शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांचा आधार

By admin | Updated: June 14, 2015 02:09 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांत प्रवेश अर्ज भरावे लागत आहेत. मात्र पहिल्याच टप्प्यातील अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरताना

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांत प्रवेश अर्ज भरावे लागत आहेत. मात्र पहिल्याच टप्प्यातील अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असून, शिक्षण विभागाच्या मार्गदर्शन केंद्रांचा विद्यार्थ्यांना आधार मिळत आहे.शालेय शिक्षण विभागाने मुंबई विभागाच्या एकूण ११ झोनमध्ये ४७ मार्गदर्शन केंद्रे उभारली आहेत. शिक्षण विभागाने दिलेली अर्ज व माहितीपुस्तिका नीटपणे वाचली नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मार्गदर्शन केंद्रांवरील मार्गदर्शकांनी सांगितले.विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करताना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला आणि त्याची फोटोकॉपी अर्जासोबत जोडायची आहे. या मार्गदर्शन केंद्रांवर आॅनलाइन आणि आॅफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सोय करण्यात आल्याने मोलाची मदत झाल्याची प्रतिक्रिया एका पालकाने व्यक्त केली.मुंबईतील विद्यार्थ्यांना स्थानिक शाळांमध्ये आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र मुंबईबाहेरील आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन केंद्रांची मोलाची मदत आहे. कर्नाटकहून आलेल्या साद कुरेशीला मुंबईतील हिंदुजा महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. मात्र फॉर्म भरताना त्याला अडचण येत होती. म्हणून त्याने सीएसटी येथील अंजुमन ए इस्लाम शाळेतील मार्गदर्शन केंद्रावर धाव घेतली. तिथे त्याने वडिलांच्या नोकरीचे स्थलांतर झाल्याचा पर्याय निवडला होता. ती चूक मार्गदर्शकाने लक्षात आणून दिल्यानंतर त्याचा प्रवेश अर्जाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. त्यानंतर मार्गदर्शकांनी त्याला दुसऱ्या टप्प्यातील अर्ज कसा भरायचा, याबाबतही मार्गदर्शन केले. परिपूर्ण मार्गदर्शनानंतर सादच्या चेहऱ्यावरील टेन्शनचे रूपांतर आनंदात झाले होते. राज्याबाहेरील, बाहेरून दहावी उत्तीर्ण केलेल्यांना मदत-विद्यार्थी आणि पालक शिक्षण विभागाने दिलेली अर्ज व माहितीपुस्तिका पूर्ण वाचत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.-बाहेरून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने मार्गदर्शन केंद्रावर अवलंबून आहेत.-कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी मुंबई आणि राज्याबाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना या केंद्रांची मोलाची मदत होत आहे.-मार्गदर्शन केंद्रावर मिळणाऱ्या तत्काळ मदतीमुळे कोणत्याही केंद्रावर लांबच लांब रांगा लागत नाहीत.