शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

रविवारचे बाजार उठले

By admin | Updated: June 5, 2017 00:59 IST

शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाय’ आशा घोषणा देत पुणे जिल्ह्यात रविवारी चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांनी आपली आंदोलनं कायम ठेवली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘राज्य सरकारचं काम काय... शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाय’ आशा घोषणा देत पुणे जिल्ह्यात रविवारी चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांनी आपली आंदोलनं कायम ठेवली. विशेष म्हणजे रविवारी असलेले सर्व आठवडेबाजार शेतकऱ्यांनी उठवले. यात कोणतेही व्यवहार होवू दिले नाहीत. जिल्ह्यात रविवारी बहुतांश ठिकाणचे मोठे आठवडे बाजार होतात. त्यात आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील बाजार बंद ठेवण्यात आला. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आठवडे बाजारामध्ये शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना गांधीगिरी करत गुलाबपुष्प देऊन शेतकऱ्यांच्या संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन उरुळी कांचन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आले. ४आळेफाटा उपबाजारात कांदा विक्रीस न आणता संप सुरूच ठेवला. यामुळे उपबाजारात शुकशुकाट होता. दौंड तालुक्यातील केडगाव व खुटबावचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला. आज सकाळी व्यापारी बाजारात दाखल झाले, मात्र शेतकऱ्यांनी बाजारतळांवर जावून त्यांना विनंती केली. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी ही विनंती मान्य केली व परत जाने पसंत केले. ४शिक्रापूर येथे दर रविवारी भरविला जाणारा आठवडेबाजार शेतकरी संपामुळे बंद ठेवण्यात आला होता; परंतु किरकोळ व्यापारी येथे बाजारात आले व बंद असलेला आठवडेबाजार सकाळी दहानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू करण्यात आला, मात्र शेतकऱ्यांनी आजच्या बाजाराकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले.४नसरापूर येथील आठवडेबाजार आज तुरळक गर्दीचा ठरला. बाजारपेठेत बाहेर गावातून येणारे बाजारकरी आले नाहीत. पालेभाज्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणल्या नाहीत.चौथ्या दिवशीहीभाजीमंडई बंदइंदापूर येथे शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी रविवारी शहरातील रविवारचा आठवडेबाजार, भाजीमंडई बंद ठेवण्यात आली होती. माळवाडी नंबर दोनच्या युवा शेतकऱ्यांनी शहरातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दूध व शेतीमाल ओतून दिला.अहो, आता आम्हाला थोडासा त्रास पडेल. पालेभाज्या आम्ही टाकून देऊ. घरी खाऊ अगर जित्राबांना खायला घालू. चार दिवस चार पैसे घरी येणार नाहीत. तेही सहन करू... पण जोपर्यंत चांगलं होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही’- विनायक कदम, बेडशिंगे (इंदापूर) शेतकरींंंबारामती-इंदापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील पाच गावांमधील शेतकऱ्यांनी शेतकरी संपामध्ये सहभागी होत रास्ता रोको आंदोलन केले.या वेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध, फळे, कांदे फेकत आपला संताप व्यक्त केला. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या वेळी शेतकऱ्यांनी केला.काही ठिकाणी मंबुई, पुणे व इतर जिल्ह्यात जात असलेला शेतीमाल रोखून धरला. आज मालाची नासधूस करण्यापेक्षा त्या वाहनांना परत माल जेथून आणला तिथे नेण्याची विनंती केली. ज्या वाहनचालकांनी ही विनंती मानली नाही, त्यांचा माल रसत््यावर फेकून देण्यात आला.