शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

साखर उद्योगाला दोन हजार कोटींचे पॅकेज

By admin | Updated: April 11, 2015 02:27 IST

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देता यावा यासाठी साखर कारखान्यांना दोन हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देणार

मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देता यावा यासाठी साखर कारखान्यांना दोन हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. तसेच कच्च्या साखरेच्या निर्यातीला प्रोत्साहन अनुदान म्हणून टनाला १ हजार रुपयांची मदत राज्य सरकारकडून दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देण्यावर राज्य सरकार आग्रही आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या दरात घसरण सुरू आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने याआधीच उसावरील खरेदी कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मळी नियंत्रणमुक्त करण्यासंदर्भातही राज्याने निर्णय घेतला आहे. साखरेचा बफर स्टॉक करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे. जेणेकरून अडचणीतील साखर उद्योगाला दिलासा मिळेल. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत २० टक्के अंतरिम वाढ करण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. तसेच विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा विचार सुरू आहे. आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपयांचा बोनस जाहीर केला होता. मात्र, याचा लाभ केवळ व्यापाऱ्यांनाच झाल्याचे निदर्शनाला आले आहे. यामध्ये सुमारे १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी, धान उत्पादक शेतकऱ्यांना द्यायच्या मदतीबाबत विचाराअंती योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. (विशेष प्रतिनिधी)