शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

आत्महत्या रोखणारा अधिकारीच हतबल?

By admin | Updated: November 9, 2016 05:34 IST

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करून, आत्महत्येचा इशारा देणाऱ्या अमरावती पोलीस परिमंडळांचे विशेष महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी

जमीर काझी, मुंबईवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करून, आत्महत्येचा इशारा देणाऱ्या अमरावती पोलीस परिमंडळांचे विशेष महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या, असे एका परिपत्रकातून समोर आले आहे. कर्जबाजारी, व्यसनाधीन असणाऱ्या बळीराजाचे समुपदेशन करून त्यांना परावृत्त करण्याची जबाबदारी त्यांनी परिक्षेत्रातील चार पोलीस अधीक्षकांवर सोपविली होती. मात्र अवघ्या दोन महिन्यांत ते स्वत:च आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आल्याने पोलीस वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.राज्य पोलीस दलाच्या प्रमुखाला थेट मेसेज पाठवून आत्महत्येचा इशारा देण्याइतपत त्यांचे मनोबल का ढळले? वरिष्ठांचा दबाव व हेटाळणीमागील कारणाची पूर्तता होणार का, असा सवाल पोलीस वर्तुळात विशेषत: मपोसे अधिकाऱ्यांमधून विचारला जात आहे. विठ्ठल जाधव यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबाबत ‘कम्युनिटी पोलिसिंग’मार्फत आपल्या आदेशानिशी काढलेले अतितत्काळ परिपत्रक सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले आहे.अमरावती परिमंडळांतर्गत अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या पोलीस घटकांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे विठ्ठल जाधव यांनी चारही पोलीस प्रमुखांसाठी उपाययोजना राबविण्यासाठी परिपत्रक काढले होते. त्यात नमूद केले होते की, पोलिसांनी अधिकाधिक शेतकरी मित्र तयार करावेत, त्यासाठी पोलीस पाटील, सरपंच, कोतवाल, तलाठी यांची गावभेट घ्यावी. कर्जबाजारी शेतकऱ्यांची माहिती घ्यावी. मद्यपी शेतकऱ्यांची ‘एनजीओ’मार्फत भेट घेऊन समुपदेशन करावे. बँक अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांच्या अडचणींसंदर्भात योग्य त्या कारवाईसाठी विनंती करावी. ज्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या घरी लग्नाच्या मुली आहेत, त्यांच्या लग्नाकरिता सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, पोलीस मित्र, यांच्यामार्फत सामुदायिक विवाह सोहळा घडवून आणावा, अशा अनेक सूचना त्यात होत्या.