शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

राज्यात साखरेच्या दरात आठ रुपयांची वाढ

By admin | Updated: March 6, 2016 09:09 IST

केंद्र सरकारने सक्ती केल्याने बाजारपेठेतील साखरेच्या दरात वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांत घाऊक बाजारात प्रति क्विंटल ७० ते ८० रुपयांची वाढ झाली

कोल्हापूर : दुष्काळामुळे राज्यातील साखर उत्पादन घटणार आहे, त्यातच निर्यातीसाठी केंद्र सरकारने सक्ती केल्याने बाजारपेठेतील साखरेच्या दरात वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांत घाऊक बाजारात प्रति क्विंटल ७० ते ८० रुपयांची वाढ झाली आहे. बाजारातील मागणी व उत्पादन पाहता साखर तीन हजारांवर स्थिरावेल, असा अंदाज असून किरकोळ बाजारात साखर ७ ते ८ रुपयांनी महाग होण्याची चिन्हे आहेत.यंदाचा साखर हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेच्या दराने आतापर्यंतचा नीचांक गाठला होता. त्यानंतर प्रत्येक महिन्याला साखरेच्या दरात थोडी थोडी वाढ होत गेली. त्यात हंगामाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने एकूण उत्पादनाच्या १२ टक्के निर्यात कोटा दिल्याने त्याचा परिणामही बाजारपेठेवर झाला. त्यात दुष्काळामुळे उसाच्या उत्पादनात घट झाल्याने परिणामी साखर उत्पादन कमी होणार आहे. गत वर्षी राज्यात ९२९ लाख टन उसाचे उत्पादन झाले होते. यावर्षी कसेतरी ७०० लाख टन गाळप होईल, अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसांपूर्वी राज्यातील साखर कारखान्यांची आढावा बैठक घेऊन निर्यातीबाबत कारखान्यांना इशारा दिला होता. देशात ४० लाख टन साखर निर्यात होणार आहे. त्यापैकी नऊ लाख टनच साखर निर्यात झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सुमारे चार लाख टन साखर निर्यात झाल्याने बाजारपेठेवर त्याचा परिणाम दिसत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून घाऊक बाजारात सध्या २९७५ रुपये प्रतिक्विंटल दराने साखर विक्री होत आहे. (प्रतिनिधी)

हंगामात असे वाढले प्रतिक्विंटलचे दर -आॅक्टोबर - २४००, नोव्हेंबर - २६००, डिसेंबर - २७००, जानेवारी - २८५०, फेबु्रवारी - २९००, मार्च - २९७५ रुपये.

> निर्यातीची केलेली सक्ती, दुष्काळामुळे उसाचे घटलेले उत्पादन यामुळे साखरेचे दर वाढू लागले आहेत. उत्पादन व बाजारपेठेतील मागणी पाहिली तर आगामी काळात तीन हजारांवर साखर स्थिरावेल. - पी. जी. मेढे, साखर तज्ज्ञ, कोल्हापूर