शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सर्वसामान्यांचा ‘सुपरफास्ट’ प्रवास

By admin | Updated: March 3, 2017 05:44 IST

सर्वसामान्यांसाठी सध्या अनारक्षित ट्रेन जरी धावत असल्या तरी सोयी-सुविधांनी युक्त आणि सुपरफास्ट अशा ट्रेन सेवेत नाहीत.

मुंबई : सर्वसामान्यांसाठी सध्या अनारक्षित ट्रेन जरी धावत असल्या तरी सोयी-सुविधांनी युक्त आणि सुपरफास्ट अशा ट्रेन सेवेत नाहीत. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने सर्वसामान्यांसाठी अनारक्षित सुपरफास्ट ‘अंत्योदय’ ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात या ट्रेनची घोषणा केल्यानंतर मुंबईसाठी पहिलीच ट्रेन लवकरच चालवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. ताशी १३0 च्या वेगाने धावणारी सुपरफास्ट ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते टाटानगर अशी चालवण्यात येणार आहे. २0१६-१७ मधील रेल्वे अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी सुपरफास्ट अंत्योद्य ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते एर्नाकुलम-हावडा अंत्योद्य ट्रेनचा शुभारंभ तीन दिवसांपूर्वीच करण्यात आला. सर्वसामान्यांसाठी ट्रेन असल्याने ही ट्रेन आरक्षित ऐवजी अनारक्षित ठेवण्यात आली आहे. आता मुंबईतील एलटीटी येथूनही टाटानगरसाठी ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ट्रेनची वेळ मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. अंत्योद्य ट्रेन ही २२ डब्यांची असेल आणि या ट्रेनच्या सर्व डब्यांची बांधणी एलएचबी प्रकारातील करण्यात आली आहे. एखादा अपघात झाल्यास त्यामध्ये जास्त जिवितहानी होऊ नये यासाठी एलएचबी प्रकारातील डबे बांधण्यात आल्याचे मुख्य जनसपंर्क अधिकारी नरेन्द्र पाटील यांनी सांगितले. महत्वाची बाब म्हणजे या ट्रेनचा जास्तीत जास्त वेग हा ताशी १६0 पर्यंत जावू शकतो. परंतु सध्या रेल्वे ट्रॅकची क्षमता पाहता ही ट्रेन ताशी १३0 वेगाने धावेल. जनशताब्दी, राजधानी व दुरोन्तो ट्रेनही याच वेगाने धावतात. सीटिंग असणाऱ्या या ट्रेनच्या प्रत्येक डब्याची प्रवासी क्षमता १00 असून उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची क्षमता जवळपास २00 एवढी आहे.>कोकणसाठी तेजस ट्रेनची प्रतीक्षाउत्तरेसाठी मध्य रेल्वेकडून अंत्योदय ट्रेन सुरु केलेली असतानाच कोकणसाठी तेजस ट्रेन कधी असा सवाल उपस्थित होत आहे. रेल्वे मंत्रालयाकडून सीएसटी ते करमाळी अशी सुपरफास्ट तेजस ट्रेनची घोषणा केली होती. परंतु ही ट्रेन अद्यापही सुरु झालेली नाही.ट्रेनची वैशिष्ट्येप्रवासी सामान ठेवण्यासाठी गाद्या असलेल्या रॅकअग्निशामक यंत्रणा, मोबाईल चार्जींग पॉर्इंटएलईडी लाईट्ससांडपाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्थापिण्याच्या पाण्याची व्यवस्था लांबच्या प्रवासासाठी सुपरफास्ट अनारक्षित ट्रेन जरी असली तरी दोन ते तीन दिवस लागणाऱ्या प्रवासासाठी अंत्योद्य ट्रेन कितपत यशस्वी ठरेल आणि त्याला प्रवासी प्रतिसाद देतील,हे पाहण्यासारखे ठरेल.