शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

राज्यात चार कोटी नऊ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

By admin | Updated: January 17, 2015 00:09 IST

१७४ कारखाने : सरासरी साखर उताऱ्यात ‘कोल्हापूर’ आघाडीवर

प्रकाश पाटील -कोपार्डे (कोल्हापूर)- साखरेचे दर घसरल्याने, कारखान्याचे अर्थकारण कोसळल्याने राज्यात कोल्हापूर जिल्हा वगळता इतरत्र कोठेही उसाला एफआरपीप्रमाणे कारखानदारांनी ऊसदर जाहीर केलेला नाही. तरीही कारखान्यांचा गाळप हंगाम जोरात सुरू आहे. राज्यात सुरू असलेल्या १७४ साखर कारखान्यांनी तीन कोटी ८५ लाख ६१ हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे. १०.६१ एवढ्या सरासरी साखर उताऱ्याने चार कोटी ९ लाख १० हजार क्विंटल साखर तयार केली असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली.गेल्यावर्षी जानेवारीपर्यंत १५५ साखर कारखाने सुरू होऊन त्यांनी दोन कोटी ९२ लाख १९ हजार मे. टन उसाचे गाळप केले होते. सरासरी उतारा १०.५४ इतका होता. तीन कोटी सात लाख ९९ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात एक कोटी एक लाख टन ११ हजार क्ंिवटलने वाढ झाली. सरासरी उताऱ्यातही वाढ झाली आहे.कोल्हापूर विभागातील कारखान्यांनी ८८ लाख ३२ हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे. तर एक कोटी चार लाख ३४ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ११.८१ टक्के असून, तो सातही विभागात सर्वाधिक आहे. साखर उत्पादन व गाळपातही पुणे विभाग आघाडीवर आहे. कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता एक लाख ९३ हजार ७५० मे. टन आहे. येथील कारखान्यांनी एक कोटी ५२ लाख ४० हजार मे. टन एवढे गाळप केले आहे. त्यातून एक कोटी ६० लाख ८५ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा मात्र १०.५५ एवढाच आहे.विभागवार कारखान्यांचे गाळप १३ जानेवारीअखेरऊस गाळपसाखर उत्पादनसाखर (लाख मे. टन)(लाख मे. टन)उताराकोल्हापूर८८.३२१०४.३४११.८१पुणे१५२.४०१६०.८५१०.५५अहमदनगर५३.९२५६.०६१०.४४औरंगाबाद३४.०३३१.३५९.२१नांदेड५२.५२५२.४०९.९८अमरावती२.४३२.३१९.४८नागपूर२.००१.७८८.९४