शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
3
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
4
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
5
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
6
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
7
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
8
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
10
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
11
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
12
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
13
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
14
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
15
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
16
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
17
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
18
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
19
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
20
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

सुप्रीम कन्स्ट्रक्शन काळ्या यादीत

By admin | Updated: March 15, 2016 01:42 IST

कोल्हापूर-सांगली महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कंत्राटदार कंपनीकडून काढून ते केंद्र सरकारकडून केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली

मुंबई : कोल्हापूर-सांगली महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कंत्राटदार कंपनीकडून काढून ते केंद्र सरकारकडून केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली खरी, पण त्यांच्या घोषणेला नियमांचा अटकाव असल्याचे आज विधानसभेत स्पष्ट झाले. अर्धवट पूर्ण झालेले प्रकल्प मध्येच केंद्राकडे हस्तांतरित करता येत नाहीत, असा नियम असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. डॉ.सुजित मिणचेकर, राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील आदी सदस्यांनी या महामार्गाचे काम निकृष्ट होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनी या रस्त्याचे काम करीत असून, या कामाबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील, तसेच पनवेल-इंदापूर मार्गाचे कामही याच कंपनीकडेअसून, ही कंपनी अतिशय धिम्या गतीने, मध्ये-मध्ये काम बंद ठेवत कामे करते. त्यामुळे या कंपनीला नवीन कामे देऊ नयेत, असे आदेश दिले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तथापि, या कंपनीने नवीन कामासाठी निविदा भरली, तर तिला अटकाव करता येणार नाही. अटकाव करायचाच तर तिला काळ्या यादीत टाकावेच लागेल, असा मुद्दा सुरेश हाळणकर यांनी उपस्थित करताच कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची घोषणा पाटील यांनी केली. सध्या या कंपनीकडे असलेली कामे त्यांच्याचकडून पूर्ण करून घेण्यात येतील. कामातील दिरंगाईबद्दल कंपनीला दरदिवशी दंड केला जात आहे. सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीकडून काम काढून घेणे व्यवहार्य होणार नाही. त्यांच्या मानगुटीवर बसून काम करवून घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. कोल्हापूरप्रमाणे कोल्हापूर-सांगली मार्गही टोलमुक्त करण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र, मंत्री महोदयांनी ती अमान्य केली. कोल्हापुरात अंतर्गत रस्त्यांवर टोल होता, म्हणून तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पाटील म्हणाले. असेच बारामतीचेही आहे, मग तिथेही टोल रद्द करणार का, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला असता, ‘बारामतीतून जनमताचा रेटा आला, तर विचार करू, असे उत्तर पाटील यांनी हसत हसत दिले.हलक्या चारचाकी वाहनांना सरकारने राज्यात टोलमाफी दिली आहे. यात दीड-दोन कोटी रुपये किमतीच्या कार्सनादेखील टोलमाफी देणे योग्य होते का, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. जयदत्त क्षीरसागर, सुधीर गाडगीळ यांनी उपप्रश्न विचारले. (विशेष प्रतिनिधी)