शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

साखरेची साठेबाजी रोखली

By admin | Updated: January 20, 2016 01:26 IST

साखरेचे दर कमी असताना वायदेबाजाराचा गैरवापर बड्या व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे मंगळवारी बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले.

बारामती : साखरेचे दर कमी असताना वायदेबाजाराचा गैरवापर बड्या व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे मंगळवारी बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले. फलटणच्या न्यू फलटण शुगर कारखान्याची साखर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये २,४०५ रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करून आता दर वाढल्यावर विक्रीस काढली आहे. व्यापाऱ्यांनी साठेबाजी करून विक्रीला काढलेल्या साखरेमुळे साखर कारखान्यांची साखरविक्री होत नसल्याची माहिती पुढे आली आहे.आठवडाभरापासून साखरेच्या दरात ३ हजार ते ३,२०० रुपये अशी वाढ झाली आहे. त्याचा फायदा उठविण्याचा व्यापाऱ्यांनी प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, साखरेची साठेबाजी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये अत्यल्प भाडेपट्ट्यावर केल्याचा प्रकार उघड झाला आहे. काल रात्रीपासूनच बारामतीच्या भिगवण रस्त्यालगतच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमधून ४१५ मेट्रिक टन साखर चेन्नईला रातोरात पाठविण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील, तालुकाध्यक्ष विठ्ठल देवकाते, महेंद्र तावरे, रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, किशोर मासाळ, अमोल सातकर, चंद्रकांत वाघमोडे, विलास कोकरे आदी याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या वखार गोडाऊनमधून बाहेर जाणारी साखर रोखली. आज सकाळी ९ पासून साखर वाहतुकीसाठी सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रक थांबविण्यात आले होते. गोडाऊनचे सुपरवायझर एस. पी. पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईतील ईडी अँड एफ कमोडिटीज् प्रा. लि. कंपनीने न्यू फलटण शुगर कारखान्याकडून खरेदी केलेली साखर वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवली होती. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. १,१०५ मेट्रिक टन साखर गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली होती. काल रात्री १४२ मेट्रिक टन साखर उचलण्यात आली. रात्री पाठविण्यात आलेली साखर उचलण्याची परवानगी श्रीनाथ ट्रान्सपोर्टला देण्यात आली होती. मात्र, सकाळी आलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीकडून अधिकृत पत्र मिळाले नव्हते. ५० रुपये दरमहा प्रतिटन भाडेआकारणी वखार महामंडळ करते. त्याप्रमाणे भाडेआकारणी झाली आहे.या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, बारामती शहर पोलिसांकडे रीतसर तक्रार करण्यात येणार आहे. साखरेच्या साठ्याला निर्बंध नाहीत; मात्र त्याबाबत चौकशी करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)1साखरेचे दर कमी असताना मोठ्या व्यापाऱ्यांनी वायदेबाजाराचा गैरफायदा घेऊन साखर उचलली. आज साखरेचे दर वाढले आहेत. साखरधंदा अडचणीत आहे, असे कारखानदारदेखील ओरडत होते. त्यांनीच व्यापाऱ्यांशी संगनमत करून कमी दराने साखरविक्री केली आहे. 2आता साखरेचे दर वाढलेले असताना व्यापाऱ्यांनी साठेबाजी केलेली साखर विक्रीला काढली आहे. त्याचा आपोआपच कारखान्यांच्या साखरेवर परिणाम होणार आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील यांनी सांगितले.