यंत सवार्ेच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले तर आरोपींना न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. नजर घटनेवर... राम नगरातील युवा सेनेचा कार्यकर्ता असलेल्या कार्तिक जोशीवर २१ मे २०१३ रोजी पूर्ववैमनस्त्यातून वाशिम बायपास रोडवरील गीता नगर परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांनी कार्तिकची मोटारसायकलही पेटवून दिली होती. गंभीर जखमी झालेल्या कार्तिकला खासगी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा २५ मे रोजी मृत्यू झाला होता.