शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या दुर्लक्षामुळेच शेतकरी समस्याग्रस्त : सुप्रिया सुळे

By admin | Updated: February 15, 2017 21:20 IST

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असून

नाशिक : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असून, शेतकऱ्यांविषयी सरकारच्या या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्त्या करण्याची वेळ आली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, सरकारचे शेतकरी विरोधी धोरणच यासाठी जबाबदार असल्याचा आरोप करताना आघाडी सरकार विरोधात शेतकरी हिताचा बनाव करणाऱ्या संघटना आज सत्तेत सहभागी असून, त्यांचे नेते गप्प का आहेत, असा सवालही उपस्थित करीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवरही निशाना साधला. नाशिक येथील वालझाडे मंगल कार्यालयात महिला मेळाव्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी येवला येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी शेतात पेटवून दिलेले कांदे उंचावून युती सरकारने शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेत लोटल्याचे सांगितले. डोंगरे यांच्या शेतातील जळालेले कांदे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यापर्यंत पोहोचविणार असून, उद्धव ठाकरे यांनाही शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी यातील काही जळालेले कांदे पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व निवडणुकांनंतर सत्ता स्थापन्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससमोर काँग्रेस हा प्रथम पर्याय असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. दरम्यान, रामदास कदम यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना मुख्यमंत्री पदाचा अवमाना केला असून, अशाप्रकारे राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा अवमान हा पुरोगामी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या.