शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

साखर कारखानदारी मोडीत काढण्याचे धोरण

By admin | Updated: July 7, 2015 01:44 IST

युतीचे सरकार शेतकरीविरोधी असून राज्यातील साखर कारखानदारी मोडून काढण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केला.

सोलापूर : युतीचे सरकार शेतकरीविरोधी असून राज्यातील साखर कारखानदारी मोडून काढण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केला. शेतकरी, कष्टकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री परदेशात जातात, अशी टीकाही त्यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी सहकाराची चळवळ उभी केली. शरद पवार केंद्रात असताना शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली. सध्याचे सरकार शेतकऱ्यांचा कसलाच विचार करणारे नाही. पंतप्रधान तर परदेश दौऱ्यावरच असतात, अशी टीका त्यांनी केली.यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दिलीप सोपल, आ. बबनराव शिंदे, आ. हणमंत डोळस, राकाँ जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. मुंडे, तावडेंनी राजीनामा द्यावाच्महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळा तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बोगस पदवी व अग्निशमन यंत्रात प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती समोर येत आहे़ जोपर्यंत आरोपांची शहानिशा होत नाही, तोपर्यंत पंकजा मुंडे व विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.रमेश कदम चुकीचेच़़़प्रशासनाविरोधात दबाव आणण्यासाठी हजारोच्या संख्येने काढलेला मोर्चा हा चुकीचाच आहे़ शिवाय अटक करणार नाही, असे पोलिसांचे पत्र असतानाही अटक करण्यासाठी आ़ रमेश कदम यांनी पोलिस ठाण्यावर धाव घेणे अयोग्य आहे़ त्यांना तूर्तास पक्षातर्फे समज देणार आहे़ त्यानंतरही सुधारणा न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.