शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

‘सुपर कम्युनिकेशन वे’ने वाढविली शासन-प्रशासनाची डोकेदुखी

By admin | Updated: September 3, 2016 02:42 IST

नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे’चा तीढा अद्याप कायम असून यासाठी लागणारी जमीन द्यायला एकही शेतकरी तयार नाही

- सुनील काकडे / ऑनलाइन लोकमत 
वाशिम, दि. 2 -‘नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे’चा तीढा अद्याप कायम असून यासाठी लागणारी जमीन द्यायला एकही शेतकरी तयार नाही. महामार्गासाठी जमीन देवून आम्ही ‘कफल्लक’ व्हायचे काय, असा सवाल त्यांच्या मनात घोळत आहे. दुसरीकडे शेतक-यांच्या मनातील ही घालमेल दुर करून त्यांचे मन वळविण्याकामी जिल्हा प्रशासनाचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यास अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही.
 
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणा-या नागपूर-मुंबई या ७१० किलोमिटरच्या शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग (सुपर कम्युनिकेशन हाय-वे) निर्मितीचा मुद्दा सद्या चांगलाच ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर आणि कारंजा लाड या तीन तालुक्यांमधील सुमारे ५० गावांना छेदून जाणाºया या महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासात मोलाची भर पडणार आहे. 
 
यासाठी लागणारी जमीन संपादित करित असताना शासनाने शेतक-यांसमोर भू-संपादन आणि भू-संचय, असे दोन पर्याय ठेवले आहेत. त्यापैकी भू-संचय पद्धत शेतक-यांच्या हिताची ठरणार आहे. जे शेतकरी या पद्धतीने आपली जमीन उपलब्ध करून देतील, अशा कोरडवाहू जमिनीच्या २५ टक्के आणि बागायती जमिनीच्या ३० टक्के प्रमाणात विकसित जमीन जिल्ह्यात ३ ठिकाणी उभारल्या जाणाºया कृषी समृद्धी केंद्रामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे शेतकºयांना कायमस्वरूपी शाश्वत उत्पन्नाची हमी मिळणार आहे. तसेच १० वर्षापर्यंत प्रत्येकवर्षी प्रति हेक्टरी जिरायती क्षेत्राला ५० हजार रुपये व बागायती क्षेत्राला १ लक्ष रुपये नुकसान भरपाई दिली जाणार असून त्यात प्रत्येकवर्षी १० टक्के वाढ केली जाणार आहे. 
 
२५ हजार बेरोजगारांना मिळणार रोजगार
जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा आणि मालेगाव या चार तालुक्यांमधून जाणाºया ‘सुपर कम्युनिकेशन-वे’दरम्यान शेलुबाजार, मालेगांव आणि मंगरूळपीर अशा तीन ठिकाणी प्रत्येकी ४०० हेक्टर परिसरात कृषी समृद्धी केंद्र उभारले जाणार आहेत. या केंद्रांमुळे कृषी व कृषीपूरक उद्योगांसह इतर औद्योगिक विकास साध्य होणार आहे. प्रत्येक कृषी समृद्धी केंद्रात किमान २० ते २५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 
 
२४०० हेक्टर भू-संपादन!
१०० किलोमिटर लांबी आणि १२० मीटर रुंद, असे स्वरूप असणाºया ‘सुपर कम्युनिकेशन वे’करिता जिल्ह्यातील ५० गावांमधून सुमारे २४०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी १२०० हेक्टर रस्त्यासाठी आणि उर्वरित १२०० हेक्टर जमीन कृषी समृद्धी केंद्रांकरिता वापरली जाणार आहे. भू-संचयच्या बदल्यात शेतकºयांना कृषी समृद्धी केंद्रांमध्ये विकसीत जमीन देण्याची शासनाची तरतूद आहे.
 
राज्यशासन आणि जिल्हा प्रशासन शेतकरीविरोधी कुठलाही निर्णय घेणार नाही. शेतकºयांनी देखील विकासकामाला विरोध करणे चुकीचे आहे. ‘सुपर कम्युनिकेशन वे’साठी अवलंबिण्यात आलेल्या भू-संचय पद्धतीमुळे शेतकºयांचाच आर्थिक विकास साध्य होणार आहे. त्यामुळे हा मुद्दा समजून घेत शेतकºयांनी सहकार्य करावे. 
- राहुल व्दिवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम