शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाअभावी रखडली आरोपींची शरणागती

By admin | Updated: May 13, 2014 23:41 IST

कार्तिक जोशी हत्याकांडातील १३ आरोपींची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; परंतु यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचले नसल्याने हत्याकांडातील आरोपींची शरणागती रखडली आहे.

अकोला: कार्तिक जोशी हत्याकांडातील १३ आरोपींची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; परंतु यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचले नसल्याने हत्याकांडातील आरोपींची शरणागती रखडली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये न्यायालयाचे आदेश जिल्हा न्यायालयात पोहोचले, तर आरोपी न्यायालयाला शरण येण्याची शक्यता आहे. कार्तिक जोशी हत्याकांडातील आरोपी मनसेचे नगरसेवक राजेश काळे, बजरंग नागे, राहुल ठाकूर, संजय चव्हाण, विकी पटोने, मंगेश गमे, शेखर शर्मा, नितीन चाळसे, जय पटोने, नितीन संकट, संदीप चरण खोडे, राहुल ठाकूर, सागर घनबहादूर, राकेश खोडे या १३ आरोपींना जुने शहर पोलिसांनी अटक केली होती. पोलिस कोठडीत राहिल्यानंतर आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला होता. आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी संदीप मदनलाल जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ८ एप्रिल रोजी नागपूर खंडपीठाने जामीन देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करून आरोपींनी सात दिवसांमध्ये शरण येण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशाला आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले; मात्र सर्वोच्च न्यायालयानेही नागपूर खंडपीठाचा आदेश कायम ठेवत आरोपींची याचिका फेटाळली. यावेळी सरकारकडून ॲड. मायी यांनी युक्तिवाद केला, तर तक्रारकर्त्यातर्फे संदीप जोशींची बाजू ॲड. दिव्यांक मोहता, ॲड. शशांक देशपांडे आणि ॲड. सत्यनारायण जोशी यांनी मांडली. याचिका फेटाळल्यानंतरचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अद्यापपर्यंत जिल्हा न्यायालयात प्राप्त झाला नसल्याने आरोपी न्यायालयाला शरण गेले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आदेश प्राप्त होताच सर्व आरोपी न्यायालयाला शरण येण्याची शक्यता आहे. २२ मेपर्यंत सवार्ेच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले तर आरोपींना न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. नजर घटनेवर... राम नगरातील युवा सेनेचा कार्यकर्ता असलेल्या कार्तिक जोशीवर २१ मे २०१३ रोजी पूर्ववैमनस्त्यातून वाशिम बायपास रोडवरील गीता नगर परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांनी कार्तिकची मोटारसायकलही पेटवून दिली होती. गंभीर जखमी झालेल्या कार्तिकला खासगी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा २५ मे रोजी मृत्यू झाला होता.