शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येला सरकार जबाबदार

By admin | Updated: September 26, 2015 03:16 IST

भाजपा सरकार शेतकरी व कामगारविरोधी आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. दुसरीकडे एलबीटी रद्द करून भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे.

नवी मुंबई : भाजपा सरकार शेतकरी व कामगारविरोधी आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. दुसरीकडे एलबीटी रद्द करून भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे. व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या या थापाड्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे बळीराजाला आत्महत्या करावी लागत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८२व्या जयंतीनिमित्त एपीएमसीमध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी अजित पवार यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. ‘अच्छे दिन आएंगे’च्या थापा मारून भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता मिळविली. सत्ता आली की १०० दिवसांमध्ये काळा पैसा भारतामध्ये घेऊन येणार. प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये मिळतील अशी आश्वासने देण्यात आली. जनताही क्षणिक बावचळली, त्यांना निवडून दिले. परंतु जनहिताची कामे झाली नाहीत. गुजरातमध्ये हार्दिक पटेलचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारने कामगार कायद्याला हात लावला तर खपवून घेतले जाणार नसल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. नेत्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर आंदोलनाचा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला. मुख्यमंत्री आलेच नाहीत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कामगार त्यांच्यासोबत आहेत. प्रत्येक मेळाव्यास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री किंवा राष्ट्रवादीचे नेते उपस्थित असतात. सरकार बदलल्यामुळे या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. ते मेळाव्यास येणार असल्याचे सांगितले होते. परंतु ते मेळाव्यास आलेच नाहीत. याविषयी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.