शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

साखर निर्यातीचे धोरण हवे

By admin | Updated: January 18, 2016 00:55 IST

शरद पवार : शेती विकासाचे राजकारण करूया; सा. रे. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

शिरोळ : साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखर निर्यातीचे धोरण राबविले पाहिजे, त्याशिवाय बाजारभाव सुधारून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर मिळणार नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे सांगतानाच शेतीवर परिणाम होणारे राजकारण करू नका, शेती उत्पादन वाढीबरोबर शेतकऱ्यांच्या विकासाला दिशा देणारे राजकारण करूया, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी येथे केले.येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक, माजी अध्यक्ष, स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सा. रे. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. त्यानंतर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शर्करा औद्योगिक श्रमिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन, तर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन माजी वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. खा. पवार पुढे म्हणाले, देशामध्ये उसाचे सरासरी एकरी उत्पादन २९ टनांचे आहे. यात महाराष्ट्राचे ३४ टन असून, दत्त कारखान्याचे ४३ टन आहे, हे वेगळे वैशिष्ट आहे. कारखान्याने पुरस्कारांचा तर विक्रमच केला आहे. ‘दत्त’मुळे कारखानदारीला दिशास्व. सा. रे. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत खा. शरद पवार म्हणाले, खऱ्या अर्थाने साखर कारखानदारीला दिशा देण्याचे काम सा. रे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दत्त कारखान्याच्या प्रांगणातून झाले आहे. सामान्य माणूस शक्तिशाली बनला पाहिजे, ही भूमिका त्यांची होती. या दूरदृष्टीतूनच दत्त कारखान्याला त्यांनी ऊर्जितावस्था दिली. श्रीवर्धन बायोटेकमधील फूलशेती देशातील आदर्श असून, स्व. सा. रे. पाटील यांच्यानंतर त्यांचे पुत्र गणपतराव पाटील यांनी तोच आदर्श कायमपणे ठेवला आहे.कमी पाण्यावरील उसाचे तंत्रज्ञान आणणारआज साखर कारखानदारीसमोर मोठे प्रश्न उभे आहेत. ब्राझील, इस्रायल, इंडोनेशिया सारख्या देशांतील साखर उत्पादन व ऊसदर यांचा विचार करता आपल्या देशातही आधुनिक तंत्रज्ञान राबविण्याची गरज आहे. केवळ साखर उत्पादन उपयोगाचे नसून, एकरी ऊस उत्पादन वाढले पाहिजे. यासाठी कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन देणारे परदेशातील ऊस बियाणांचे आधुनिक तंत्रज्ञान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत राबविण्याचा ठोस कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.