शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

उदयोजकाची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: July 21, 2016 18:40 IST

एका उद्योजकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेपूर्वी रामानंदनगर रिक्षा स्टॉप परिसरात घडली. व्यावसायिकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

रामानंदनगरातील घटना : नैराश्यातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशयजळगाव : एका उद्योजकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेपूर्वी रामानंदनगर रिक्षा स्टॉप परिसरात घडली. व्यावसायिकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भूपेंद्र दत्तात्रय पाटील (वय ४०, रा.रामानंदनगर, जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या उद्योजकाचे नाव आहे. रामानंदननगर रिक्षा स्टॉप परिसरात दत्त मंदिराजवळ प्लॉट क्रमांक २० मध्ये भूपेंद्र पाटील यांचे दुमजली घर आहे. घराच्या वरच्या मजल्यावर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना घडली तेव्हा; त्यांची पत्नी, आई-वडील व तीन मुले खालच्या मजल्यावर होते. भूपेंद्र पाटील यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. घटना उघडकीस आल्यानंतर पाटील यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.प्लास्टिक पाइप निर्मितीचा उद्योगसुसरी, ता.भुसावळ हे भूपेंद्र पाटील यांचे मूळ गाव आहे. त्यांचे वडील दत्तात्रय पाटील हे वनविभागात नोकरीला होते. त्यामुळे ते गेल्या अनेक वर्षांपासून जळगावात स्थायिक झालेले आहेत. काही दिवसांपूर्वीच दत्तात्रय पाटील हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे ते रामानंदनगरात मुलाकडे राहत होते. भूपेंद्र पाटील हे एकटे होते. त्यांना दोन विवाहित बहिणी असून एक बहीण नाशिकला तर दुसरी पुण्याला राहते. पाटील हे उद्योजक होते. त्यांच्या एमआयडीसीत ‘बी सेक्टर’मध्ये (प्लॉट क्रमांक ३२) समृद्धी अ‍ॅग्रो प्लास्ट नावाच्या दोन कंपन्या आहेत.नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशयभूपेंद्र पाटील यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. कंपन्यामुळे त्यांच्यावर आर्थिक देणे वाढले होते. त्यामुळेच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला असावा, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, समृद्धी (१३) व अर्पिता (२) या दोन मुली, ऐश्वर्य (१०) व आई-वडील असा परिवार आहे.