शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एकरकमी एफआरपी शिवाय कारखाने सुरु करु देणार नाही; राजू शेट्टींचा थकीत पैशांवरून घणाघात

By शीतलकुमार कांबळे | Updated: September 12, 2022 15:04 IST

राज्यात 900 कोटींची एफआरपी थकीत . केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात केंद्राच्या परवानगी शिवाय दुरुस्ती करणे बेकायदेशीर आहे. याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. 

सोलापूर : केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे पूर्ण एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली जात नाही. तोपर्यंत राज्यातली एकही कारखाना सुरु होऊ देणार नाही ही भूमिका स्वाभीमानी शेतकरी संघटनेची आहे, असे संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावर्षीचा साखर कारखान्यांचा सिजन सुरू होत आहे. मात्र, अद्यापही गेल्यावर्षीच्या ऊसाची एफआरपी शेतकऱ्यांना मिळाली नाही. राज्यात जवळपास 900 कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. त्यामुळे शासनावर आमचा विश्वास नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.एफआरपी वसूल करण्याची जबाबदारी सरकारची होती. पंरतु, सोलापूर जिल्ह्यात अजूनही 203 तर राज्याची सुमारे 900 कोटींची एफआरपी थकीत आहे. वास्तविक पाहता महाविकास आघाडी सरकारने एपआरपी देण्याच्या सूत्रामध्ये बेकायदेशीर बदल (तुकडा एफआरपी) केला आहे. त्याला स्वाभीमानीने विरोध केला होता. खरे तर केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात केंद्राच्या परवानगी शिवाय दुरुस्ती करणे बेकायदेशीर आहे. याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. 

राज्य सरकराने जी दुरुस्ती केली. त्या दुरुस्तीनुसारही राज्य सरकारने व साखर कारखाने वागताना दिसत नाहीत. मग सरकारने साध्य काय केले. शेतकऱ्यांचे अधिकार काढून घेऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. स्वता केलेल्या कायद्याची अंमबलबाजणी करण्याची जबाबदरारी सरकारची होती. तीही करताना दिसत नाही. त्यामुळे सरकार व कारखाने यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी