शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

साखर हंगाम निम्म्यावर...कारखानदार गॅसवर...!

By admin | Updated: January 20, 2015 23:42 IST

सव्वाचार कोटी टन गाळप : अजून तेवढाच ऊस शिल्लक

विश्वास पाटील - कोल्हापूर -राज्यातील साखर हंगाम निम्म्यावर व बाजारातील साखरेचे दर घसरल्याने कारखानदार मात्र गॅसवर अशी साखर उद्योगाची आजची स्थिती आहे. केंद्र सरकार या उद्योगास पॅकेज देणार आहे परंतु ते नेमके कधी पदरात पडते यासंबंधी कोणतीच ठोस माहिती नसल्याने कारखानदार गॅसवर आहेत.साखर आयुक्तालयाने राज्यातील १८ जानेवारीपर्यंतची हंगामाची गाळपाची माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार राज्यात ७६ खासगी कारखान्यांसह १७४ कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत ४१९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून ४४७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.६८ असून तो गतवर्षीच्या तुलनेत पाँईट १० ने जास्त आहे. राज्य शासनाने हंगामाच्या सुरुवातीस किमान ६९७ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट जाहीर केले होते, परंतु परतीचा पाऊस व हवामानही उसाला पोषक राहिल्याने आतापर्यंत गाळप झालेल्या पूर्वहंगामी, आडसाली व सुरू या तिन्ही प्रकारांतील लागणीला चांगले टनेज मिळाले आहे. शासनानेच यंदा ८०० लाख टन उसाचे गाळप होईल, असा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. या पुढील गाळप हे मुख्यत: खोडवा उसाचे असेल. त्यामुळे त्यास लागणीइतके प्रतिएकर टनांचे उत्पादन मिळणार नाही तरीही आठशे लाख टन गाळप विचारात घेतल्यास यंदाचा हंगाम मार्चअखेरपर्यंत सुरू राहील. काही कारखाने एप्रिलपर्यंत व अगदी मोजके मेपर्यंत सुरू राहतील.यंदा ऊस चांगला आहे परंतु बाजारातील साखरेने सगळे वांदे केले आहे. हा दर २५०० रुपये क्विंटलपर्यंत घसरल्याने कारखान्यांना एफआरपी देताना अडचणी आल्या आहेत. राज्य सरकार एका बाजूला मदतीसाठी प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला कारखान्यांवर कारवाईचा बडगाही उगारला आहे. त्यामुळे ही मदत झाली तरच कारखानदारांची अडचण दूर होईल. अन्यथा मोजके कारखाने वगळता सर्वांचेच आर्थिक ‘आजारपण’ वाढणार आहे.दृष्टिक्षेपात १८ जानेवारीअखेरचे राज्यातील गाळपविभागकारखाने सुरूगाळप साखर उत्पादन साखर उतारा(कंसात खासगी)(लाख टन)(लाख क्विंटल) (टक्के)कोल्हापूर३७(१०)९६.९२११५.४६११.९१पुणे५७ (२६)१६४.७८१७४.६२१०.६०अहमदनगर२३(०९)५८.२२६०.८११०.४४औरंगाबाद२२ (०९)३७.२२३४.७७०९.३४नांदेड२९ (१७)५७.०१५७.२११०.०४अमरावती०२ (०१)०२.६९२.५९९.६५नागपूर०४ (०४)०२.२२२.०२९.०७एकूण१७४ (७६)४१९.०६४४७.४७१०.६८