शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

यवतचा ओढा स्वच्छ करण्याच्या सूचना

By admin | Updated: June 28, 2016 01:30 IST

यवत येथील ओढ्याच्या पुलाखाली पुणे-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणा वेळी पडलेला राडारोडा अद्याप तसाच आहे.

यवत : यवत येथील ओढ्याच्या पुलाखाली पुणे-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणा वेळी पडलेला राडारोडा अद्याप तसाच आहे. परिसरातील सांडपाणी पुलाजवळ साठल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता, असे वृत्त दैनिक लोकमतमधून प्रसिद्ध होताच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बातमीची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.यवत येथे ओढ्यातून पावसाच्या पाण्यामुळे पूर आल्यास संत तुकाराममहाराज पालखी तळ असणाऱ्या श्री काळभैरवनाथ मंदिरातदेखील पुराचे पाणी जाण्याच्या धोका आहे. दोन वर्षांपूर्वी पुराचे पाणी मंदिरात घुसले होते. पुणे-सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणा वेळी पुलाचे काम केल्यानंतर पुलाखाली पडलेला राडारोडा तसाच राहिल्याने पुलाच्या दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणावर पाणी साठून राहते. त्यातच या ओढ्यात आजूबाजूच्या नागरी वसाहतींमधील सांडपाणी सोडण्यात आले आहे. यामुळे या ठिकाणी सांडपाण्याचा बंधाराच तयार झाला आहे. याबाबतची बातमी लोकमतमधून नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली होती.खासदार सुप्रिया सुळे यांच्या स्वीय सहायकांनी माहामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दिवाण यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी मंगळवारी (दि. २८) प्रत्यक्ष स्थळपाहणी करून याबाबत योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. तत्पूर्वी, महामार्गाचे चौपदरीकरण केलेल्या कंपनीचे पाटस पथकर नाक्यावरील अधिकारी सुनील पणारी, पवन सिंग व इतरांनी यवत येथील ओढ्याच्या पुलाची पाहणी केली. कंपनीच्या अधिकारी वर्गासमवेत यवत येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य इम्रान तांबोळी व इतरदेखील उपस्थित होते.महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीने निष्काळजीपणा दाखविल्याने पुलखाली पडलेला राडारोडा व काँक्रीट तसेच पडून राहिले. याच दुष्परिणाम यवतवासीयांना भोगावा लागत आहे. वारंवार सदर काम पूर्ण करण्याची मागणी करूनदेखील सदर कंपनी काम अर्धवट करीत आहे. मागील ३ वेळा दौड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी हे काम करण्याची मागणी केल्यानंतर काम अर्धवट करून तसेच ठेवण्याचे काम कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. टोलवसुली करण्याचे काम सुरू झाल्यानंतर आता कंपनी त्यांची अर्धवट कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अंग काढण्याचा कंपनीचा प्रयत्न...ओढ्याच्या पुलाच्या खालील राडारोडा काढण्याचे काम करण्याच्या पाहणी करण्यासाठी आलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरण केलेल्या अधिकाऱ्यांनी सदर काम ग्रामपंचायतीचे असल्याचे सांगून अंग झटकण्याच्या प्रयत्न केला; मात्र त्या वेळी तेथे उपस्थित इम्रान तांबोळी यांनी पुलाच्या खालील व महामार्गाच्या हद्दीतील कामे संबंधित कंपनीने पूर्ण करून द्यावी, अशी मागणी केली. आता मंगळवारी (दि. २८) महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दिवाण यांनी स्थळपाहणी केल्यावर ते काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचे आहे.