शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

साखर कामगारांची ‘दिवाळी’

By admin | Updated: October 7, 2016 06:02 IST

राज्यातील साखर कारखान्यांतील कामगारांना १५ टक्के वेतनवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील २0५ साखर कारखान्यांत काम करणाऱ्या दीड लाख साखर कामगारांची दिवाळी गोड होणार

प्रकाश पाटील, कोपार्डे (कोल्हापूर) राज्यातील साखर कारखान्यांतील कामगारांना १५ टक्के वेतनवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील २0५ साखर कारखान्यांत काम करणाऱ्या दीड लाख साखर कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. ही वाढ आॅक्टोबरच्या पगारात देण्यात यावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर यांनी साखर कारखान्यांना दिले आहेत.राज्यातील साखर कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या वेतन कराराची मुदत एप्रिल २0१४मध्ये संपली होती. त्यानंतर राज्य सरकारने शिवाजीराव गिरीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै २0१५ रोजी त्रिपक्षीय समितीची नेमणूक केली. समिती नियुक्त होऊनही वेतन कराराला विलंब होत असल्याने राज्य साखर कामगार संघटनेने २ जानेवारी २0१६ रोजी बेमुदत संपाचा इशारा दिला होता. मात्र, कारखान्यांचे गाळप हंगाम अडचणीत येणार असल्याने शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर ९०० रुपये हंगामी वेतनवाढ देण्यात आली. तसेच अंतिम वेतनवाढ दोन महिन्यांत मार्गी लावू, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने साखर कामगारांमध्ये असंतोषाला सुरुवात झाल्याने शरद पवार यांनी यामध्ये स्वत: लक्ष घालून त्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश साखर आयुक्त व यंत्रणेला दिले. साखर कामगारांना १ एप्रिल २0१४ रोजी असलेल्या वेतनश्रेणीत १५ टक्के पगारवाढ देण्यात येणार आहे. ४ जुलै २0१६ रोजीच्या करारातील कलम ३३मधील तरतुदीनुसार प्रत्येक साखर कारखाना आणि प्रतिनिधी व मान्यताप्राप्त युनियन यांनी त्यांना लागू असलेल्या मुंबई औद्योगिक संबंध कायदा १९४६च्या संबंधित तरतुदीनुसार वेतनवाढीचे करार करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.१ एप्रिल २0१४ रोजी साखर कामगारांना असलेल्या वेतनश्रेणीच्या आधारे १५ टक्के पगारवाढ देण्यात येणार आहे. या पगारवाढीत धुलाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, महागाई भत्ता इत्यादी वाढींचा समावेश राहील.‘लोकमत’वरअभिनंदनाचा वर्षावसाखर कामगारांच्या वेतनवाढीबाबत ‘लोकमत’मधून सातत्याने पाठपुरावा होत होता. अलीकडेच ‘वेतन करार झाला; पण अंमलबाजावणी नाही’ या मथळ्याखालील वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत वेतन करार लागू करण्याचे आदेश निर्गमित झाल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कामगार वर्गातून ‘लोकमत’चे अभिनंदन केले जात आहे.गेली अडीच वर्षे साखर कामगारांचा वेतन करार रेंगाळला होता. ऐन दिवाळीच्या तोंडावर साखर आयुक्त पातळीवर हा करार लागू करण्याचे आदेश आल्याने साखर कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.- सरदार पाटील, साखर कामगार प्रतिनिधी, कुंभी-कासारी