शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

साखरेचे दर गडगडले

By admin | Updated: April 30, 2016 01:48 IST

साठेबाजी करणाऱ्यांंना कारवाईचा बडगा दाखविल्यानंतर व्यापाऱ्यांनी साखरेचे साठे बाजारात आणल्याने दरात कमालीची घसरण झाली

कोल्हापूर : केंद्र सरकारने साठेबाजी करणाऱ्यांंना कारवाईचा बडगा दाखविल्यानंतर व्यापाऱ्यांनी साखरेचे साठे बाजारात आणल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. गत आठवड्यापेक्षा प्रतिक्विंटल १५० ते २०० रुपयांनी दर खाली आले असून त्याचा फटका साखर कारखान्यांना बसला आहे.यंदा साखर कारखान्यांच्या हंगामाच्या सुरुवातीला दर २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल होता. काही कारखान्यांना हंगाम सुरू करण्यासाठी उचल हवी असल्याने त्यांनी साखरेची विक्री केली. व्यापाऱ्यांनी ही साखर गोडावूनमध्ये ठेवली. एप्रिल-मेमध्ये साखरेच्या मागणीत वाढ होत असल्याने दर तेजीत असतो. या तेजीचा फायदा उचलण्यासाठी व्यापाऱ्यांनी गेली चार महिने गोडावूनमध्ये साखर साठवून ठेवली. त्या रकमेवरील व्याज व गोडावून भाडे हे जरी प्रतिक्विंटल दोनशे रुपये गेले तरी एप्रिल-मे महिन्यात ३५०० रुपयांपर्यंत साखर विकली जाणार, हे व्यापाऱ्यांचे गणित होते. मध्यंतरी साखरेच्या दराने एकदम उचल खाल्याने दर ३८०० रुपयांपर्यंत पोहोचला. त्यातच एप्रिल-मेनंतर साखर पन्नाशी ओलांडणार, असे भाकीत झाल्याने केंद्र सरकार खडबडून जागे झाले. तुरडाळीने दोनशे रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर संपूर्ण देशात हाहा:कार माजला होता. डाळींचे दर नियंत्रणात आणताना सरकारच्या तोंडाला फेस आला. आता पुन्हा डाळीचे दर वाढू लागले आहेत. त्यातच साखरेने जर पन्नाशी ओलांडली तर सरकार अडचणीत येऊ शकते. या भीतीपोटी केंद्राने साठेबाजांविरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आणि व्यापारी खडबडून जागे झाले. गेल्या दोन दिवसांत घाईगडबडीने हजारो टन साखर बाजारात आल्याने दर प्रतिक्विंटल १५० ते २०० रुपयांनी घसरला आहे. उर्वरित एफआरपी देण्यावरून साखर कारखान्यांवर सरकार सातत्याने दबाव टाकत आहे. साखरेचे दर वाढल्याने साखर बाजारात काढण्याची तयारी कारखानदारांनी केली होती. साखरेची विक्री करून उर्वरित एफआरपी देण्याचे नियोजन सुरू असताना दर घसरल्याने कारखानदारांसमोरही पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी) > कारखान्यांवरील कारवाईचाही परिणामउर्वरित एफआरपी दिली नाही तर साखर कारखान्यांची गोदामे ताब्यात घेऊ, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता. तर थेट साखर साठे जप्त करण्याचा इशारा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. सतत कारखान्यांवर कारवाई करण्याच्या वक्तव्यांचा परिणाम साखर दरावर होत असल्याचा आरोप साखर कारखानदारांमधून होत आहे.