शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

सुप्रीम कन्स्ट्रक्शन काळ्या यादीत

By admin | Updated: March 15, 2016 01:42 IST

कोल्हापूर-सांगली महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कंत्राटदार कंपनीकडून काढून ते केंद्र सरकारकडून केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली

मुंबई : कोल्हापूर-सांगली महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कंत्राटदार कंपनीकडून काढून ते केंद्र सरकारकडून केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली खरी, पण त्यांच्या घोषणेला नियमांचा अटकाव असल्याचे आज विधानसभेत स्पष्ट झाले. अर्धवट पूर्ण झालेले प्रकल्प मध्येच केंद्राकडे हस्तांतरित करता येत नाहीत, असा नियम असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. डॉ.सुजित मिणचेकर, राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील आदी सदस्यांनी या महामार्गाचे काम निकृष्ट होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनी या रस्त्याचे काम करीत असून, या कामाबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील, तसेच पनवेल-इंदापूर मार्गाचे कामही याच कंपनीकडेअसून, ही कंपनी अतिशय धिम्या गतीने, मध्ये-मध्ये काम बंद ठेवत कामे करते. त्यामुळे या कंपनीला नवीन कामे देऊ नयेत, असे आदेश दिले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तथापि, या कंपनीने नवीन कामासाठी निविदा भरली, तर तिला अटकाव करता येणार नाही. अटकाव करायचाच तर तिला काळ्या यादीत टाकावेच लागेल, असा मुद्दा सुरेश हाळणकर यांनी उपस्थित करताच कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची घोषणा पाटील यांनी केली. सध्या या कंपनीकडे असलेली कामे त्यांच्याचकडून पूर्ण करून घेण्यात येतील. कामातील दिरंगाईबद्दल कंपनीला दरदिवशी दंड केला जात आहे. सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीकडून काम काढून घेणे व्यवहार्य होणार नाही. त्यांच्या मानगुटीवर बसून काम करवून घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. कोल्हापूरप्रमाणे कोल्हापूर-सांगली मार्गही टोलमुक्त करण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र, मंत्री महोदयांनी ती अमान्य केली. कोल्हापुरात अंतर्गत रस्त्यांवर टोल होता, म्हणून तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पाटील म्हणाले. असेच बारामतीचेही आहे, मग तिथेही टोल रद्द करणार का, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असता, ‘बारामतीतून जनमताचा रेटा आला, तर विचार करू, असे उत्तर पाटील यांनी हसत हसत दिले.हलक्या चारचाकी वाहनांना सरकारने राज्यात टोलमाफी दिली आहे. यात दीड-दोन कोटी रुपये किमतीच्या कार्सनादेखील टोलमाफी देणे योग्य होते का, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. जयदत्त क्षीरसागर, सुधीर गाडगीळ यांनी उपप्रश्न विचारले. (विशेष प्रतिनिधी)