शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

साखरेची साठेबाजी रोखली

By admin | Updated: January 20, 2016 01:26 IST

साखरेचे दर कमी असताना वायदेबाजाराचा गैरवापर बड्या व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे मंगळवारी बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले.

बारामती : साखरेचे दर कमी असताना वायदेबाजाराचा गैरवापर बड्या व्यापाऱ्यांकडून होत असल्याचे मंगळवारी बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले. फलटणच्या न्यू फलटण शुगर कारखान्याची साखर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये २,४०५ रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करून आता दर वाढल्यावर विक्रीस काढली आहे. व्यापाऱ्यांनी साठेबाजी करून विक्रीला काढलेल्या साखरेमुळे साखर कारखान्यांची साखरविक्री होत नसल्याची माहिती पुढे आली आहे.आठवडाभरापासून साखरेच्या दरात ३ हजार ते ३,२०० रुपये अशी वाढ झाली आहे. त्याचा फायदा उठविण्याचा व्यापाऱ्यांनी प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, साखरेची साठेबाजी वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये अत्यल्प भाडेपट्ट्यावर केल्याचा प्रकार उघड झाला आहे. काल रात्रीपासूनच बारामतीच्या भिगवण रस्त्यालगतच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमधून ४१५ मेट्रिक टन साखर चेन्नईला रातोरात पाठविण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील, तालुकाध्यक्ष विठ्ठल देवकाते, महेंद्र तावरे, रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, किशोर मासाळ, अमोल सातकर, चंद्रकांत वाघमोडे, विलास कोकरे आदी याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या वखार गोडाऊनमधून बाहेर जाणारी साखर रोखली. आज सकाळी ९ पासून साखर वाहतुकीसाठी सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रक थांबविण्यात आले होते. गोडाऊनचे सुपरवायझर एस. पी. पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईतील ईडी अँड एफ कमोडिटीज् प्रा. लि. कंपनीने न्यू फलटण शुगर कारखान्याकडून खरेदी केलेली साखर वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवली होती. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. १,१०५ मेट्रिक टन साखर गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली होती. काल रात्री १४२ मेट्रिक टन साखर उचलण्यात आली. रात्री पाठविण्यात आलेली साखर उचलण्याची परवानगी श्रीनाथ ट्रान्सपोर्टला देण्यात आली होती. मात्र, सकाळी आलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीकडून अधिकृत पत्र मिळाले नव्हते. ५० रुपये दरमहा प्रतिटन भाडेआकारणी वखार महामंडळ करते. त्याप्रमाणे भाडेआकारणी झाली आहे.या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, बारामती शहर पोलिसांकडे रीतसर तक्रार करण्यात येणार आहे. साखरेच्या साठ्याला निर्बंध नाहीत; मात्र त्याबाबत चौकशी करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)1साखरेचे दर कमी असताना मोठ्या व्यापाऱ्यांनी वायदेबाजाराचा गैरफायदा घेऊन साखर उचलली. आज साखरेचे दर वाढले आहेत. साखरधंदा अडचणीत आहे, असे कारखानदारदेखील ओरडत होते. त्यांनीच व्यापाऱ्यांशी संगनमत करून कमी दराने साखरविक्री केली आहे. 2आता साखरेचे दर वाढलेले असताना व्यापाऱ्यांनी साठेबाजी केलेली साखर विक्रीला काढली आहे. त्याचा आपोआपच कारखान्यांच्या साखरेवर परिणाम होणार आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील यांनी सांगितले.