शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

साखरेची साठेबाजी रोखली

By admin | Updated: January 20, 2016 01:26 IST

साखरेचे दर कमी असताना वायदेबाजाराचा गैरवापर बड्या व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे मंगळवारी बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले.

बारामती : साखरेचे दर कमी असताना वायदेबाजाराचा गैरवापर बड्या व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे मंगळवारी बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले. फलटणच्या न्यू फलटण शुगर कारखान्याची साखर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये २,४०५ रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करून आता दर वाढल्यावर विक्रीस काढली आहे. व्यापाऱ्यांनी साठेबाजी करून विक्रीला काढलेल्या साखरेमुळे साखर कारखान्यांची साखरविक्री होत नसल्याची माहिती पुढे आली आहे.आठवडाभरापासून साखरेच्या दरात ३ हजार ते ३,२०० रुपये अशी वाढ झाली आहे. त्याचा फायदा उठविण्याचा व्यापाऱ्यांनी प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, साखरेची साठेबाजी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये अत्यल्प भाडेपट्ट्यावर केल्याचा प्रकार उघड झाला आहे. काल रात्रीपासूनच बारामतीच्या भिगवण रस्त्यालगतच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमधून ४१५ मेट्रिक टन साखर चेन्नईला रातोरात पाठविण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील, तालुकाध्यक्ष विठ्ठल देवकाते, महेंद्र तावरे, रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, किशोर मासाळ, अमोल सातकर, चंद्रकांत वाघमोडे, विलास कोकरे आदी याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या वखार गोडाऊनमधून बाहेर जाणारी साखर रोखली. आज सकाळी ९ पासून साखर वाहतुकीसाठी सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रक थांबविण्यात आले होते. गोडाऊनचे सुपरवायझर एस. पी. पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईतील ईडी अँड एफ कमोडिटीज् प्रा. लि. कंपनीने न्यू फलटण शुगर कारखान्याकडून खरेदी केलेली साखर वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवली होती. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. १,१०५ मेट्रिक टन साखर गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली होती. काल रात्री १४२ मेट्रिक टन साखर उचलण्यात आली. रात्री पाठविण्यात आलेली साखर उचलण्याची परवानगी श्रीनाथ ट्रान्सपोर्टला देण्यात आली होती. मात्र, सकाळी आलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीकडून अधिकृत पत्र मिळाले नव्हते. ५० रुपये दरमहा प्रतिटन भाडेआकारणी वखार महामंडळ करते. त्याप्रमाणे भाडेआकारणी झाली आहे.या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, बारामती शहर पोलिसांकडे रीतसर तक्रार करण्यात येणार आहे. साखरेच्या साठ्याला निर्बंध नाहीत; मात्र त्याबाबत चौकशी करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)1साखरेचे दर कमी असताना मोठ्या व्यापाऱ्यांनी वायदेबाजाराचा गैरफायदा घेऊन साखर उचलली. आज साखरेचे दर वाढले आहेत. साखरधंदा अडचणीत आहे, असे कारखानदारदेखील ओरडत होते. त्यांनीच व्यापाऱ्यांशी संगनमत करून कमी दराने साखरविक्री केली आहे. 2आता साखरेचे दर वाढलेले असताना व्यापाऱ्यांनी साठेबाजी केलेली साखर विक्रीला काढली आहे. त्याचा आपोआपच कारखान्यांच्या साखरेवर परिणाम होणार आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील यांनी सांगितले.