शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मालेगाव तालुक्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या

By admin | Updated: March 23, 2017 22:48 IST

सिन्नर तालुक्यात दोघा शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येनंतर बुधवारी मालेगाव तालुक्यातील दोघा शेतकऱ्यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची घटना

नाशिक : केंद्र व राज्य सरकारकडून कर्जमाफी होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याने जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्येचे प्रमाण वाढले असून, सिन्नर तालुक्यात दोघा शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येनंतर बुधवारी मालेगाव तालुक्यातील दोघा शेतकऱ्यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. नवीन वर्षापासून जिल्ह्यात चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असून, त्यातील सहा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. महादू कारभारी पवार (५५) रा. सौंदाणे व जगन विठ्ठल अहिरे (५०) रा. डोंगरगाव असे या दोघा शेतकऱ्यांची नावे आहेत. राहत्या घरातच या दोघांनी विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविल्याचा प्राथमिक अहवाल मालेगाव तहसील कार्यालयाने कळविला आहे. दोन दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यातील शिवाजी बोडके रा. सोनगिरी व अरुण सोनकांबळे रा. शिवडे या दोन्ही शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येने जिल्ह्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शासनाकडून कर्जमाफी होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत होते. परंतु राज्याच्या व केंद्राच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद ठेवलेली नसल्याने शेतकरी वर्ग निराश झाला व त्यातून आत्महत्त्येच्या घटना वाढल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.