शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

साखर सांडली की मुंग्या येणारच

By admin | Updated: January 4, 2017 01:42 IST

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आमदार अबू आझमी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. रात्रीच्या वेळी तरुण-तरुणींनी एकत्र हिंडण्याबाबत

मुंबई : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आमदार अबू आझमी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. रात्रीच्या वेळी तरुण-तरुणींनी एकत्र हिंडण्याबाबत काही बोलल्यास आम्हाला लगेच जुन्या विचारांचे ठरवले जाते. पण पेट्रोलजवळ आग नेली तर आग भडकणारच, साखर सांडली तर मुंग्या जमा होणारच. स्त्री आणि पुरुषांमध्ये एक योग्य अंतर असावे, आजकाल महिला जितक्या तोकड्या कपड्यात वावरतील तितके त्यांना फॅशनेबल आणि आधुनिक समजले जाते. अशा तोकड्या पेहरावांमुळे विनयभंगासारखे प्रकार घडतात, असे विधान आझमी यांनी केले.कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे ३१ डिसेंबरच्या पार्टीदरम्यान पोलिसांदेखत अनेक महिलांची छेडछाड काढण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. यासंदर्भात बोलताना कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सदर घटनेसाठी पार्टीसाठी आलेल्या तरुण-तरुणींनाच जबाबदार धरले. पोलिसांची संख्या मर्यादित आहे. पार्टीसाठी आलेल्यांचे पाश्चात्त्य कपडे आणि वागणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी वाद ओढवून घेतला होता. परमेश्वरन यांच्या विधानाचीच अबू आझमी यांनी री ओढली आहे. बंगळुरू येथील घटनेसाठी महिलांनाच जबाबदार धरत भारतीय संस्कृतीपासून दूर गेल्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडतात, असे विधान आझमी यांनी केले. बंगळुरू येथील घटना दुर्दैवी असून, संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मात्र हल्लीच्या जमान्यात महिला जितके तोकडे कपडे घालेल, जितके अंगप्रदर्शन करेल, तितकेच तिला आधुनिक, फॅशनेबल आणि सुशिक्षित मानले जाते. हे फॅड वाढले आहे. माझी बहीण किंवा मुलगी सूर्यास्तानंतर परपुरुषासोबत थर्टी फर्स्ट साजरा करीत असेल आणि तिच्यासोबत तिचा नवरा किंवा भाऊ नसेल तर हे योग्य नाही,’ असेही आझमी म्हणाले. दरम्यान, अबू आझमी यांच्या या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना समन्स बजावले आहे. आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी ही माहिती दिली. (प्रतिनिधी)आझमींचे वक्तव्य चिथावणीखोर - गोऱ्हे नववर्षाचे स्वागत करणाऱ्या महिलांशी काही समाजकंटक श्वापदाप्रमाणे वागतात. आयटी क्षेत्रातील महानगरांमध्ये अशा घटना घडणे देशाच्या विकासासाठी मारक आहे. त्यातच अबू आझमींसारखी मंडळी महिलांच्या कपड्यांवर प्रश्न उपस्थित करून महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणतात. महिलांवर बंधने आणि पुरुषांना मोकळे रान देणारी चिथावणीखोर वक्तव्ये थांबायला हवीत, असे मत शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.