शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

हृदयाच्या झडपांसाठी पाच वेळा शस्त्रक्रिया

By admin | Updated: March 27, 2016 01:37 IST

हृदयाच्या झडपा अकार्यक्षम झाल्यामुळे चार वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही हृदयाच्या झडपांच्या कार्यात अडथळे येत असल्यामुळे महिलेच्या झडपांसाठी केलेली पाचवी शस्त्रक्रिया

मुंबई : हृदयाच्या झडपा अकार्यक्षम झाल्यामुळे चार वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही हृदयाच्या झडपांच्या कार्यात अडथळे येत असल्यामुळे महिलेच्या झडपांसाठी केलेली पाचवी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या शस्त्रक्रियेसाठी तब्बल १२ तास लागले. जगात पहिल्यांदाच हृदयाच्या झडपांसाठी पाचवेळा शस्त्रक्रिया केल्याची घटना असल्याचे हृदयविकार शल्यचिकित्सक डॉ. रमाकांत पांडा यांचे म्हणणे आहे. केम्स कॉर्नर येथे राहणाऱ्या पुष्पा सराफ (६७) यांना १९९८ साली पहिल्यांदा हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. पुष्पा त्यांच्या हृदयाच्या झडपांचे कार्य योग्य पद्धतीने होत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यांच्या झडपांमधून गळती होत असल्यामुळे एरॉटिक वॉल्व रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजे २००४मध्ये त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागला. या वेळी झडपांच्या बाजूने गळती होत असल्याचे निदान झाले. म्हणून डॉक्टरांनी पुन्हा (री डू) एरॉटिक वॉल्व रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली. पहिल्या दोन्ही शस्त्रक्रिया मुंबईत झाल्या होत्या. मात्र, दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन महिन्यांत पुष्पा यांच्या झडपांना संसर्ग झाला. २००५मध्ये संसर्ग झालेल्या झडपांची तिसऱ्यांदा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अमेरिकेत करण्यात आली. मात्र, २०१५मध्ये त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. हा त्रास १० महिन्यांत वाढत गेला. ९ जानेवारी २०१६ रोजी ट्रान्स कॅथेटर एरॉटिक रिप्लेसमेंट (टावी) शस्त्रक्रिया एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी पुष्पा यांना पुन्हा त्रास जाणवू लागला. त्या वेळी असे लक्षात आले की, ‘टावी’ करून बसवलेली झडप हृदयात सरकली आहे. त्यामुळे हृदयाचे कार्य योग्य पद्धतीने होत नाही. म्हणून त्यांना काही आठवड्यांपूर्वी पेसमेकर बसवण्यात आला. (प्रतिनिधी)पहिल्यांदा हृदयाची शस्त्रक्रिया करण्यापेक्षा दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा शस्त्रक्रिया करणे अधिक कठीण असते. कारण, एकदा हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यावर अवयव जोडले जातात. पाचव्या शस्त्रक्रियेत त्यांच्या हृदयात घसरलेली झडप काढण्यात आली. जुन्या झडपेच्या जागी नवीन झडप बसवण्यात आली. बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या ४० वर्षांत हृदयविकारांत चौपट वाढ झाली आहे. - डॉ. रमाकांत पांडा, हृदयविकार शल्यचिकित्सक