शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचे दर गडगडले

By admin | Updated: April 30, 2016 01:48 IST

साठेबाजी करणाऱ्यांंना कारवाईचा बडगा दाखविल्यानंतर व्यापाऱ्यांनी साखरेचे साठे बाजारात आणल्याने दरात कमालीची घसरण झाली

कोल्हापूर : केंद्र सरकारने साठेबाजी करणाऱ्यांंना कारवाईचा बडगा दाखविल्यानंतर व्यापाऱ्यांनी साखरेचे साठे बाजारात आणल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. गत आठवड्यापेक्षा प्रतिक्विंटल १५० ते २०० रुपयांनी दर खाली आले असून त्याचा फटका साखर कारखान्यांना बसला आहे.यंदा साखर कारखान्यांच्या हंगामाच्या सुरुवातीला दर २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल होता. काही कारखान्यांना हंगाम सुरू करण्यासाठी उचल हवी असल्याने त्यांनी साखरेची विक्री केली. व्यापाऱ्यांनी ही साखर गोडावूनमध्ये ठेवली. एप्रिल-मेमध्ये साखरेच्या मागणीत वाढ होत असल्याने दर तेजीत असतो. या तेजीचा फायदा उचलण्यासाठी व्यापाऱ्यांनी गेली चार महिने गोडावूनमध्ये साखर साठवून ठेवली. त्या रकमेवरील व्याज व गोडावून भाडे हे जरी प्रतिक्विंटल दोनशे रुपये गेले तरी एप्रिल-मे महिन्यात ३५०० रुपयांपर्यंत साखर विकली जाणार, हे व्यापाऱ्यांचे गणित होते. मध्यंतरी साखरेच्या दराने एकदम उचल खाल्याने दर ३८०० रुपयांपर्यंत पोहोचला. त्यातच एप्रिल-मेनंतर साखर पन्नाशी ओलांडणार, असे भाकीत झाल्याने केंद्र सरकार खडबडून जागे झाले. तुरडाळीने दोनशे रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर संपूर्ण देशात हाहा:कार माजला होता. डाळींचे दर नियंत्रणात आणताना सरकारच्या तोंडाला फेस आला. आता पुन्हा डाळीचे दर वाढू लागले आहेत. त्यातच साखरेने जर पन्नाशी ओलांडली तर सरकार अडचणीत येऊ शकते. या भीतीपोटी केंद्राने साठेबाजांविरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आणि व्यापारी खडबडून जागे झाले. गेल्या दोन दिवसांत घाईगडबडीने हजारो टन साखर बाजारात आल्याने दर प्रतिक्विंटल १५० ते २०० रुपयांनी घसरला आहे. उर्वरित एफआरपी देण्यावरून साखर कारखान्यांवर सरकार सातत्याने दबाव टाकत आहे. साखरेचे दर वाढल्याने साखर बाजारात काढण्याची तयारी कारखानदारांनी केली होती. साखरेची विक्री करून उर्वरित एफआरपी देण्याचे नियोजन सुरू असताना दर घसरल्याने कारखानदारांसमोरही पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी) > कारखान्यांवरील कारवाईचाही परिणामउर्वरित एफआरपी दिली नाही तर साखर कारखान्यांची गोदामे ताब्यात घेऊ, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता. तर थेट साखर साठे जप्त करण्याचा इशारा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. सतत कारखान्यांवर कारवाई करण्याच्या वक्तव्यांचा परिणाम साखर दरावर होत असल्याचा आरोप साखर कारखानदारांमधून होत आहे.