शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

हिंदू पंडितांच्या मालमत्तेसाठी सर्जिकल स्ट्राइक करा - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2016 10:59 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने बेनामी मालमत्तांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी..

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 28 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने बेनामी मालमत्तांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी सरकारला चिमटे काढले आहेत. 
 
नोटाबंदीनंतर विदेशातून दमडाही परत आला नाही. स्वदेशातल्या भांडवलदार, धनदांडग्यांचे नोटाबंदीनंतर एक नया पैशाचे नुकसान झाले नाही; पण सामान्य जनता मात्र या सर्व प्रकरणात होरपळून निघाली आहे. आता बेनामी संपत्तीबाबत सरकारने नक्की काय करायचे ठरवले आहे? नोटाबंदीप्रमाणे ‘बेनामी संपत्ती’बाबतच्या कठोर पावलांखाली पुन्हा एकदा गरीब आणि मध्यमवर्गीय चिरडले जाऊ नयेत असे उद्धव यांनी म्हटले आहे. 
 
खरे बेनामी संपत्तीवाले सर्व काही कायद्याच्या चौकटीत बसून राहतील नामानिराळे आणि सामान्य जनतेच्या अंगावर बर्‍यापैकी कपडे, चड्डी-बनियन दिसतेय ती बेनामी संपत्ती म्हणून भररस्यात उतरवली जाईल, असे होऊ नये. धनदांडगे व काळा बाजारवाले यांचे कंबरडे मोडण्याची गर्जना करीत ज्या लाथा उचलल्या जातात त्या लाथा सामान्यांच्याच कंबरड्यात बसतात असा टोला मोदी सरकारला लगावला आहे. 
 
बेनामी इस्टेटींची गोळाबेरीज करत सर्जिकल स्ट्राइक करण्याआधी कश्मीर खोर्‍यांतील हिंदू पंडितांच्या बेनामी नव्हे तर कायदेशीर इस्टेटी परत मिळवून देण्यासाठी सरकार एखादा सर्जिकल स्ट्राइक करणार आहे काय? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- नामी इस्टेटींची गोळाबेरीज करत सर्जिकल स्ट्राइक करण्याआधी कश्मीर खोर्‍यांतील हिंदू पंडितांच्या बेनामी नव्हे तर कायदेशीर इस्टेटी परत मिळवून देण्यासाठी सरकार एखादा सर्जिकल स्ट्राइक करणार आहे काय? बेनामी व इनामी इस्टेटींच्या घोळात कश्मिरी पंडितांच्या इस्टेटीचा बट्ट्याबोळ होऊ नये. मोदी यांनी बेइमानांच्या विरोधात जो हल्लाबोल सुरू केला आहे तो मस्त व अभिनंदनास पात्र आहे. मोदी यांचे कौतुक तरी किती करावे? करावे तेवढे थोडेच!! 
 
- पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. त्यामुळेच ते ज्या जनता कार्यक्रमात जातील तेथे समोरच्या बाजूने फक्त ‘मोदीऽऽ मोदीऽऽ’ अशाच घोषणा ऐकू येतात. हे सर्व घोषणाबाज लोक विद्यार्थी परिषदेचे असल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केला होता. (आम्ही त्याच्याशी सहमत नाही.) अर्थात प. बंगाल, बिहार, केरळ विधानसभा निवडणुकांतही जाहीर सभांतून अशा गर्जना झाल्याच होत्या. तेथे निकाल वेगळे लागले तरी मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच राहिली व ‘नोटाबंदी’नंतर त्यांची लोकप्रियता सातव्या अस्मानावर पोहोचली असल्याचे भाजप प्रचारकांचे म्हणणे आहे. 
 
