शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

साखर कारखानदारी मोडीत काढण्याचे धोरण

By admin | Updated: July 7, 2015 01:44 IST

युतीचे सरकार शेतकरीविरोधी असून राज्यातील साखर कारखानदारी मोडून काढण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केला.

सोलापूर : युतीचे सरकार शेतकरीविरोधी असून राज्यातील साखर कारखानदारी मोडून काढण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केला. शेतकरी, कष्टकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री परदेशात जातात, अशी टीकाही त्यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी सहकाराची चळवळ उभी केली. शरद पवार केंद्रात असताना शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली. सध्याचे सरकार शेतकऱ्यांचा कसलाच विचार करणारे नाही. पंतप्रधान तर परदेश दौऱ्यावरच असतात, अशी टीका त्यांनी केली.यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दिलीप सोपल, आ. बबनराव शिंदे, आ. हणमंत डोळस, राकाँ जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. मुंडे, तावडेंनी राजीनामा द्यावाच्महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळा तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बोगस पदवी व अग्निशमन यंत्रात प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती समोर येत आहे़ जोपर्यंत आरोपांची शहानिशा होत नाही, तोपर्यंत पंकजा मुंडे व विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.रमेश कदम चुकीचेच़़़प्रशासनाविरोधात दबाव आणण्यासाठी हजारोच्या संख्येने काढलेला मोर्चा हा चुकीचाच आहे़ शिवाय अटक करणार नाही, असे पोलिसांचे पत्र असतानाही अटक करण्यासाठी आ़ रमेश कदम यांनी पोलिस ठाण्यावर धाव घेणे अयोग्य आहे़ त्यांना तूर्तास पक्षातर्फे समज देणार आहे़ त्यानंतरही सुधारणा न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.