शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

विदर्भ, मराठवाड्यातील साखर कारखाने संकटात

By admin | Updated: December 4, 2015 02:07 IST

हमखास पैसे मिळणारे पीक म्हणून उसाची गोडी राज्यभरातील शेतकऱ्यांना लागली खरी परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील साखर कारखानदारी

- अरुण बारसकर,  सोलापूरहमखास पैसे मिळणारे पीक म्हणून उसाची गोडी राज्यभरातील शेतकऱ्यांना लागली खरी परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. या पट्ट्यातील तब्बल ७० कारखाने यंदा बंद तर ५५ कारखाने कसेबसे सुरू आहेत. दुष्काळाची झळ पश्चिम महाराष्ट्रालाही बसली असून या पट्ट्यातील १७ कारखाने बंद ठेवावे लागले आहेत.मागील दोन वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. १९९० च्या दशकापर्यंत पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी असलेल्या साखर कारखानदारीने विदर्भ, मराठवाडा व खान्देशातही पाय पसरण्यास सुरुवात केली. मागील वर्षापर्यंत या पट्ट्यातील १९ जिल्ह्णात तब्बल १२५ साखर कारखाने आहेत. यापैकी अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, जालना या जिल्ह्णात अधिक कारखाने आहेत, परंतु मागील दोन वर्षांत पाऊसमान वरचेवर कमी होत असल्याने कारखान्यांना ऊस मिळेनासा झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही १६ कारखाने यावर्षी उसाअभावी बंद आहेत. यामध्ये सोलापूर व सांगलीचे प्रत्येकी चार, कोल्हापूर व साताऱ्याचे प्रत्येकी तीन व पुण्याच्या दोन साखर कारखान्यांचा समावेश आहे. यामुळे साखर हंगामावर कमालीचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले. यंदा ७६० लाख मेट्रिक टनावरच हंगाम आटोपणार असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. बंद कारखाने : औरंगाबाद ५, जालना २, बीड ५, परभणी ४, नांदेड ६, उस्मानाबाद १६ यावर्षी १२५ पैकी ५५ कारखान्यांची धुराडी पेटली असून ७० कारखाने सुरू झाले नाहीतपश्चिम महाराष्ट्रातील १०६ साखर कारखान्यांपैकी मागील वर्षी अवघे ७ कारखाने बंद होते यावर्षी १६ कारखाने बंद आहेत.अहमदनगरचे २२ पैकी ४, नाशिकचे ९ पैकी सहा, औरंगाबादचे ९ पैकी ५, जालन्याचे पाचपैकी २, बीडचे १० पैकी ५, परभणीचे ५ पैकी चार, नांदेडचे ८ पैकी ६, उस्मानाबादचे १६ पैकी १२, लातूरचे १२ पैकी ८, यवतमाळचे ४ पैकी ३ साखर कारखाने बंद आहेत.वर्ध्याच्या दोन पैकी एक, भंडाऱ्याच्या दोन पैकी एक, अमरावतीचा एकमेव विदर्भ शुगर, बुलढाण्याचे तीन, जळगावचे ७, नंदूरबारचे तीन, धुळ्याचे दोन साखर कारखाने बंद आहेतमागील वर्षी मराठवाडा, खान्देश व विदर्भातील १२५ कारखान्यांपैकी ८१ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता तर ४४ कारखाने बंद ठेवले होते