शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आधार दिंडी

By admin | Updated: January 14, 2016 00:27 IST

संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या महान ग्रंथाला ७२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संतांची भूमी असलेल्या मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी वारकरी

औरंगाबाद : संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या महान ग्रंथाला ७२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संतांची भूमी असलेल्या मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेतर्फे मराठवाड्यातील ७६, तर अमरावती विभागातील ५६ अशा एकूण १३२ तालुक्यांतून ‘ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी’ काढण्यात येणार आहे. ‘लोकमत’ या दिंडीचा मीडिया पार्टनर आहे. १८ ते ३० जानेवारी या कालावधीत एकाचवेळी तीन दिंड्या निघतील. प्रत्येक गावात व्याख्याने, कीर्तन व चर्चा असे कार्यक्रम होतील. एक दिंडी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथून, दुसरी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथून, तर तिसरी दिंडी नांदेडमधून निघेल. ही माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील व सचिव ह.भ.प. डॉ. सदानंद मोरे यांनी दिली. या दिंडींच्या माध्यमातून मराठवाड्यातून अत्यंत गरीब परिस्थितीतून उच्च पदस्थ झालेले अधिकारी, पत्रकार, उद्योजक व राज्यातील प्रगतिशील शेतकरी ग्रामीण भागातील चिंताग्रस्त, भयग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यांना मानसिक आधार देऊन जगण्याची उमेद निर्माण करण्याचे प्रयत्न करतील. त्याचबरोबर दिंडी ज्या गावात जाईल तेथे वारकरी संप्रदाय आधार समिती स्थापन करणार आहे. जेणेकरून संवादाचे काम कायम सुरू राहील. शेती फायद्याची व्हावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून वारकरी साहित्य परिषदेने काही उपाय सुचविलेले आहेत. त्यामध्ये शेतीमालास उत्पादन खर्चानुसार हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांची शासकीय व खासगी कर्जे माफ करावीत व त्यांच्या गहाण जमिनी त्यांना परत कराव्यात, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळावे, शेतमालप्रक्रिया उद्योग त्या-त्या भागात उभारावेत, शालेय पोषण आहार योजना व्यापक बनवावी, दुष्काळी भागातील ५ हेक्टरखालील शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, वीज व बैलजोडी व शेती अवजारे द्यावीत, अशा शेतकऱ्यांना मोफत गायींचा पुरवठा करावा, ५ हेक्टर खालील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर ठिबक सिंचन संच पुरवावेत, फलोत्पादनासाठी मागेल त्याच्यासाठी फळबाग योजना राबवावी, गावोगावी बेकार तरुणांच्या याद्या तयार करून त्यांना छोटे उद्योग उभारता यावेत यासाठी प्रशिक्षण व अर्थसाह्य द्यावे, चारा छावणीच्या हद्दीत सुविधांचे फलक स्पष्ट शब्दांत लावावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)ज्ञानोबा-तुकोबा आधार दिंडी - मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमध्ये जाणारी दिंडी १८ जानेवारी २०१६ रोजी सकाळी ८ वाजता नांदेड येथून निघेल. ही दिंडी अर्धापूर, हिमायतनगर, भोकर, उमरी, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, अहमदपूर, चाकूर, उदगीर, निलंगा, उमरगा, तुळजापूर, औसा, लातूर, रेणापूर, अंबाजोगाई, परळी, धारूर, कळंब, भूम, पाटोदा, बीड, वडवणी, कन्नड, वैजापूर, गंगापूर व खुलताबाद यामार्गे जाईल. ३० जानेवारी २०१६ रोजी औरंगाबादेत दिंडीचा समारोप होईल. - पहिल्या दिंडीप्रमाणेच दुसरी दिंडी १८ जानेवारी २०१६ रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा येथून सकाळी ८.३० वाजता निघेल. तेथून नेर, यवतमाळ, राळेगाव, मोरगाव, वणी, पांढरकवडा, आर्णी, पुसद, माहूर, किनवट, उमरखेड, कळमनुरी, हिंगोली, पूर्णा, पालम, सोनपेठ, पाथरी, परभणी, सेनगाव, लोणार, मंठा, अंबड, जालना, सिंदखेडराजा, देउळगावराजा, बदनापूर, फुलंब्रीमार्गे औरंगाबादेत येईल. तिसरी दिंडी १८ जानेवारी २०१६ रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथून निघेल. तिन्ही दिंड्यांचा समारोप ३० जानेवारी २०१६ रोजी होईल. - वारकरी संप्रदाय व वारकरी साहित्य परिषद यांनी शेतकरी व इतरांशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन तयार केले आहे. ते शासनाला सादर केले जाणार आहे. प्रगतशील, पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा प्रगतिपथाकडे नेण्यासाठी वारकरी परिषदेच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी परिषदेने केली. - वारकरी परिषदेच्या ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील व सचिव ह.भ.प. डॉ. सदानंद मोरे यांनी केले आहे.