शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

धर्माच्या राजकारणाला पाठबळ

By admin | Updated: January 21, 2017 01:09 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कायम हिंदूंव्यतिरिक्त इतर सर्व धर्मांचा द्वेष, अशीच भूमिका घेतलेली आहे.

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कायम हिंदूंव्यतिरिक्त इतर सर्व धर्मांचा द्वेष, अशीच भूमिका घेतलेली आहे. संघाचा इतिहास आणि संघाद्वारे प्रकाशित साहित्याचा अभ्यास केल्यास, त्यांच्यापुढे मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट अशी तीन आव्हाने आहेत. संघाच्या लोकांनी देशात धर्माच्या राजकारणाला पाठबळ दिले. स्वामी विवेकानंददेखील आपले असल्याचा त्यांचा कांगावा अनेक वर्षांपासून सुरू आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध नाटककार अतमजितसिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.जनसहयोग फाउंडेशन आणि एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित विचारवेध संमेलनाचे शुक्रवारी उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ‘भारताचा राष्ट्रवाद - संकल्पना, स्वरूप, आव्हाने’ हा विषय घेऊन हे तीन दिवसीय संमेलन होत आहे. या वेळी प्रा. विजय नाईक, प्रमोद निरगुडकर, संमेलनाचे आयोजक आनंद करंदीकर आदी उपस्थित होते.देशाच्या इतिहासाचा मागोवा घेत अतमजितसिंग यांनी ‘देशभक्ती’च्या व्याख्येवर परखड भाषेत टीका केली. ते म्हणाले, ‘‘देशातील नागरिकांमध्ये देशभक्तीची बिजे रुजवायची असतील, तर नागरिकांमध्ये एकमेकांप्रति मानवतेची आणि प्रेमाची भूमिका निर्माण होण्याची आवश्यकता आहे. नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण होण्यासाठी महान इतिहासाची आणि त्या प्रकारचे वातावरण तयार होण्याची गरज असते. कोणी एखादा येईल आणि म्हणेल देशभक्त व्हा, असे शक्य होऊ शकत नाही.‘‘देशभक्तीचे डोस देऊन ती भावना निर्माण होत नसते. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांत देशभक्तीची व्याख्याच बदलली आहे. संघाला विशिष्ट प्रकारची देशभक्ती अभिप्रेत आहे.’’निरगुडकर यांनी प्रास्ताविक केले. नाईक यांनी मनोगत व्यक्त करून विचारवेध संमेलनाचे उद्देश, भूमिका आणि कार्यपद्धती यांची माहिती दिली.