शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

जमा होणाऱ्या रकमेचा विमाच काढलेला नाही

By admin | Updated: January 17, 2017 03:52 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेत विविध करांच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेचा विमा काढण्यात आला नसल्याची गंभीर बाब समोर आली

राजू काळे,

भार्इंदर- मीरा-भार्इंदर महापालिकेत विविध करांच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेचा विमा काढण्यात आला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नोटाबंदीच्या काळात पालिकेने जुन्या नोटांच्या माध्यमातून स्वीकारलेले सुमारे साडेपाच लाख गहाळ झाल्याची घटना घडल्यानंतरही प्रशासनाने त्यावर अद्याप गांभीर्य दाखवलेले नाही. विविध कर आणि शुल्कातून रोज सुमारे १० ते १५ लाखांचे उत्पन्न जमा होते. सुरुवातीपासून जमा होणारी रक्कम एक कर्मचारी बँकेत जमा करतो. या वेळी सोबत असलेला सुरक्षारक्षक शस्त्रधारी असल्याची नोंद पालिकादप्तरी असतानाही तो विनाशस्त्र कर्मचाऱ्यासोबत जातो, असे निदर्शनास आले आहे. मुख्यालयातील रक्कम बँकेत जमा करण्यासाठी क्वचित प्रसंगी कर्मचाऱ्याला वाहन दिले जाते. प्रभाग कार्यालये, परिवहन विभाग व विभागीय कार्यालयात जमा होणारी रक्कम मुख्यालयात जमा करण्यासाठी अनेकदा एकट्या कर्मचाऱ्यालाच धाडले जाते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यासह सोबत असलेल्या रकमेस धोका निर्माण होऊ शकतो. परंतु, त्याकडे पालिकेने अद्याप गांभीर्याने पाहिलेले नाही. शहरात रक्कम लुटल्याच्या घटना वारंवार घडत आहे. पालिकेत मोठ्या प्रमाणात रक्कम कराच्या माध्यमातून जमा केली जात असल्याने किमान या रकमेची जोखीम प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. पालिका मुख्यालयातून रक्कम गहाळ होऊनही प्रशासनाने जमा होणाऱ्या रकमेचा विमा न काढता आपला भोंगळ कारभार सुरूच ठेवला आहे. तसेच ती घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याच्या जीवितालाही धोका असल्याने त्याला वैद्यकीय विम्याखेरीज अपघाती विम्याचे सुरक्षाकवच पुरवण्यात आले नसल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. यासाठी रयतराज कामगार संघटनेने प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करूनही त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचे संघटनेचे पालिका युनिट अध्यक्ष गोविंद परब यांनी सांगितले. याबाबत, लेखा विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. >कर्मचाऱ्याचा अपघाती विमाही असावासुमारे १० ते १५ लाख रुपये एका ठिकाणाहून सुमारे ३ किलोमीटरच्या परिघात वाहून नेण्याच्या विम्यासाठी वर्षाला ३ ते ४ हजारांचा हप्ता येतो. त्यासोबत कर्मचाऱ्याचा अपघाती विमाही देण्याची तरतूद असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मोठ्या रकमेचा धोका टाळण्यासाठी पालिकेकडे काही हजार रुपयांची तरतूद नसल्याची बाब हास्यास्पद असून एरव्ही नागरिकांचा पैसा उधळण्यासाठी पालिकेकडे तरतूद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.