शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

आत्महत्येला सरकार जबाबदार

By admin | Updated: September 26, 2015 03:16 IST

भाजपा सरकार शेतकरी व कामगारविरोधी आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. दुसरीकडे एलबीटी रद्द करून भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे.

नवी मुंबई : भाजपा सरकार शेतकरी व कामगारविरोधी आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. दुसरीकडे एलबीटी रद्द करून भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे. व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या या थापाड्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे बळीराजाला आत्महत्या करावी लागत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८२व्या जयंतीनिमित्त एपीएमसीमध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी अजित पवार यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. ‘अच्छे दिन आएंगे’च्या थापा मारून भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता मिळविली. सत्ता आली की १०० दिवसांमध्ये काळा पैसा भारतामध्ये घेऊन येणार. प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये मिळतील अशी आश्वासने देण्यात आली. जनताही क्षणिक बावचळली, त्यांना निवडून दिले. परंतु जनहिताची कामे झाली नाहीत. गुजरातमध्ये हार्दिक पटेलचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारने कामगार कायद्याला हात लावला तर खपवून घेतले जाणार नसल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. नेत्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर आंदोलनाचा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला. मुख्यमंत्री आलेच नाहीत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कामगार त्यांच्यासोबत आहेत. प्रत्येक मेळाव्यास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री किंवा राष्ट्रवादीचे नेते उपस्थित असतात. सरकार बदलल्यामुळे या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. ते मेळाव्यास येणार असल्याचे सांगितले होते. परंतु ते मेळाव्यास आलेच नाहीत. याविषयी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.