शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगारांची ‘दिवाळी’

By admin | Updated: October 7, 2016 06:02 IST

राज्यातील साखर कारखान्यांतील कामगारांना १५ टक्के वेतनवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील २0५ साखर कारखान्यांत काम करणाऱ्या दीड लाख साखर कामगारांची दिवाळी गोड होणार

प्रकाश पाटील, कोपार्डे (कोल्हापूर) राज्यातील साखर कारखान्यांतील कामगारांना १५ टक्के वेतनवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील २0५ साखर कारखान्यांत काम करणाऱ्या दीड लाख साखर कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. ही वाढ आॅक्टोबरच्या पगारात देण्यात यावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर यांनी साखर कारखान्यांना दिले आहेत.राज्यातील साखर कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या वेतन कराराची मुदत एप्रिल २0१४मध्ये संपली होती. त्यानंतर राज्य सरकारने शिवाजीराव गिरीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै २0१५ रोजी त्रिपक्षीय समितीची नेमणूक केली. समिती नियुक्त होऊनही वेतन कराराला विलंब होत असल्याने राज्य साखर कामगार संघटनेने २ जानेवारी २0१६ रोजी बेमुदत संपाचा इशारा दिला होता. मात्र, कारखान्यांचे गाळप हंगाम अडचणीत येणार असल्याने शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर ९०० रुपये हंगामी वेतनवाढ देण्यात आली. तसेच अंतिम वेतनवाढ दोन महिन्यांत मार्गी लावू, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने साखर कामगारांमध्ये असंतोषाला सुरुवात झाल्याने शरद पवार यांनी यामध्ये स्वत: लक्ष घालून त्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश साखर आयुक्त व यंत्रणेला दिले. साखर कामगारांना १ एप्रिल २0१४ रोजी असलेल्या वेतनश्रेणीत १५ टक्के पगारवाढ देण्यात येणार आहे. ४ जुलै २0१६ रोजीच्या करारातील कलम ३३मधील तरतुदीनुसार प्रत्येक साखर कारखाना आणि प्रतिनिधी व मान्यताप्राप्त युनियन यांनी त्यांना लागू असलेल्या मुंबई औद्योगिक संबंध कायदा १९४६च्या संबंधित तरतुदीनुसार वेतनवाढीचे करार करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.१ एप्रिल २0१४ रोजी साखर कामगारांना असलेल्या वेतनश्रेणीच्या आधारे १५ टक्के पगारवाढ देण्यात येणार आहे. या पगारवाढीत धुलाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, महागाई भत्ता इत्यादी वाढींचा समावेश राहील.‘लोकमत’वरअभिनंदनाचा वर्षावसाखर कामगारांच्या वेतनवाढीबाबत ‘लोकमत’मधून सातत्याने पाठपुरावा होत होता. अलीकडेच ‘वेतन करार झाला; पण अंमलबाजावणी नाही’ या मथळ्याखालील वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत वेतन करार लागू करण्याचे आदेश निर्गमित झाल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कामगार वर्गातून ‘लोकमत’चे अभिनंदन केले जात आहे.गेली अडीच वर्षे साखर कामगारांचा वेतन करार रेंगाळला होता. ऐन दिवाळीच्या तोंडावर साखर आयुक्त पातळीवर हा करार लागू करण्याचे आदेश आल्याने साखर कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.- सरदार पाटील, साखर कामगार प्रतिनिधी, कुंभी-कासारी