शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

आत्महत्येला सरकार जबाबदार

By admin | Updated: September 26, 2015 03:16 IST

भाजपा सरकार शेतकरी व कामगारविरोधी आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. दुसरीकडे एलबीटी रद्द करून भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे.

नवी मुंबई : भाजपा सरकार शेतकरी व कामगारविरोधी आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. दुसरीकडे एलबीटी रद्द करून भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे. व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या या थापाड्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे बळीराजाला आत्महत्या करावी लागत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८२व्या जयंतीनिमित्त एपीएमसीमध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी अजित पवार यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. ‘अच्छे दिन आएंगे’च्या थापा मारून भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता मिळविली. सत्ता आली की १०० दिवसांमध्ये काळा पैसा भारतामध्ये घेऊन येणार. प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये मिळतील अशी आश्वासने देण्यात आली. जनताही क्षणिक बावचळली, त्यांना निवडून दिले. परंतु जनहिताची कामे झाली नाहीत. गुजरातमध्ये हार्दिक पटेलचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारने कामगार कायद्याला हात लावला तर खपवून घेतले जाणार नसल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. नेत्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर आंदोलनाचा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला. मुख्यमंत्री आलेच नाहीत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कामगार त्यांच्यासोबत आहेत. प्रत्येक मेळाव्यास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री किंवा राष्ट्रवादीचे नेते उपस्थित असतात. सरकार बदलल्यामुळे या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. ते मेळाव्यास येणार असल्याचे सांगितले होते. परंतु ते मेळाव्यास आलेच नाहीत. याविषयी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.