शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

साखर सांडली की मुंग्या येणारच

By admin | Updated: January 4, 2017 01:42 IST

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आमदार अबू आझमी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. रात्रीच्या वेळी तरुण-तरुणींनी एकत्र हिंडण्याबाबत

मुंबई : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आमदार अबू आझमी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. रात्रीच्या वेळी तरुण-तरुणींनी एकत्र हिंडण्याबाबत काही बोलल्यास आम्हाला लगेच जुन्या विचारांचे ठरवले जाते. पण पेट्रोलजवळ आग नेली तर आग भडकणारच, साखर सांडली तर मुंग्या जमा होणारच. स्त्री आणि पुरुषांमध्ये एक योग्य अंतर असावे, आजकाल महिला जितक्या तोकड्या कपड्यात वावरतील तितके त्यांना फॅशनेबल आणि आधुनिक समजले जाते. अशा तोकड्या पेहरावांमुळे विनयभंगासारखे प्रकार घडतात, असे विधान आझमी यांनी केले.कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे ३१ डिसेंबरच्या पार्टीदरम्यान पोलिसांदेखत अनेक महिलांची छेडछाड काढण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. यासंदर्भात बोलताना कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सदर घटनेसाठी पार्टीसाठी आलेल्या तरुण-तरुणींनाच जबाबदार धरले. पोलिसांची संख्या मर्यादित आहे. पार्टीसाठी आलेल्यांचे पाश्चात्त्य कपडे आणि वागणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी वाद ओढवून घेतला होता. परमेश्वरन यांच्या विधानाचीच अबू आझमी यांनी री ओढली आहे. बंगळुरू येथील घटनेसाठी महिलांनाच जबाबदार धरत भारतीय संस्कृतीपासून दूर गेल्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडतात, असे विधान आझमी यांनी केले. बंगळुरू येथील घटना दुर्दैवी असून, संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मात्र हल्लीच्या जमान्यात महिला जितके तोकडे कपडे घालेल, जितके अंगप्रदर्शन करेल, तितकेच तिला आधुनिक, फॅशनेबल आणि सुशिक्षित मानले जाते. हे फॅड वाढले आहे. माझी बहीण किंवा मुलगी सूर्यास्तानंतर परपुरुषासोबत थर्टी फर्स्ट साजरा करीत असेल आणि तिच्यासोबत तिचा नवरा किंवा भाऊ नसेल तर हे योग्य नाही,’ असेही आझमी म्हणाले. दरम्यान, अबू आझमी यांच्या या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना समन्स बजावले आहे. आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी ही माहिती दिली. (प्रतिनिधी)आझमींचे वक्तव्य चिथावणीखोर - गोऱ्हे नववर्षाचे स्वागत करणाऱ्या महिलांशी काही समाजकंटक श्वापदाप्रमाणे वागतात. आयटी क्षेत्रातील महानगरांमध्ये अशा घटना घडणे देशाच्या विकासासाठी मारक आहे. त्यातच अबू आझमींसारखी मंडळी महिलांच्या कपड्यांवर प्रश्न उपस्थित करून महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणतात. महिलांवर बंधने आणि पुरुषांना मोकळे रान देणारी चिथावणीखोर वक्तव्ये थांबायला हवीत, असे मत शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.