शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

साखर पॅकेज म्हणजे डोंगर पोखरून उंदीर

By admin | Updated: June 26, 2015 01:18 IST

केंद्र शासनाचे गॅझेट प्रसिद्ध : पैसे मिळण्यास आॅगस्ट उजाडणार

विश्वास पाटील - कोल्हापूर -देशातील साखर उद्योगासाठी जाहीर झालेल्या सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या पॅकेजचे गॅझेट केंद्र शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे; परंतु हे पैसे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आॅगस्ट उजाडण्याची शक्यता आहे. राजपत्रातील अटी आणि निकष पाहता हे पॅकेज म्हणजे ‘डोंगर पोखरून उंदीर काढला’ असल्याची प्रतिक्रिया साखर कारखानदारीतून व्यक्त झाली.केंद्राने १० जूनला या पॅकेजची घोषणा केली. त्यातील सुमारे १८५० कोटी रुपये महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहेत. केंद्राने पॅकेज जाहीर केल्याने राज्य सरकारने विधिमंडळात जाहीर केलेले दोन हजार कोटींचे पॅकेज देण्याचे टाळले. केंद्राचे पॅकेज हे आमच्याच सरकारचे पॅकेज असल्याने राज्य सरकारने वेगळे पॅकेज देण्याची गरज नसल्याची भूमिका सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली आहे. परंतु केंद्र सरकारकडून आता मिळणाऱ्या पॅकेजमधून शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी काही रक्कम नक्की उपलब्ध होईल; परंतु त्यातून सगळी एफआरपी भागेल एवढे पैसे उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या मदतीचाही साखर कारखानदारीस आवश्यक तेवढा दिलासा मिळणार नाही.केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे संयुक्त सचिव प्रशांत त्रिवेदी यांनी २३ जूनच्या राजपत्रात (भाग १ खंड १) या पॅकेजची माहिती दिली आहे. त्यामुळे हे राजपत्र घेऊनच आता कारखान्यांना त्यांना वित्त पुरवठा करणाऱ्या बँकांना भेटावे लागेल. केंद्र शासनाकडून दिले जाणारे पॅकेज कारखान्यांना दिले जाणार नाही. ‘एफआरपी’ची देय रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरच जमा होईल.कर्ज पॅकेज मिळण्याच्या अटी कारखान्याच्या जूनमध्ये संपलेल्या एकूण गाळपापैकी किमान ५० टक्के उसाची एफआरपी ज्या कारखान्यांनी ३० जून २०१५ पूर्वी दिली असेल, त्यांनाच हे कर्ज मिळेल. तसे साखर आयुक्तांचे पत्र लागेल.त्या कारखान्याच्या २०१३-२०१४ हंगामात जेवढे उत्पादन झाले त्यापैकी ११ टक्के साखरेस प्रतिक्विंटल २४०० रुपयांप्रमाणे हे कर्ज मिळू शकेल. परंतु या कारखान्यांनी २०१३-१४ व २०१४ -१५ या हंगामात गळित घेतलेले हवे. तसे केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे प्रमाणपत्र बँकेस द्यावे लागेल.या कर्जाचे १० टक्क्यांप्रमाणे एका वर्षाचे व्याज केंद्र सरकार देणार आहे. याचा अर्थ हे कर्ज वर्षात फेडायचे आहे. वर्षानंतरचे व्याज व मुद्दल कारखान्यांना परत करावे लागेल; परंतु कारखानदारीसमोरील यंदाच्या अडचणीच कमी व्हायला तयार नाहीत. पुढील वर्षी त्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे या कर्जाची कशी परतफेड करणार याचे कोडे साखर उद्योगास आतापासूनच पडले आहे. हे कर्ज ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत वितरित केले जाईल, त्यांनाच व्याजमाफीचा लाभ होईल.व्याजमाफीचा पहिला हप्ता आॅक्टोबर २०१५ ला व त्यानंतरचे हप्ते जानेवारी २०१६, एप्रिल २०१६ आणि जुलै २०१६ ला दिले जातील.ही रक्कम एफआरपी देण्यासाठीच वापरली असल्याचे प्रमाणपत्र साखर आयुक्तांनी देणे बंधनकारक. त्याशिवाय व्याजाची रक्कमच कारखान्यांना मिळणार नाही.