शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

नोव्हेंबरअखेरपासूनच ऐकू येणार विवाहेच्छूंचा अंगणात सनईचे सूर!

By admin | Updated: November 21, 2014 00:28 IST

यंदा कर्तव्य उशिराच : पुढील वर्षात नियोजित वधू-वरांसाठी मोठ्या तारखा

सातारा : लग्न ठरवून बसलेले अनेक नियोजित वधू-वर गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहे. मात्र, तुळशीच्या लग्नाला पंधरा दिवस होऊ गेले तरी लग्नाचा लाडू काही खायला मिळाला नाही. यंदा तारखाच कमी असल्याने नोव्हेंबरअखेरपासूनच लग्नाचे बार उडण्यास सुरुवात होणार आहे.आपणाकडे विनोदाने म्हटले जाते की, ‘शादी का लड्डू जो खाए ओ पछताए और जो ना खाए ओ भी पछताए,’ हे अगदी खरं आहे. अनेकांची लग्नं सहा-सात महिन्यांपूर्वीच ठरली आहेत. शक्यता दरवर्षी दिवाळी झाली की लग्नाच्या तिथी सुरू होतात; पण यंदा याला काहीसा उशीर झाला आहे. लग्नाच्या तिथी नोव्हेंबरअखेर पासूनच सुरू होत आहेत. त्यामुळे नियोजित वधू-वरांसाठी कधी हा काळ जातोय, अशी अवस्था झाली आहे.नियोजित वधू-वरांसाठी हा काळ प्रतीक्षेचा असला तरी लग्नघरातील वडीलधाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. कारण, त्यांना लग्नाची तयारी करण्यासाठी मोठा कालावधी मिळाला आहे. लग्न पत्रिकाही छापून आल्या आहेत. त्या मित्रमंडळी, पै-पाहुण्यांना देण्यात ते दंग आहेत. तुळशीच्या लग्नानंतर लग्न काढल्यास शाळा-महाविद्यालयांना सुटी असते. त्यामुळे मोठ्या संख्येने पाहुणे येत असतात; मात्र शाळा सुरू झाल्यामुले पाहुण्यांच्या येण्यावर मर्यादा येणार आहेत. यंदा २६ नोव्हेंबरपासून लग्नाच्या तिथी सुरू होत आहेत. नोव्हेंबरमध्ये केवळ दोन तिथी असून, डिसेंबरमध्ये चक्क बारा तारखा आहेत. यामध्ये १, ३, ६, ७, १२, १५, १६, १७, १८, २४, २८, ३० या तारखा लग्नासाठी शुभ मानल्या जात आहेत. २०१५ या वर्षात १२ जूनपर्यंत ५९ लग्नतिथी आहेत. यामध्ये जानेवारीत २४, २५, २६, २९, फेबु्रवारी ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १५, २१, २२, २३, २७. मार्च ४, ७, ९, १०, १२, १७. एप्रिलमध्ये २१, २७, २८, ३०. मे २, ५, ६, ७, ८, ९, ११, १४, १५, २७, २८, ३०. जून २, ४, ६, ७, ११ व १२. (प्रतिनिधी)माझे लग्न ठरून सात महिने झाले आहेत. इतके दिवस काही वाटले नाही, मोबाईलवरून आम्ही नेहमी बोलत असतो; पण कधी एक तारीख येईल, असे झाले आहे. आम्ही एक-एक दिवस मोजत आहोत.- शीतल गारे, नियोजित वधूलग्न म्हटले की, रुखवत हा बनवायलाच हवा. लग्नात मुलीकडून काय रुखवत मिळाला आहे, हे पाहण्यासाठी गृहिणींची चढाओढ असते. काही ठिकाणी चक्क विविध नातेवाईकांच्या लग्नात दिलेल्या रुखवताशी तुलना केली जाते. योगायोगाने यंदा लग्नसराईला उशिर झाला आहे. त्यामुळे वधूपक्षाला चांगलात चांगला रुखवत बनविण्यास जादा वेळ मिळाला आहे.वाजंत्री, घोडेवाल्यांचेही नियोजनतारखा उशिरा असल्या तरी वाजंत्रीवाल्यांची तयारी जोरात सुरू आहे. नवनवीन गाणे वाजविण्याची ते रात्रंदिवस तयारी करत आहेत. तर घोडेवालेही घोड्यांना त्यावर नृत्य शिकविणे, सराव करून घेत आहेत. उशिरा लग्न तिथी असल्याने एकाच तारखेला जास्त लग्न असल्याने या मंडळींनी दोन, तीन ठिकाणाच्या सुपाऱ्या घेतल्या आहेत.