शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

रविवार ठरला ‘घात’वार!

By admin | Updated: February 8, 2016 04:28 IST

राज्यभरात रविवारी झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन जणांचा दरड कोसळून, दोन जणांचा गुदमरून, तर पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे

मुंबई : राज्यभरात रविवारी झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन जणांचा दरड कोसळून, दोन जणांचा गुदमरून, तर पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे रविवार राज्यासाठी घातवार ठरला आहे. जळगावातील रावेर येथे भोकर नदी काठावरील खाणीत जेवत असलेल्या दोन मजुरांच्या अंगावर दरड कोसळून त्यांचा अंत झाला़ रविवारी दुपारी तामसवाडी गावालगत ही घटना घडली. कडू साहेबराव ढाकणे(४२) व प्रल्हादसिंग शंकरसिंग राजपूत (५०) अशी मृत मजुरांची नावे आहेत़अहमदनगरमधील राहाता येथील साकुरी शिवारात मोठ्या प्रमाणात वीजभट्ट्या असून, बहुतांश कामगार परराज्यातून आलेले आहेत. अनुप मोहन राज (१८) व मिथून राजकुवर राज (१२, दोघेही रा. उत्तर प्रदेश) हे दोघे पहाटे भट्टीवर गेले. परंतु प्रचंड धुराच्या लोळात त्यांना श्वास घेणे मुश्किल झाले आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान, धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील मानव रुहानी केंद्रात सुरू असलेल्या नामदान सप्ताहासाठी बडोदा येथून आलेल्या तीन युवकांचा येथील लाटीपाडा धरणात रविवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. आकाश पाटील(१६), युवराज बागुल(२०) आणि भरत राठोड (२६) अशी त्यांची नावे असून ते धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेले होते. तसेच राजस्थानातील गोपालक कुुटुंबातील एका महिलेसह तिच्या दोन मुलींचा चंद्रपुरमधील चिमूर तालुक्यातील सावगाव-मालेवाडा परिसरात तलावात बुडून मृत्यू झाला. कपडे धुण्यासाठी तलावावर गेली असताना महिलेच्या मुली पाण्यात पडल्या आणि त्यांना वाचविण्यासाठी गेली असताना तिचाही बुडून मृत्यू झाला. (प्रतिनिधी)