शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

विदर्भ, मराठवाड्यातील साखर कारखाने संकटात

By admin | Updated: December 4, 2015 02:07 IST

हमखास पैसे मिळणारे पीक म्हणून उसाची गोडी राज्यभरातील शेतकऱ्यांना लागली खरी परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील साखर कारखानदारी

- अरुण बारसकर,  सोलापूरहमखास पैसे मिळणारे पीक म्हणून उसाची गोडी राज्यभरातील शेतकऱ्यांना लागली खरी परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. या पट्ट्यातील तब्बल ७० कारखाने यंदा बंद तर ५५ कारखाने कसेबसे सुरू आहेत. दुष्काळाची झळ पश्चिम महाराष्ट्रालाही बसली असून या पट्ट्यातील १७ कारखाने बंद ठेवावे लागले आहेत.मागील दोन वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. १९९० च्या दशकापर्यंत पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी असलेल्या साखर कारखानदारीने विदर्भ, मराठवाडा व खान्देशातही पाय पसरण्यास सुरुवात केली. मागील वर्षापर्यंत या पट्ट्यातील १९ जिल्ह्णात तब्बल १२५ साखर कारखाने आहेत. यापैकी अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, जालना या जिल्ह्णात अधिक कारखाने आहेत, परंतु मागील दोन वर्षांत पाऊसमान वरचेवर कमी होत असल्याने कारखान्यांना ऊस मिळेनासा झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही १६ कारखाने यावर्षी उसाअभावी बंद आहेत. यामध्ये सोलापूर व सांगलीचे प्रत्येकी चार, कोल्हापूर व साताऱ्याचे प्रत्येकी तीन व पुण्याच्या दोन साखर कारखान्यांचा समावेश आहे. यामुळे साखर हंगामावर कमालीचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले. यंदा ७६० लाख मेट्रिक टनावरच हंगाम आटोपणार असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. बंद कारखाने : औरंगाबाद ५, जालना २, बीड ५, परभणी ४, नांदेड ६, उस्मानाबाद १६ यावर्षी १२५ पैकी ५५ कारखान्यांची धुराडी पेटली असून ७० कारखाने सुरू झाले नाहीतपश्चिम महाराष्ट्रातील १०६ साखर कारखान्यांपैकी मागील वर्षी अवघे ७ कारखाने बंद होते यावर्षी १६ कारखाने बंद आहेत.अहमदनगरचे २२ पैकी ४, नाशिकचे ९ पैकी सहा, औरंगाबादचे ९ पैकी ५, जालन्याचे पाचपैकी २, बीडचे १० पैकी ५, परभणीचे ५ पैकी चार, नांदेडचे ८ पैकी ६, उस्मानाबादचे १६ पैकी १२, लातूरचे १२ पैकी ८, यवतमाळचे ४ पैकी ३ साखर कारखाने बंद आहेत.वर्ध्याच्या दोन पैकी एक, भंडाऱ्याच्या दोन पैकी एक, अमरावतीचा एकमेव विदर्भ शुगर, बुलढाण्याचे तीन, जळगावचे ७, नंदूरबारचे तीन, धुळ्याचे दोन साखर कारखाने बंद आहेतमागील वर्षी मराठवाडा, खान्देश व विदर्भातील १२५ कारखान्यांपैकी ८१ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता तर ४४ कारखाने बंद ठेवले होते