शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

आत्महत्या करणे मूर्खपणा, हरणा-याची जगात कदर नसते - हेमामालिनींचे वादग्रस्त ट्विट

By admin | Updated: April 5, 2016 12:08 IST

आत्महत्या करणे हा निव्वळ मूर्खपणा असून त्यामुळे काहीही साध्य होत नाही, असे वादग्रस्त ट्विट हेमामालिनी यांनी प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ५ - टीव्ही कलाकार प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येमुळे संपूर्ण सेलिब्रिटी जगात खळबळ माजलेली असतानाच अभिनेत्री व भाजपा खासदार हेमामालिनी यांनी याप्रकरणी वादग्रस्त ट्विट करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. ' आत्महत्या करणे हा निव्वळ मूर्खपणा असून त्यामुळे काहीही साध्य होत नाही! हे जीवन म्हणजे देवाने आपल्याला दिलेली भेट असून आपण ते मनसोक्त जगले पाहिजे. हे आत्महत्या करून हे जीवन संपवण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही' असे असंवेदनशील ट्विट करत हेमामालिनी यांनी प्रत्युषाच्या आत्महत्येच्या निर्णयावर एका प्रकारे टीकाच केली आहे.

एवढेच नव्हे तर ' मनुष्याने प्रत्येक कठीण परिस्थीवर यशस्वीरित्या मात करणे शिकले पाहिजे. दबावाखाली झुकून प्रयत्न सोडता कामा नयेत. या जगात झुंज देणा-यांची कदर केली जाते, हरणा-यांची नव्हे' असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान या ट्विट्समधून हेमामालिनी यांनी मीडियावरही टीकास्त्र सोडले आहे. ' या अशा (आत्महत्येच्या) घटना म्हणजे भुकेलेल्या मीडियासाठी खाद्य असतात. दुसरी एखादी खळबळजनक बातमी मिळेपर्यंत या घटनांचा चावून चोथा केला जातो, मात्र त्यानंतर सगळ्यांनाच याचा विसर पडतो' अशी घणघाती टीकाही त्यांनी केली आहे.

यापूर्वीही हेमामालिनी आपली वक्तव्ये व कृतींमुळे वादात सापडल्या होत्या. नृत्य संस्थेसाठी मिळालेला भूखंड असो वा त्यांच्या गाडीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात एका चिमुरडीचा गेलेला जीव असो, अनेक वेळा त्या वादात सापडल्या.