शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

प्रचाराचा सुपर संडे

By admin | Updated: October 13, 2014 01:26 IST

नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी सोमवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार थांबणार असून, छुप्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. दरम्यान, आजचा दिवस प्रचारासाठी ‘सुपर संडे’ ठरला.

जाहीर प्रचार आज थांबणार : छुपा सुरू होणारनागपूर : नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी सोमवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार थांबणार असून, छुप्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. दरम्यान, आजचा दिवस प्रचारासाठी ‘सुपर संडे’ ठरला. विविध पक्षांच्या सभा, सिनेनट आणि नट्यांच्या ‘रोड शो’ने दिवस गाजला.१२ सप्टेंबरला निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले. २ आॅक्टोबरपासून प्रचाराला गती आली. जिल्ह्यातील १२ जागांसाठी २११ उमेदवार रिंगणात आहेत. युती आणि आघाडी स्वतंत्रपणे लढत असल्याने सर्वत्र बहुरंगी लढतीचे चित्र आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, बहुजन समाज पार्टीसह इतरही पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत.प्रचारासाठी कमी दिवस असतानाही सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचार फेऱ्या आणि मतदारांशी थेट संपर्कावर भर देऊन जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसकडून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपाच्या नेत्या मायावती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, लोकजनशक्ती पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, ज्योतिरादित्य शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, तारिक अन्वर यांच्यासह सर्वच पक्षाच्या इतरही नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या. चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्रीही प्रचारात उतरल्या. प्रचाराच्या काळातील आजचा अखेरचा रविवार उमेदवारांसाठी ‘सुपर संडे’ ठरला. सुटीचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्याचा मतदारांशी सपंर्क साधण्यासाठी पुरेपूर वापर करून घेतला. बच्चेकंपनीही प्रचार यात्रेत सहभागी झाली होती. आयोगाच्या नियमानुसार मतदानाच्या ४८ तास आधी म्हणजे सोमवारी सायंकाळी ६ वाजता प्रचार तोफा शांत होतील. त्यामुळे प्रचाराच्या समारोपाला प्रत्येक मतदारसघांत महारॅली काढण्याचे नियोजन राजकीय पक्षांनी केले आहे. यातून शक्तिप्रदर्शन करण्याचाच त्यांचा प्रयत्न असणार आहे. (प्रतिनिधी)