शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

ऐन उन्हाळ्यात भारनियमनाचा शॉक

By admin | Updated: May 5, 2017 04:27 IST

ऐन उन्हाळ्यात राज्य कमाल तापमानाच्या वाढीने होरपळून निघाले असतानाच आता महावितरणकडून राज्याला

मुंबई : ऐन उन्हाळ्यात राज्य कमाल तापमानाच्या वाढीने होरपळून निघाले असतानाच आता महावितरणकडून राज्याला भारनियमनाचे ‘चटके’ बसणार आहेत. औष्णिक प्रकल्पाचे काही संच बंद असल्याने महावितरणने भारनियमनाचा निर्णय घेतला असून, मागणीच्या तुलनेत विजेच्या उपलब्धतेत सुमारे ४ हजार मेगावॅटचा तुटवडा आहे.राज्यात महावितरणची सध्या विजेची कमाल मागणी १९ हजार मेगावॅट आहे. तर संपूर्ण राज्याची विजेची मागणी सध्या २२ हजार ५०० मेगावॅट आहे. मागील काही दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे १ हजार मेगावॅटने वाढ झाली आहे. राज्यातील वीजनिर्मितीचे काही संच बंद पडल्याने तसेच कोराडी, परळी, चंद्रपूर, रतन इंडिया, तारापूर, मुंद्रा, अदानी पॉवर प्लांट, एनटीपीसीमधून महावितरणला वीज उपलब्ध न झाल्याने ३ हजार मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच वीज निर्मितीचे काही संच नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी बंद असल्याने आणखी १ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. या निर्णयाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण महावितरणकडून कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करून घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)वीजनिर्मिती संच वापरावे२०१६च्या टेरिफ आॅर्डरनुसार आणि पॉवर परचेस अ‍ॅग्रिमेंटनुसार महावितरणकडे ७ हजार मेगावॅट जादा वीज आहे. भारनियमनाची वेळ येईल तेव्हा जादा वीजनिर्मिती संच सुरू ठेवायला हवे. ते आपण वापरत का नाही? हा मूळ प्रश्न असून, भारनियमन बेकायदेशीर असल्याचे वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले.