शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

ऐन उन्हाळ्यात भारनियमनाचा शॉक

By admin | Updated: May 5, 2017 04:27 IST

ऐन उन्हाळ्यात राज्य कमाल तापमानाच्या वाढीने होरपळून निघाले असतानाच आता महावितरणकडून राज्याला

मुंबई : ऐन उन्हाळ्यात राज्य कमाल तापमानाच्या वाढीने होरपळून निघाले असतानाच आता महावितरणकडून राज्याला भारनियमनाचे ‘चटके’ बसणार आहेत. औष्णिक प्रकल्पाचे काही संच बंद असल्याने महावितरणने भारनियमनाचा निर्णय घेतला असून, मागणीच्या तुलनेत विजेच्या उपलब्धतेत सुमारे ४ हजार मेगावॅटचा तुटवडा आहे.राज्यात महावितरणची सध्या विजेची कमाल मागणी १९ हजार मेगावॅट आहे. तर संपूर्ण राज्याची विजेची मागणी सध्या २२ हजार ५०० मेगावॅट आहे. मागील काही दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे १ हजार मेगावॅटने वाढ झाली आहे. राज्यातील वीजनिर्मितीचे काही संच बंद पडल्याने तसेच कोराडी, परळी, चंद्रपूर, रतन इंडिया, तारापूर, मुंद्रा, अदानी पॉवर प्लांट, एनटीपीसीमधून महावितरणला वीज उपलब्ध न झाल्याने ३ हजार मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच वीज निर्मितीचे काही संच नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी बंद असल्याने आणखी १ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. या निर्णयाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण महावितरणकडून कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करून घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)वीजनिर्मिती संच वापरावे२०१६च्या टेरिफ आॅर्डरनुसार आणि पॉवर परचेस अ‍ॅग्रिमेंटनुसार महावितरणकडे ७ हजार मेगावॅट जादा वीज आहे. भारनियमनाची वेळ येईल तेव्हा जादा वीजनिर्मिती संच सुरू ठेवायला हवे. ते आपण वापरत का नाही? हा मूळ प्रश्न असून, भारनियमन बेकायदेशीर असल्याचे वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले.