शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

साखरेचे दर गडगडले

By admin | Updated: April 30, 2016 01:48 IST

साठेबाजी करणाऱ्यांंना कारवाईचा बडगा दाखविल्यानंतर व्यापाऱ्यांनी साखरेचे साठे बाजारात आणल्याने दरात कमालीची घसरण झाली

कोल्हापूर : केंद्र सरकारने साठेबाजी करणाऱ्यांंना कारवाईचा बडगा दाखविल्यानंतर व्यापाऱ्यांनी साखरेचे साठे बाजारात आणल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. गत आठवड्यापेक्षा प्रतिक्विंटल १५० ते २०० रुपयांनी दर खाली आले असून त्याचा फटका साखर कारखान्यांना बसला आहे.यंदा साखर कारखान्यांच्या हंगामाच्या सुरुवातीला दर २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल होता. काही कारखान्यांना हंगाम सुरू करण्यासाठी उचल हवी असल्याने त्यांनी साखरेची विक्री केली. व्यापाऱ्यांनी ही साखर गोडावूनमध्ये ठेवली. एप्रिल-मेमध्ये साखरेच्या मागणीत वाढ होत असल्याने दर तेजीत असतो. या तेजीचा फायदा उचलण्यासाठी व्यापाऱ्यांनी गेली चार महिने गोडावूनमध्ये साखर साठवून ठेवली. त्या रकमेवरील व्याज व गोडावून भाडे हे जरी प्रतिक्विंटल दोनशे रुपये गेले तरी एप्रिल-मे महिन्यात ३५०० रुपयांपर्यंत साखर विकली जाणार, हे व्यापाऱ्यांचे गणित होते. मध्यंतरी साखरेच्या दराने एकदम उचल खाल्याने दर ३८०० रुपयांपर्यंत पोहोचला. त्यातच एप्रिल-मेनंतर साखर पन्नाशी ओलांडणार, असे भाकीत झाल्याने केंद्र सरकार खडबडून जागे झाले. तुरडाळीने दोनशे रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर संपूर्ण देशात हाहा:कार माजला होता. डाळींचे दर नियंत्रणात आणताना सरकारच्या तोंडाला फेस आला. आता पुन्हा डाळीचे दर वाढू लागले आहेत. त्यातच साखरेने जर पन्नाशी ओलांडली तर सरकार अडचणीत येऊ शकते. या भीतीपोटी केंद्राने साठेबाजांविरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आणि व्यापारी खडबडून जागे झाले. गेल्या दोन दिवसांत घाईगडबडीने हजारो टन साखर बाजारात आल्याने दर प्रतिक्विंटल १५० ते २०० रुपयांनी घसरला आहे. उर्वरित एफआरपी देण्यावरून साखर कारखान्यांवर सरकार सातत्याने दबाव टाकत आहे. साखरेचे दर वाढल्याने साखर बाजारात काढण्याची तयारी कारखानदारांनी केली होती. साखरेची विक्री करून उर्वरित एफआरपी देण्याचे नियोजन सुरू असताना दर घसरल्याने कारखानदारांसमोरही पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी) > कारखान्यांवरील कारवाईचाही परिणामउर्वरित एफआरपी दिली नाही तर साखर कारखान्यांची गोदामे ताब्यात घेऊ, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता. तर थेट साखर साठे जप्त करण्याचा इशारा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. सतत कारखान्यांवर कारवाई करण्याच्या वक्तव्यांचा परिणाम साखर दरावर होत असल्याचा आरोप साखर कारखानदारांमधून होत आहे.