शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
3
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
4
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
6
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
7
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
8
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
9
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
10
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
11
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
12
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
13
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
14
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
15
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
16
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
17
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
18
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
19
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
20
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार

मुलीच्या लग्नाआधीच आत्महत्या

By admin | Updated: April 30, 2016 05:05 IST

चिंतेने ग्रासलेल्या वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अखेर मृत्यूला कवटाळले.

विवेक चांदूरकर,

वाशीम- तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत, दोन मुलींचे हात पिवळे केले. आता तिसऱ्या मुलीच्या विवाहासाठीही तयारी सुरू केली खरी; पण अवघ्या आठ दिवसांवर लग्नकार्य येऊन ठेपले असताना हाती पुरेसा पैसा नाही. काय करावं, पैसा कुठून आणावा, या चिंतेने ग्रासलेल्या वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अखेर मृत्यूला कवटाळले.रिसोड तालुक्यातील धोडप येथील शेतकरी बबनराव शंकर बोडखे यांच्याकडे केवळ दोन एकर शेती होती. तीन मुली, एक मुलगा आणि पत्नी, असे हे कुटुंब शेतीमध्ये राबून संसार चालवित होते. त्यांनी दोन मुलींचे लग्न केले. मुलगा गणेश नववीत शिकत आहे. त्यांची तिसरी मुलगी निकिता हिचा विवाह कोयाळी खुर्द येथील गोपाळ सिरसाट यांच्याशी जमला. ७ मे रोजी लग्न ठरले. लग्नाची तयारी झाली. कपडे घेतले, पत्रिकाही छापल्या; मात्र काही दिवसांपासून बबनराव यांना पैशांची चिंता सतावत होती. तीन वर्षांपासून वऱ्हाडावर निसर्ग कोपला आहे. त्यामुळे पुरेसे पीक आले नाही. बबनराव यांनी २०१० मध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे१८ हजार रूपये कर्ज घेतले होते.दूध व्यवसायासाठी २००८ मध्ये त्यांनी ५० हजार रूपये कर्ज घेतले होते. त्यातून व्यवसाय सुरू केला;मात्र म्हशीचा मृत्यू झाल्याने तो व्यवसायही बंद पडला. त्यामुळेत्यांना शेतीवरच अवलंबून राहावे लागले. बुधवारी रात्री शौचालयास जात असल्याचे सांगून ते घराबाहेर पडले. बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाही. कुटुंबियांनी शोधाशोध केल्यानंतर शेतातील झाडाला गळफास घेतल्याचे आढळले.