-बेनामी संपत्ती शोधण्याची मोहीम उघडून मोदी यांनी राष्ट्रभक्तीचा दाखलाच दिला आहे. अनेक नेते, उद्योजक, व्यापारी, अंडरवर्ल्डचे लोक, परदेशांत ये-जा करणारे अनिवासी हिंदुस्थानी ‘कर’ चुकवून मालमत्तांत गुंतवणूक करतात, ही बेइमानीच आहे. पण आपल्या देशात ‘बेइमान’ कोणास म्हणावे याबाबत आजही संभ्रमच दिसत आहे. धनदांडग्यांनी विदेशात दडवलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी यांनी ‘नोटाबंदी’चा सर्जिकल स्ट्राइक केला. पण सत्य असे की, विदेशातून दमडाही परत आला नाही. स्वदेशातल्या भांडवलदार, धनदांडग्यांचे नोटाबंदीनंतर एक नया पैशाचे नुकसान झाले नाही; पण सामान्य जनता मात्र या सर्व प्रकरणात होरपळून निघाली आहे. आता बेनामी संपत्तीबाबत सरकारने नक्की काय करायचे ठरवले आहे? 
 
- नोटाबंदीप्रमाणे ‘बेनामी संपत्ती’बाबतच्या कठोर पावलांखाली पुन्हा एकदा गरीब आणि मध्यमवर्गीय चिरडले जाऊ नयेत. खरे बेनामी संपत्तीवाले सर्व काही कायद्याच्या चौकटीत बसून राहतील नामानिराळे आणि सामान्य जनतेच्या अंगावर बर्‍यापैकी कपडे, चड्डी-बनियन दिसतेय ती बेनामी संपत्ती म्हणून भररस्यात उतरवली जाईल, असे होऊ नये. धनदांडगे व काळा बाजारवाले यांचे कंबरडे मोडण्याची गर्जना करीत ज्या लाथा उचलल्या जातात त्या लाथा सामान्यांच्याच कंबरड्यात बसतात. ‘नोटाबंदी’नंतर एकतरी काळा पैसेवाला जेलात खडी फोडायला गेला आहे काय? याचे उत्तर द्या. बेनामी प्रॉपर्टी कायदा झाल्यावर काय व्हायचे ते होईल. 
 
- पण या निर्णयाची बोंब सुटताच सर्वत्र बेनामीवाल्यांनी त्यांच्या इस्टेटी चोवीस तासात ‘पवित्र’ करून घेतल्या असतील, जसे ‘नोटाबंदी’ घोषणेनंतर शेकडो- कोटी रुपयांबाबत घडले. कायद्याच्या पळवाटा व भगदाडे जणू या लक्ष्मीपुत्रांसाठीच ठेवली आहेत. बाकी सामान्य जनतेने त्याच कायद्याच्या टाचेखाली चिरडायचे ही सध्या रीतच बनली आहे. उरी हल्ल्यानंतर ‘सर्जिकल स्ट्राइक’ हा शब्द खमंग ढोकळ्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या जिभेवर तरंगतो आहे. पण ‘सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकड्यांचे कंबरडे साफ मोडले व आता त्यांची बोलतीच बंद झाली,’ अशा विजयी आरोळ्या ठोकणार्‍यांना नंतरच्या पाक प्रतिहल्ल्यानंतर जणू मानसिक मूर्च्छाच आली. सर्जिकल स्ट्राइकनंतरही पाकिस्तानची दहशतवादी मस्ती कायम असून त्यानंतरही आपले पन्नासच्या वर जवान पाक हल्ल्यात शहीद झाले आहेत. यास दुर्दैवच म्हणावे लागेल! त्यामुळे सर्जिकल स्ट्राइकच्या तुतार्‍या फुंकणे बंद झाले असले तरी राजकीय सर्जिकल स्ट्राइकच्या पिपाण्या रोज नव्याने वाजत आहेत. अर्थात राजकारणात हे असे घडायचेच. सीमेवरील जवानांचे प्राण वाचवता येत नसतील तर बेइमान नक्की कोण? हा प्रश्‍न विचारला जाऊ शकतो.