शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

जमा होणाऱ्या रकमेचा विमाच काढलेला नाही

By admin | Updated: January 17, 2017 03:52 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेत विविध करांच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेचा विमा काढण्यात आला नसल्याची गंभीर बाब समोर आली

राजू काळे,

भार्इंदर- मीरा-भार्इंदर महापालिकेत विविध करांच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेचा विमा काढण्यात आला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नोटाबंदीच्या काळात पालिकेने जुन्या नोटांच्या माध्यमातून स्वीकारलेले सुमारे साडेपाच लाख गहाळ झाल्याची घटना घडल्यानंतरही प्रशासनाने त्यावर अद्याप गांभीर्य दाखवलेले नाही. विविध कर आणि शुल्कातून रोज सुमारे १० ते १५ लाखांचे उत्पन्न जमा होते. सुरुवातीपासून जमा होणारी रक्कम एक कर्मचारी बँकेत जमा करतो. या वेळी सोबत असलेला सुरक्षारक्षक शस्त्रधारी असल्याची नोंद पालिकादप्तरी असतानाही तो विनाशस्त्र कर्मचाऱ्यासोबत जातो, असे निदर्शनास आले आहे. मुख्यालयातील रक्कम बँकेत जमा करण्यासाठी क्वचित प्रसंगी कर्मचाऱ्याला वाहन दिले जाते. प्रभाग कार्यालये, परिवहन विभाग व विभागीय कार्यालयात जमा होणारी रक्कम मुख्यालयात जमा करण्यासाठी अनेकदा एकट्या कर्मचाऱ्यालाच धाडले जाते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यासह सोबत असलेल्या रकमेस धोका निर्माण होऊ शकतो. परंतु, त्याकडे पालिकेने अद्याप गांभीर्याने पाहिलेले नाही. शहरात रक्कम लुटल्याच्या घटना वारंवार घडत आहे. पालिकेत मोठ्या प्रमाणात रक्कम कराच्या माध्यमातून जमा केली जात असल्याने किमान या रकमेची जोखीम प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. पालिका मुख्यालयातून रक्कम गहाळ होऊनही प्रशासनाने जमा होणाऱ्या रकमेचा विमा न काढता आपला भोंगळ कारभार सुरूच ठेवला आहे. तसेच ती घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याच्या जीवितालाही धोका असल्याने त्याला वैद्यकीय विम्याखेरीज अपघाती विम्याचे सुरक्षाकवच पुरवण्यात आले नसल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. यासाठी रयतराज कामगार संघटनेने प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करूनही त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचे संघटनेचे पालिका युनिट अध्यक्ष गोविंद परब यांनी सांगितले. याबाबत, लेखा विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. >कर्मचाऱ्याचा अपघाती विमाही असावासुमारे १० ते १५ लाख रुपये एका ठिकाणाहून सुमारे ३ किलोमीटरच्या परिघात वाहून नेण्याच्या विम्यासाठी वर्षाला ३ ते ४ हजारांचा हप्ता येतो. त्यासोबत कर्मचाऱ्याचा अपघाती विमाही देण्याची तरतूद असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मोठ्या रकमेचा धोका टाळण्यासाठी पालिकेकडे काही हजार रुपयांची तरतूद नसल्याची बाब हास्यास्पद असून एरव्ही नागरिकांचा पैसा उधळण्यासाठी पालिकेकडे तरतूद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.