शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र अखंड ठेवणा-यांना पाठिंबा

By admin | Updated: October 20, 2014 06:18 IST

महाराष्ट्र अखंड ठेवून विकास करण्याचे वचन देणाऱ्यांना पाठिंबा देण्यास आपण तयार आहोत. मात्र अजून याबाबत कुणीही आपल्याशी चर्चा केलेली नाही

मुंबई : महाराष्ट्र अखंड ठेवून विकास करण्याचे वचन देणाऱ्यांना पाठिंबा देण्यास आपण तयार आहोत. मात्र अजून याबाबत कुणीही आपल्याशी चर्चा केलेली नाही. कुणी चर्चेला आले तर बघू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सरकार स्थापनेला १० ते १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे सूचक विधानही त्यांनी केले.उद्धव म्हणाले की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जनतेने साथ दिली आणि शिवसेनेला प्रतिसाद लाभला. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अजून आपल्याला कुठलाही निरोप आलेला नाही. शिवसेनेने भाजपाला काही अटी घातलेल्या नाहीत कारण अटी घालण्याकरिता चर्चेला अजून कुणी शिवसेनेला भेटलेले नाही. कदाचित भाजपा राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा पर्याय स्वीकारू शकतात, असेही ते म्हणाले.भाजपा व राष्ट्रवादी मिळून शिवसेनेला टार्गेट करीत आहेत का, असे विचारले असता आपल्याला कुणी टार्गेट करू शकत नाही, असे उद्धव म्हणाले. सामान्य माणसाच्या आशीर्वादावर शिवसेनेला यश मिळाले. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना दु:ख दिले ते लोक लोकसभा निवडणुकीत हरले आणि आताही हरले याचा आपल्याला आनंद आहे, असे सांगत त्यांनी नाव न घेता नारायण राणे यांना टोला हाणला. (प्रतिनिधी)