शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांचा आधार

By admin | Updated: June 14, 2015 02:09 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांत प्रवेश अर्ज भरावे लागत आहेत. मात्र पहिल्याच टप्प्यातील अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरताना

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांत प्रवेश अर्ज भरावे लागत आहेत. मात्र पहिल्याच टप्प्यातील अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असून, शिक्षण विभागाच्या मार्गदर्शन केंद्रांचा विद्यार्थ्यांना आधार मिळत आहे.शालेय शिक्षण विभागाने मुंबई विभागाच्या एकूण ११ झोनमध्ये ४७ मार्गदर्शन केंद्रे उभारली आहेत. शिक्षण विभागाने दिलेली अर्ज व माहितीपुस्तिका नीटपणे वाचली नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मार्गदर्शन केंद्रांवरील मार्गदर्शकांनी सांगितले.विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करताना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला आणि त्याची फोटोकॉपी अर्जासोबत जोडायची आहे. या मार्गदर्शन केंद्रांवर आॅनलाइन आणि आॅफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सोय करण्यात आल्याने मोलाची मदत झाल्याची प्रतिक्रिया एका पालकाने व्यक्त केली.मुंबईतील विद्यार्थ्यांना स्थानिक शाळांमध्ये आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र मुंबईबाहेरील आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन केंद्रांची मोलाची मदत आहे. कर्नाटकहून आलेल्या साद कुरेशीला मुंबईतील हिंदुजा महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. मात्र फॉर्म भरताना त्याला अडचण येत होती. म्हणून त्याने सीएसटी येथील अंजुमन ए इस्लाम शाळेतील मार्गदर्शन केंद्रावर धाव घेतली. तिथे त्याने वडिलांच्या नोकरीचे स्थलांतर झाल्याचा पर्याय निवडला होता. ती चूक मार्गदर्शकाने लक्षात आणून दिल्यानंतर त्याचा प्रवेश अर्जाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. त्यानंतर मार्गदर्शकांनी त्याला दुसऱ्या टप्प्यातील अर्ज कसा भरायचा, याबाबतही मार्गदर्शन केले. परिपूर्ण मार्गदर्शनानंतर सादच्या चेहऱ्यावरील टेन्शनचे रूपांतर आनंदात झाले होते. राज्याबाहेरील, बाहेरून दहावी उत्तीर्ण केलेल्यांना मदत-विद्यार्थी आणि पालक शिक्षण विभागाने दिलेली अर्ज व माहितीपुस्तिका पूर्ण वाचत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.-बाहेरून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने मार्गदर्शन केंद्रावर अवलंबून आहेत.-कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी मुंबई आणि राज्याबाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना या केंद्रांची मोलाची मदत होत आहे.-मार्गदर्शन केंद्रावर मिळणाऱ्या तत्काळ मदतीमुळे कोणत्याही केंद्रावर लांबच लांब रांगा लागत नाहीत.