शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

साखर कारखाने एकजुटीने कारवाईला सामोरे जाणार

By admin | Updated: July 12, 2015 03:39 IST

साखरेचे दर घसरल्याने एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देण्यास कारखाने असमर्थ असून शासनाने कायदेशीर कारवाई केल्यास त्यास सर्व कारखाने एकजुटीने सामोरे जातील,

बारामती : साखरेचे दर घसरल्याने एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देण्यास कारखाने असमर्थ असून शासनाने कायदेशीर कारवाई केल्यास त्यास सर्व कारखाने एकजुटीने सामोरे जातील, असा इशारा पश्चिम भारतीय साखर कारखानदार संघटनेचे (विस्मा) अध्यक्ष रोहित पवार यांनी दिला आहे.यंदाच्या गळीत हंगामात साखरेच्या दरात ७०० ते ८०० रुपये घसरण झाली आहे. कृषिमुल्य आयोगाने २,२०० रुपये एफआरपी दराची शिफारस केली होती. तो प्रतिटन ९.५० टक्के साखर उताऱ्याला ३,१०० ते ३,४०० रुपये भाव मिळेल, असे गृहित धरून देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात साखरेला क्विंटलमागे सरासरी २,२०० ते २,३०० रुपये दर मिळाला. त्यामुळे एफआरपीची उर्वरीत रक्कम केंद्र, राज्य शासनाने थेट शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात द्यावी. ती कारखान्याची जबाबदारी नाही, असे पवार यांनी सांगितले.साखर उद्योगातील आगामी गळीत हंगामाच्या अडचणीसंदर्भात महाराष्ट्रासह कर्नाटकमधील खासगी साखर कारखान्यांची बैठक झाली. त्यात आर्थिक अडचणींमुळे सर्वच कारखान्यांचे कर्ज थकले आहे. त्यामुळे बँक नव्याने कर्ज पुरवठा करणार नाहीत, अशी भूमिका कारखानदारांनी मांडली. (वार्ताहर)