शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

कारखान्यांकडील साखर साठ्यावर निर्बंध!

By admin | Updated: August 31, 2016 00:48 IST

चार दिवसांत अध्यादेश : सणासुदीच्या हंगामातील दरवाढ रोखण्यासाठी निर्णय

चंद्रकांत कित्तुरे -- कोल्हापूर --सणासुदीच्या हंगामात साखरेचे दर वाढू नयेत, यासाठी केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडील साखरेच्या साठ्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कारखान्यांना त्यांच्याकडील साखरेचा साठा ३० सप्टेंबरपर्यंत ३७ टक्क्यांवर आणि ३१ आॅक्टोबरपर्यंत केवळ २४ टक्क्यांवर आणावा लागणार आहे. या संदर्भातील अध्यादेश या आठवड्यातच काढण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.साखरेचा बाजारातील किरकोळ विक्रीचा दर सध्या ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो आहे. हा दर ४० रुपयांपर्यंतच राहावा, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. साखरेचे घाऊक बाजारातील दर प्रतिक्विंटल ३३०० रुपयांच्या आसपास आहेत. गेल्या महिन्याभरापासून या दरात फारसा चढउतार झालेला नाही. तरीही येऊ घातलेल्या गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सणांच्या हंगामात साखरेची वाढती मागणी असणार आहे. त्यामुळे साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. दरवर्षी या हंगामात साखरेचे दर वाढतात. तसे यंदाही ते वाढू नयेत, यासाठी केंद्र सरकारने कारखान्यांकडील साखरेच्या साठ्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.या संदर्भातील अध्यादेश केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्रालयाकडून याच आठवड्यात म्हणजे येत्या तीन ते चार दिवसांत काढला जाणार आहे. कारखान्यांनी १ आॅक्टोबर २०१५ रोजी त्यांच्याकडे असलेला साखरेचा साठा आणि २०१५-१६ या हंगामात उत्पादित झालेली साखर यांची बेरीज करून त्यातून कारखान्याने निर्यात केलेली साखर वजा करून राहिलेल्या साखरेच्या ३७ टक्केच साखर १ आॅक्टोबरनंतर स्वत:जवळ ठेवता येणार आहे. हीच मर्यादा १ नोव्हेंबरसाठी २४ टक्के इतकी आहे. याचाच अर्थ ३० सप्टेंबरपर्यंत कारखान्यांना ३७ टक्क्यांपेक्षा जादा असलेली साखर विकावी लागणार आहे, तर ३१ आॅक्टोबरपर्यंत २४ टक्क्यांपेक्षा जादा असलेली साखर विकावी लागणार आहे. यामुळे बाजारात साखरेचा अतिरिक्त पुरवठा होऊन सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढणार नाहीत, असा सरकारचा अंदाज आहे. बाजारातील साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारखान्यांच्या साठा मर्यादेवर निर्बंध आणण्याच्या हालचाली चालू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ३० जुलैच्या अंकात प्रसिद्ध केले होते. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कारखान्यांना साठा मर्यादा घालून देणे, साखरेची निर्यात वाढविणे, साखरेच्या वायदे बाजारावर निर्बंध आणणे, आदी पर्यायांवर सरकारकडून विचार सुरू होता. मात्र, साखरेच्या वायदे बाजारावर निर्बंध आणण्यात ‘सेबी’ने जोरदार विरोध केल्यामुळे तूर्त हा पर्याय बाजूला ठेवणे सरकारने पसंद केले आहे. त्याऐवजी कारखान्यांकडील साखरेच्या साठ्यावरच निर्बंध लादण्याचा पर्याय स्वीकारला आहे.महाराष्ट्रातील ७५ कारखाने साखरेचे बाजारातील दर वाढतील या अपेक्षेने अनेक कारखान्यांनी २०१५-१६ सालातील उत्पादित झालेली साखर विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेरच काढलेली नाही. केंद्र सरकारकडे असलेल्या आकडेवारीनुसार असे ९० साखर कारखाने आहेत की, ज्यांनी मोठ्या प्रमाणात साखरेचा साठा करून ठेवला आहे. यात सर्वाधिक ७५ कारखाने महाराष्ट्रातील आहेत. दर कोसळण्याची शक्यताकेंद्राच्या या निर्णयामुळे साखर कारखाने आपल्याकडील अतिरिक्त साखर एकाचवेळी विक्रीस काढतील आणि मागणीपेक्षा पुरवठा जादा होऊन साखरेचे दर कोसळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असे झाले तर त्याचा फटका संपूर्ण साखर कारखानदारीलाच बसणार आहे....उद्योगांना स्वस्त साखर का?साखरेच्या एकूण वापरापैकी केवळ ३० टक्के साखर घरगुती ग्राहक वापरतात. उर्वरित ७० टक्के चॉकलेट, कोल्ंिड्रक्स, मेवा-मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थांसाठी वापरली जाते. या औद्योगिक वापराकरिता लागणारी साखर चढ्या दराने दिली, तर काय फरक पडणार आहे? केंद्राची ही संवेदनशीलता घरगुती ग्राहकांसाठी आहे की या उद्योगांना सांभाळण्यासाठी, असा सवालही साखर उद्योगातून विचारला जात आहे. साखरेची दुहेरी किंमत धोरण स्वीकारण्याची मागणीही या उद्योगातून होत आहे.साखरच का?बाजारातील अन्य जीवनावश्यक वस्तूंचे विशेषत: कडधान्ये, डाळी, खाद्यतेल वाढत असताना त्यांचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार साखरेच्या दराबाबत इतके संवेदनशील का? असा सवाल साखर कारखानदारीतून विचारला जाऊ लागला आहे. उद्योगावर पुन्हा नियंत्रण सध्या व्यापाऱ्यांवर साखरेचा साठा करण्यास निर्बंध आहेत. २०१३ मध्ये साखर उद्योग अंशत: नियंत्रणमुक्त करण्यात आला. तेव्हापासून कारखान्याकडील साखरेच्या साठ्यावर कोणतेही निर्बंध नव्हते. काही कारखान्यांच्या साखर साठा करण्याच्या भूमिकेमुळे केंद्राने हा निर्णय घेऊन पुन्हा साखर उद्योगावर नियंत्रण आणले आहे, अशी चर्चा साखर उद्योगात सुरू झाली आहे.