शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांचा आधार

By admin | Updated: June 14, 2015 02:09 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांत प्रवेश अर्ज भरावे लागत आहेत. मात्र पहिल्याच टप्प्यातील अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरताना

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांत प्रवेश अर्ज भरावे लागत आहेत. मात्र पहिल्याच टप्प्यातील अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असून, शिक्षण विभागाच्या मार्गदर्शन केंद्रांचा विद्यार्थ्यांना आधार मिळत आहे.शालेय शिक्षण विभागाने मुंबई विभागाच्या एकूण ११ झोनमध्ये ४७ मार्गदर्शन केंद्रे उभारली आहेत. शिक्षण विभागाने दिलेली अर्ज व माहितीपुस्तिका नीटपणे वाचली नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मार्गदर्शन केंद्रांवरील मार्गदर्शकांनी सांगितले.विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करताना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला आणि त्याची फोटोकॉपी अर्जासोबत जोडायची आहे. या मार्गदर्शन केंद्रांवर आॅनलाइन आणि आॅफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सोय करण्यात आल्याने मोलाची मदत झाल्याची प्रतिक्रिया एका पालकाने व्यक्त केली.मुंबईतील विद्यार्थ्यांना स्थानिक शाळांमध्ये आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र मुंबईबाहेरील आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन केंद्रांची मोलाची मदत आहे. कर्नाटकहून आलेल्या साद कुरेशीला मुंबईतील हिंदुजा महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. मात्र फॉर्म भरताना त्याला अडचण येत होती. म्हणून त्याने सीएसटी येथील अंजुमन ए इस्लाम शाळेतील मार्गदर्शन केंद्रावर धाव घेतली. तिथे त्याने वडिलांच्या नोकरीचे स्थलांतर झाल्याचा पर्याय निवडला होता. ती चूक मार्गदर्शकाने लक्षात आणून दिल्यानंतर त्याचा प्रवेश अर्जाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. त्यानंतर मार्गदर्शकांनी त्याला दुसऱ्या टप्प्यातील अर्ज कसा भरायचा, याबाबतही मार्गदर्शन केले. परिपूर्ण मार्गदर्शनानंतर सादच्या चेहऱ्यावरील टेन्शनचे रूपांतर आनंदात झाले होते. राज्याबाहेरील, बाहेरून दहावी उत्तीर्ण केलेल्यांना मदत-विद्यार्थी आणि पालक शिक्षण विभागाने दिलेली अर्ज व माहितीपुस्तिका पूर्ण वाचत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.-बाहेरून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने मार्गदर्शन केंद्रावर अवलंबून आहेत.-कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी मुंबई आणि राज्याबाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना या केंद्रांची मोलाची मदत होत आहे.-मार्गदर्शन केंद्रावर मिळणाऱ्या तत्काळ मदतीमुळे कोणत्याही केंद्रावर लांबच लांब रांगा लागत नाहीत.