शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

आत्महत्या रोखणारा अधिकारीच हतबल?

By admin | Updated: November 9, 2016 05:34 IST

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करून, आत्महत्येचा इशारा देणाऱ्या अमरावती पोलीस परिमंडळांचे विशेष महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी

जमीर काझी, मुंबईवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करून, आत्महत्येचा इशारा देणाऱ्या अमरावती पोलीस परिमंडळांचे विशेष महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या, असे एका परिपत्रकातून समोर आले आहे. कर्जबाजारी, व्यसनाधीन असणाऱ्या बळीराजाचे समुपदेशन करून त्यांना परावृत्त करण्याची जबाबदारी त्यांनी परिक्षेत्रातील चार पोलीस अधीक्षकांवर सोपविली होती. मात्र अवघ्या दोन महिन्यांत ते स्वत:च आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आल्याने पोलीस वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.राज्य पोलीस दलाच्या प्रमुखाला थेट मेसेज पाठवून आत्महत्येचा इशारा देण्याइतपत त्यांचे मनोबल का ढळले? वरिष्ठांचा दबाव व हेटाळणीमागील कारणाची पूर्तता होणार का, असा सवाल पोलीस वर्तुळात विशेषत: मपोसे अधिकाऱ्यांमधून विचारला जात आहे. विठ्ठल जाधव यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबाबत ‘कम्युनिटी पोलिसिंग’मार्फत आपल्या आदेशानिशी काढलेले अतितत्काळ परिपत्रक सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले आहे.अमरावती परिमंडळांतर्गत अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या पोलीस घटकांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे विठ्ठल जाधव यांनी चारही पोलीस प्रमुखांसाठी उपाययोजना राबविण्यासाठी परिपत्रक काढले होते. त्यात नमूद केले होते की, पोलिसांनी अधिकाधिक शेतकरी मित्र तयार करावेत, त्यासाठी पोलीस पाटील, सरपंच, कोतवाल, तलाठी यांची गावभेट घ्यावी. कर्जबाजारी शेतकऱ्यांची माहिती घ्यावी. मद्यपी शेतकऱ्यांची ‘एनजीओ’मार्फत भेट घेऊन समुपदेशन करावे. बँक अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांच्या अडचणींसंदर्भात योग्य त्या कारवाईसाठी विनंती करावी. ज्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या घरी लग्नाच्या मुली आहेत, त्यांच्या लग्नाकरिता सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, पोलीस मित्र, यांच्यामार्फत सामुदायिक विवाह सोहळा घडवून आणावा, अशा अनेक सूचना त्यात होत्या.